शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

आपत्ती निवारणात ६३.५३ लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 01:30 IST

नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे नुकसान झालेल्यांना मदतीचा हात म्हणून शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते.

८५.४५ लाखांचा निधी प्राप्त : काही लेखाशीर्षात जास्त खर्च गोंदिया : नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे नुकसान झालेल्यांना मदतीचा हात म्हणून शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. याअंतर्गत जिल्ह्याने अशा नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी यावर्षी ६३.५४ लाखांचा निधी खर्च केला आहे. यासाठी जिल्ह्याला ८५.४५ लाखांचा निधी मिळाला होता. त्यातील २१.९१ लाख रूपये शिल्लक आहेत. मात्र वास्तविकता अशी की, यातील काही लेखाशीर्षांत मिळालेल्या निधीपेक्षा जास्तीचा खर्च झाला आहे. निसर्गाच्या कोपापुढे कुणाचेही चालत नाही. जिल्ह्याची भौगोलिक स्थिती बघता येथे पावसाळा सर्वाधिक धोकादायक काळ असतो. पावसाळ््याच्या चार महिन्यांत कोणापुढे कोणती आपत्ती उभी होणार, याचा नेम नसतो. यात कित्येकांचे सर्वच काही हिरावले जाते. तर कुणाला नशिबाची साथ मिळाल्यास थोड्यावर त्याची सुटका होते. झालेल्या नुकसानीची भरपाई कुणीही करू शकत नसले तरीही नुकसानग्रस्तांना मदतीचा हात म्हणून शासनाकडून काही आर्थिक मदत केली जाते. नैसर्गिक आपत्तीच्या या व्यवस्थापनासाठी शासनाकडून जिल्ह्यांना विशिष्ट निधी दिला जातो. त्यानुसार यंदा जिल्ह्याला ८५ लाख ४५ हजारांचा निधी मिळाला होता. मे महिन्यात मिळालेल्या या निधीतील ६३ लाख ५३ हजार ५०० रूपये जून पर्यंत खर्च झाले असून २१ लाख ९१ हजार ५०० रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे शिल्लक असल्याचे कळते. येथे जिल्ह्याला पाच लेखाशिर्षांतर्गत निधी दिला जात असून त्यानुसार जिल्हाप्रशासनाला त्यावर खर्च करावयाचा असतो. (शहर प्रतिनिधी) २४४ लेखाशीर्षालाच मदतीची गरज लेखाशिर्ष २४४ मध्ये वीज पडून एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना मदतीसाठी आर्थिक मदतीची तरतूद केली आहे. यात मृताच्या कुटुंबास चार लाखांची मदत केली जाते. जिल्ह्यात यंदा अशा दोन प्रकरणांत आठ लाखांची मदत करण्यात आली आहे. वास्तविक या लेखाशिर्षांतर्गत जिल्ह्याला फक्त ४५ हजार रूपये देण्यात आले आहेत. वीज पडून मृत्यू झाल्याच्या प्रकरणात संपूर्ण कागदपत्रे तयार करून फाईल शासनाकडे पाठवून त्यानंतर निधी प्राप्त होतो. या लेखाशिर्षातील निधी वाढविणे गरजेचे आहे. असा झाला खर्च घर व वीज पडून जखमींसाठी लेखाशिर्ष १५५ अंतर्गत जिल्ह्याला ३५ लाखांचा निधी मिळाला होता व त्यातील ११ लाख ४६ हजार ७०० रूपये खर्च झाले आहेत. घरांची दुरूस्ती व पुर्नबांधणीसाठी लेखाशिर्ष २७१ अंतर्गत ४० लाखांचा निधी मिळाला होता व त्यातील ३४ लाख १७ हजार २०० रूपये खर्च झाले आहेत. वीज, अपघात व पुरामुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास जनावरे खरेदीसाठी लेखाशिर्ष ३१५ अंतर्गत आठ लाखांचा निधी मिळाला होता. मात्र यात नऊ लाख ८९ हजार ६०० रूपयांचा खर्च झाला आहे. वीज पडून माणसाचा मृत्यू झाल्यास मदत म्हणून २४४ लेखाशिर्षांतर्गत आठ लाखांचा खर्च झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यात फक्त ४५ हजार रूपयेच मिळाले होते. पूर परिस्थितीत नागरिकांची राहण्याची सोय, औषधोपचार व जेवणावर खर्चासाठी २१७ लेखाशिर्षांतर्गत दोन लाख रूपये मिळाले असून सध्यातरी यावर काहीच खर्च करण्यात आले नाही.