शहरं
Join us  
Trending Stories
1
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
2
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
3
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
4
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
5
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
6
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
7
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
8
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
9
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
10
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
11
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
12
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
13
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
14
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
15
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
16
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
17
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
18
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
19
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
20
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

सालेकसा तालुक्यात ६० टक्के मुली उच्चशिक्षणापासून दूर

By admin | Updated: January 3, 2017 00:33 IST

दरवर्षी आपण ३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिवस दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.

परंपरेच्या बेड्यातून मुक्ती नाहीच : पुरुषप्रधान संस्कृतीमुळे महिला निर्णयाच्या अधिकारापासून वंचित विजय मानकर ल्ल सालेकसा दरवर्षी आपण ३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिवस दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाईनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याची आठवण यानिमित्ताने केली जाते. तसेच जयंतीचेनिमित्त मुलीच्या शिक्षणाबद्दल मुल्यांकन केले जात असते. परंतु समाजातील वास्तव एवढे गंभीर आहे की वेगवेगळ्या कारणांमुळे ग्रामीण महिला शिक्षण, स्वातंत्र्य, समता, स्वालंबनच्या बाबतीत कोसोदूर आहेत. सालेकसा तालुक्यात आजही ६० टक्के मुली उच्च शिक्षणापासून (महाविद्यालयापासून) दूरच आहेत. ८० ते ९० टक्के महिला आजही पुरुषाच्या मर्जीशिवाय घराबाहेर पाय ठेवू शकत नाहीत. ५० टक्यांपेक्षा जास्त महिला आजही वेगवेगळ्या अत्याचाराला बळी पडतात. यावरुन एक प्रश्न उद्भवतो की जमिनीवर खऱ्या अर्थाने महिलांना वेग वेगळ्या बंधनातून मुक्ती केव्हा मिळणार. महिलांना मुक्तीच्या मार्गावर नेण्यासाठी सामाजिक परंपरा व रुढी आदीच्या रुपात लागलेल्या कुलूपाची किल्ली म्हणजे शिक्षण. शिक्षण घेतल्याशिवाय महिलाचा सर्वांगिण विकास होणे कठिण आहे. परंतु शिक्षणाच्या मार्गावर चालताना मार्ग मधातच संपणाारी यात्रा दाखवत असेल तर शिक्षण कसे पूर्ण होणार? सालेकसा तालुका हा मागासलेला गरीब आदिवासी तालुका असून या तालुक्यात महिलांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे दोन महत्वाचे कारण जास्त प्रभावीरित्या डोकावताना दिसून येतात असे या तालुक्यात नजर टाकल्यास आढळले यात पहिला कारण म्हणजे आर्थिक दुर्बलता आणि दुसरा म्हणजे घातक सामाजिक रुढी प्रथा व परंपरा मुलीच्या शिक्षणाबद्दल जमिनी वास्तव पाहिल्यावर असे आढळून आले की मुख्यालयाशी संबंधीत क्षेत्रातील ३० टक्के मुली माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणापासून दूर होतात. तर सर्वसामान्य ग्रामीण भागात ६० टक्के मुली महाविद्यालयाच्या उंबरठ्यावर पोहचू शकत नाही. तर आदिवासी अतिदुर्गम भागातील ९० टक्के मुलींना महाविद्यालयातील पदवी अभ्यास क्रमापासून मुकावे लागते. या मागे वेगळेवेगळे कारण आढळून आले. यात तालुक्याला तीन भागात ठेवून वास्तव समजण्यासाठी अभ्यास केल्यावर असे समजले की पहिला भाग शहरीकरण झालेला म्हणजे मुख्यालयाचा व संलग्णीत भाग जेथे शिक्षणाचे साधन आहेत परंतु तरीसुद्धा ३० टक्के मुली महाविद्यालयात जात नाही. यात १० टक्के १२ वी नंतर लग्नाच्या बंधनात अडकून संसार चालवण्याचा ओढ्यात खली जातात. १० टक्के मुलीचे आई-वडील पुढे शिकविण्यात असमर्थता व्यक्त करतात. मुलीची इच्छा असेल तरी शिकवण नाही. तर १० टक्के मुली वेगवेगळ्या कारणामुळे महाविद्यालयापासून दूर राहतात. दुसरा भाग सर्व सामान्य शेतकरी वर्ग किंवा मध्यम वर्गाचा विचार केीला तर या वर्गातील ६० टक्के मुली महाविद्यालय पोहचू शकत नाही. यामध्ये २० टक्के मुली किंवा त्यापेक्षा जास्त या आई-वडीलांच्या मर्जीनुसारण लग्न करुन मधातच शिक्षण सोडून टाकतात. २० टक्के पालक मुलींना कॉलेजात पाठवू शकत नाही. तर २० टक्के मुली वेगवेगळ्या कारणामुळे पुढचे शिक्षण थांबवतात यात स ाधनांचा अभाव, अयोग्यता, प्रथा, परंपरा, व्यवस्थेची कमी इत्यादी अनेक कारणे आहेत. तिसरा भाग म्हणजे मागासलेला आदिवासी डोंगराळ भाग असून या भागातील ९० टक्ेक मुली आज ही महाविद्यालयीन शिक्षणापासून कोषो दूर आहेत. असे दिसून येत आहे. आदिवासी भागाचा ग्राऊंड रिपोर्ट बघितला तर असे दिसूनस येते की ६० टक्के पालक आपल्या मुलीला महाविद्यालयापर्यंत पाठविण्यात असमर्थ असतात. यात आर्थिक कमजोरी असून घरातील लोक शिक्षणाचा खर्च उचलण्यात असमर्थ असून उलट बारावी नंतरच्या मुलीला अर्थाजनासाठी उपयोग करुन घेतात व घर चालविण्यात मदत घेतात. तसेच सालेकसा तालुका हा भौगोलिक दुष्ट्या विस्तारलेला असून अनेक गावे मुख्यालयापासून फारच दूर दूर वर आहेत. आणखी महाविद्यालयीन शिक्षणाची सोय फक्त तालुक्याच्या ठिकाणाी आहे. मुलींना सायकलने प्रवारी करीत ३० कि.मी. लांब अंतर पार करणे अनेक प्रकारे दुर्लक्ष असतो. मुख्यालयाठिकाणी मुलीचे वस्तीगृह आहे. परंतु तिथे प्रवेश मर्यादा आहे. तसेच माध्यमिक ते महाविद्यलय सर्वांना प्रवेश देण्यात येतो. त्यामुळे महाविद्यालय मुलीची संख्या फार कमी असते. २० टक्के मुली विविध कारणामुळे महाविद्यालय जाऊ शकत नाही. असे एकंदरित तालुक्याचा वरवर आकडा काढला तर आज ही ६० टक्के मुली. माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक नंतर शिक्षणापासून वंचित राहतात. अशात मुलीचा शैक्षणिक त्याच बरोबर सामाजिक, आर्थिक विकास सुद्धा प्रभावित होताना दिसतो. सावित्रीबार्इंनी स्त्री शिक्षणासाठी क्रांतीची मशाल पेटविली व स्त्रींना शिक्षणाची दारे उघडण्यासाठी ऐतिहासिक प्रारंभ केला. त्यांच्या कार्याला १५० वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला, तरीही आजही समाज दारिद्र्य, वाईट प्रथा, परंपरा, मानसिक गुलामी, पडदा प्रथा इत्यादी कारणे, त्याचबरोबर साधनांचा अभाव मिळणाऱ्या सवलतींचा लाभ न घेते. इत्यादी कारणांमुळे ग्रामीण महिलांना अजून मुक्ती घेण्यास किती वर्षे लागतील हे सांगणे कठिण आहे.