शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

५६० प्रवाशांना परत केली बॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 21:47 IST

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या सुरक्षा विभागाद्वारे एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत १२ महिन्यांच्या कालावधीत ५६० बॅग व किंमती सामान संबंधित व्यक्तींना सोपविण्यात आले आहे.

ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा दलाची कामगिरी : एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ मधील कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या सुरक्षा विभागाद्वारे एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत १२ महिन्यांच्या कालावधीत ५६० बॅग व किंमती सामान संबंधित व्यक्तींना सोपविण्यात आले आहे. प्रवाशांना फोनद्वारे सूचना देवून त्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकीवर बोलविण्यात आले. कायदेशीररित्या सामान व बॅगची ओळख पटवून ५६० बॅग त्यांच्या ताब्यात देण्यात आल्या.रेल्वेमध्ये सर्वाधिक माल वाहतूक होते. शिवाय एक कोटी २० लाखांच्या जवळपास प्रवासी दररोज प्रवास करतात. तसेच दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या तिन्ही मंडळाद्वारे प्रवासी सुविधांवरही लक्ष दिले जात आहे. दपूम रेल्वेच्या तिन्ही मंडळांतर्गत ३१६ स्थानकांवर दिवसरात्र प्रवासी सुविधा प्रदान करीत ३५५ प्रवासी गाड्यांचे परिचालन दरदिवशी केले जात आहे. एवढ्या मोठ्या संख्येत लोक सुरक्षितपणे आपल्या गंतव्यापर्यंत रेल्वेद्वारे पोहोचविले जात आहेत. एखाद्या विषम परिस्थितीत प्रवाशांची टिष्ट्वट व एसएमएस तसेच हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार मिळते. त्यावर त्वरित कार्यवाही करून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे झोन अंतर्गत येणाºया स्थानकांत प्रवाशांद्वारे घाईगडबडीत बॅग सुटून जातात. त्यात रोख रकमेसह लॅपटॉप, किंमती दागिने, महागड्या वस्तू व प्रवाशांचे किंमती सामान असतात. याची सूचना संबंधित प्रवाशांकडून रेल्वेच्या सुरक्षा विभागाला दिली जाते. त्यानंतर प्रवाशांच्या सामानाचा शोध घेतला जातो. बॅग किंवा सामान मिळताच त्वरित या मंडळातील रेल्वे सुरक्षा दलाद्वारे कार्यवाही केली जाते. त्यात सामानांच्या मालकांचा शोध घेवून त्यांचा पत्ता लावला जातो. सामानांची ओळख पटवून त्यांचे सामान व साहित्य त्यांच्या ताब्यात दिले जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाबद्दल विश्वास वाढला आहे.याच दृष्टीने दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या सुरक्षा विभागाद्वारे एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत १२ महिन्यांच्या कालावधीत ५६० बॅग व किंमती सामान संबंधित व्यक्तींना सोपविण्यात आले आहे. प्रवाशांना फोनद्वारे सूचना देवून त्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकीवर बोलावून बॅगची ओळख पटवून त्यांना देण्यात आल्या.वर्षभरात ३१० बालकांना केले पालकांच्या स्वाधीनकाही कारणांमुळे दपूम रेल्वे स्थानकांमध्ये आपल्या कुटुंबीयांपासून दुरावलेले किंवा कौटुंबीक कारणांमुळे कुटुंबाला माहिती न करताच घरून निघून गेलेली अल्पवयीन मुले रेल्वे स्थानक व रेल्वे परिसरात आढळली. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या आर्थिक वर्षभरात अशा ३१० अल्पयीन बालकांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.तक्रार मिळताच केली जाते त्वरित कार्यवाहीया सर्व सामाजिक कार्यांना योग्यरित्या करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलने सीसीटीव्ही कॅमेºयांच्या संख्येत वाढ केली आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाला २४ तास नजर ठेवण्यास मदत होत आहे. त्याद्वारे संशयीतांची तपासणी केली जात आहे. आरपीएफ टिष्ट्वटर हँडल अकाऊंटसुद्धा प्रवाशांच्या सुविधांसाठी देण्यात आले आहे. तसेच प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आहे. त्यावर प्रवाशांची तक्रार मिळताच रेल्वे सुरक्षा दलद्वारे त्वरित कार्यवाही केली जात असल्याचे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले आहे.