शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती निवारणात ६३.५३ लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 01:30 IST

नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे नुकसान झालेल्यांना मदतीचा हात म्हणून शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते.

८५.४५ लाखांचा निधी प्राप्त : काही लेखाशीर्षात जास्त खर्च गोंदिया : नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे नुकसान झालेल्यांना मदतीचा हात म्हणून शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. याअंतर्गत जिल्ह्याने अशा नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी यावर्षी ६३.५४ लाखांचा निधी खर्च केला आहे. यासाठी जिल्ह्याला ८५.४५ लाखांचा निधी मिळाला होता. त्यातील २१.९१ लाख रूपये शिल्लक आहेत. मात्र वास्तविकता अशी की, यातील काही लेखाशीर्षांत मिळालेल्या निधीपेक्षा जास्तीचा खर्च झाला आहे. निसर्गाच्या कोपापुढे कुणाचेही चालत नाही. जिल्ह्याची भौगोलिक स्थिती बघता येथे पावसाळा सर्वाधिक धोकादायक काळ असतो. पावसाळ््याच्या चार महिन्यांत कोणापुढे कोणती आपत्ती उभी होणार, याचा नेम नसतो. यात कित्येकांचे सर्वच काही हिरावले जाते. तर कुणाला नशिबाची साथ मिळाल्यास थोड्यावर त्याची सुटका होते. झालेल्या नुकसानीची भरपाई कुणीही करू शकत नसले तरीही नुकसानग्रस्तांना मदतीचा हात म्हणून शासनाकडून काही आर्थिक मदत केली जाते. नैसर्गिक आपत्तीच्या या व्यवस्थापनासाठी शासनाकडून जिल्ह्यांना विशिष्ट निधी दिला जातो. त्यानुसार यंदा जिल्ह्याला ८५ लाख ४५ हजारांचा निधी मिळाला होता. मे महिन्यात मिळालेल्या या निधीतील ६३ लाख ५३ हजार ५०० रूपये जून पर्यंत खर्च झाले असून २१ लाख ९१ हजार ५०० रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे शिल्लक असल्याचे कळते. येथे जिल्ह्याला पाच लेखाशिर्षांतर्गत निधी दिला जात असून त्यानुसार जिल्हाप्रशासनाला त्यावर खर्च करावयाचा असतो. (शहर प्रतिनिधी) २४४ लेखाशीर्षालाच मदतीची गरज लेखाशिर्ष २४४ मध्ये वीज पडून एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना मदतीसाठी आर्थिक मदतीची तरतूद केली आहे. यात मृताच्या कुटुंबास चार लाखांची मदत केली जाते. जिल्ह्यात यंदा अशा दोन प्रकरणांत आठ लाखांची मदत करण्यात आली आहे. वास्तविक या लेखाशिर्षांतर्गत जिल्ह्याला फक्त ४५ हजार रूपये देण्यात आले आहेत. वीज पडून मृत्यू झाल्याच्या प्रकरणात संपूर्ण कागदपत्रे तयार करून फाईल शासनाकडे पाठवून त्यानंतर निधी प्राप्त होतो. या लेखाशिर्षातील निधी वाढविणे गरजेचे आहे. असा झाला खर्च घर व वीज पडून जखमींसाठी लेखाशिर्ष १५५ अंतर्गत जिल्ह्याला ३५ लाखांचा निधी मिळाला होता व त्यातील ११ लाख ४६ हजार ७०० रूपये खर्च झाले आहेत. घरांची दुरूस्ती व पुर्नबांधणीसाठी लेखाशिर्ष २७१ अंतर्गत ४० लाखांचा निधी मिळाला होता व त्यातील ३४ लाख १७ हजार २०० रूपये खर्च झाले आहेत. वीज, अपघात व पुरामुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास जनावरे खरेदीसाठी लेखाशिर्ष ३१५ अंतर्गत आठ लाखांचा निधी मिळाला होता. मात्र यात नऊ लाख ८९ हजार ६०० रूपयांचा खर्च झाला आहे. वीज पडून माणसाचा मृत्यू झाल्यास मदत म्हणून २४४ लेखाशिर्षांतर्गत आठ लाखांचा खर्च झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यात फक्त ४५ हजार रूपयेच मिळाले होते. पूर परिस्थितीत नागरिकांची राहण्याची सोय, औषधोपचार व जेवणावर खर्चासाठी २१७ लेखाशिर्षांतर्गत दोन लाख रूपये मिळाले असून सध्यातरी यावर काहीच खर्च करण्यात आले नाही.