शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
4
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
5
"मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून मला..," फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
7
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
8
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
9
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
10
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
11
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
12
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
13
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
14
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
15
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
16
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
17
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
18
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
19
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
20
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई

सैराट झालेल्या ५५ मुली घरी परतल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:30 IST

प्रेमाच्या आमिषाला बळी पडलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेकडो मुली सैराट झाल्या होत्या. ज्या तरूणासोबत सुखी संसार करण्याचे स्वप्न त्या मुलींनी रंगविले होते ते स्वप्न पळून गेल्यानंतर काही दिवसांतच धुळीस मिळाले. अखेर प्रेमभंग झालेल्या त्या ५५ मुली गोंदिया पोलिसांच्या मदतीने आपल्या आई-वडिलांकडे परतल्या आहेत.

ठळक मुद्दे७ मुली रेकॉर्डवरच नव्हत्या : ४८ मुली होत्या पोलिसांच्या रेकॉर्डवर

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रेमाच्या आमिषाला बळी पडलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेकडो मुली सैराट झाल्या होत्या. ज्या तरूणासोबत सुखी संसार करण्याचे स्वप्न त्या मुलींनी रंगविले होते ते स्वप्न पळून गेल्यानंतर काही दिवसांतच धुळीस मिळाले. अखेर प्रेमभंग झालेल्या त्या ५५ मुली गोंदिया पोलिसांच्या मदतीने आपल्या आई-वडिलांकडे परतल्या आहेत.सैराट या सिनेमाने धुमच केली होती. त्या चित्रपटातून समाजातील वास्तव स्थितीचे जिवंत चित्रण समाजापुढे मांडण्यात आले. परंतु आपले जीवन उद्ध्वस्त होऊ शकते असा अर्थबोध घेण्यापेक्षा त्या सिनेमातील नायक-नायीका पळून जाते म्हणून आपणही पळून जाऊ असा चुकीचा अर्थ काढणाऱ्या शेकडो मुली मागील तीन वर्षात पळून गेल्या होत्या. पळून गेलेल्या गोंदिया जिल्ह्यातील १८ वर्षाखालील ५५ मुलींना मागील ५ आॅपरेशन मुस्कानच्या माध्यमातून घरी आणण्यात आले.आई-वडील मुला-मुलींना आदर्श नागरिक घडविण्याचे स्वप्न रंगवत असताना त्यांनी आई-वडिलांच्या आशेवर पाणी फेरून आपल्या प्रियकरासोबत पलायन केले. सर्वच साधने सहजरित्या उपलब्ध झाल्याने आता कोवळ्या वयातच प्रेमाचे आकर्षण अनेक मुला-मुलींंना वाटू लागते. शिक्षण घेणाºया मुला-मुलींकडे मोबाईल दिला जातो. त्यामुळे ते मोबाईलच्या माध्यमातून सतत एकमेकांच्या संपर्कात राहतात. मोबाईलचा चांगल्या गोष्टींसाठी वापर करण्याच्या हेतूने आई-वडील त्यांना मोबाईल देतात. परंतु त्याच्या विपरीत जाऊन आपले प्रेम फुलविण्यासाठी या मोबाईलचा अधिक वापर होत आहे. गोंदिया जिल्ह्यात प्रेमाचे आमिष देत तरूणींचे लैंगीक शोषण करण्याचेही प्रमाण मोठे आहे.अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून प्रेमाच्या नाट्यातून त्यांचे लैंगिक शोषण करणारे कमी नाही. वर्ष दोन वर्ष प्रेमाच्या आणाभाका केल्यावर त्या मुलींना वाºयावर सोडण्याचेही प्रकार जिल्ह्यात झाले आहेत.शिकवणीला जाण्याच्या नावावर पसारगोंदिया जिल्ह्यातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलींची माहिती घेतली असता सर्वात जास्त मुली गोंदिया शहरातून पळून गेल्या आहेत. गोंदिया शहरातून ज्या मुली पळून गेल्या त्यातील बहुतांश मुली शिकवणी वर्गाच्या नावावर घरातून बाहेर पडल्या होत्या. शिकवणी वर्गासाठी जाणाºया मुली प्रियकरासोबत दररोज सायंकाळी किंवा सकाळीच भेटून आपल्या प्रेमकहाणीचा पुढचा पाढा शिकवणी वर्गाच्या नावावरच गात असतात. आईवडीलांनी या प्रकाराकडे लक्ष घालणे आवश्यक आहे.पालक तक्रारही करीत नाहीतपोलिसांनी ५ वेळा आॅपरेशन मुस्कान राबविले. यावर नजर टाकली असता अनेक पालक आपली मुलगी पळून गेली किंवा बेपत्ता आहे अशी तक्रारही करीत नाही. तिने आम्हची मान खाली केली ती आता आम्हच्या कुटुंबातील सदस्यांपैकी नाही असे गृहीत धरून ती बेपत्ता झाली किंवा तिचे अपहरण झाले अशी तक्रारही करीत नाही. आॅपरेशन १ मध्ये ५ मुली व आॅपरेशन २ मध्ये २ मुली ज्या मिळाल्या त्या रेकॉर्डवरच नव्हत्या. आॅपरेशन १ मध्ये रेकॉर्डवरील १२ मुली, आॅपरेशन नंतर ७ मुली, आॅपरेशन २ मध्ये आॅपरेशन नंतर २ मुली, आॅपरेशन ३ मध्ये रेकॉर्डवरील १ मुलगी, आॅपरेशन नंतर ३ मुली, आॅपरेशन ४ मध्ये रेकॉर्डवरील ४ मुली, आॅपरेशन नंतर २ मुली, आॅपरेशन ५ मध्ये रेकॉर्डवरील २ मुली, आॅपरेशन नंतर १५ मुली अशा रेकॉर्डवरील ४८ व रेकॉर्ड व्यतीरिक्त ७ आा ५५ मुली घरी आल्या आहेत.परतलेल्या मुलींचे नशीब चांगले होते, की त्यांचे आई-वडील सैराट सिनेमातील नायीकेच्या आई वडीलांसारखे नव्हते. एकदा पळून गेलेल्या मुलींना स्वीकारायला खूप मोठी हिंमत लागते. ती हिंमत गोंदिया जिल्ह्यातील त्या मुलींच्या आई-वडिलांनी दाखविली. आई-वडिलांचा आदर्श मुला-मुलींनी ठेवून त्यांची आब्रू राखावी.-हरिष बैजल पोलीस अधिक्षक गोंदिया.