शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

५३४४ जणांना गुरूजींचे वेध

By admin | Updated: January 17, 2016 01:35 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सन २०१५ साठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा शनिवारी रोजी घेण्यात आली.

गोंदिया : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सन २०१५ साठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा शनिवारी रोजी घेण्यात आली. या परीक्षेत डीएडच्या ३ हजार ५७७ तर बीएडच्या १ हजार ७६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. जिल्ह्यातील २४ केंद्रावरुन ही परीक्षा घेण्यात आली आहे.ही परीक्षा सुरक्षित पार पडावी, यासाठी सात पथके तयार करण्यात आली होती. या परीक्षा केंद्रावर या पथकाची निगरानी होती. मात्र परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घण्यात आली. यापूर्वी १५ डिसेंबर २०१३ ला पहिली परीक्षा व १४ डिसेंबर २०१४ ला दुसरी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर सन २०१५ या वर्षासाठी आज (दि.१६) तिसरी परीक्षा घेण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी शहरातील २४ केंद्राची निवड करण्यात आली होती. यामध्ये डी.टी.एड. पात्रताधारक ३ हजार ८३० विद्यार्थ्यांसाठी १५ केंद्र तर बी.एड. पात्रताधारक १ हजार ८९० विद्यार्थ्यांसाठी ९ केंद्राची निवड करण्यात आली होती. परीक्षा सकाळ व दुपार अशा दोन पाळीत घेण्यात आली आहे. यामध्ये रविंद्रनाथ टागोर बंगाली हायस्कूल येथे उर्दू व इंग्रजी माध्यमासाठी दोन केंद्र होते त्यात डी.एड.चे ४० तर बी.एड.चे ५९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विवेक मंदिर शाळेत एका केंद्रावरून ६०० विद्यार्थी, बी.एन.आदर्श सिंधी हायस्कूल येथून ८०० विद्यार्थी, मनोहर म्यु. हॉयर सेकंडरी शाळेतून ६५० विद्यार्थी, मनोहरभाई कनिष्ठ महाविद्यालयातून ४०० विद्यार्थी, राजस्थानी कन्या हायस्कूल येथून ५००, महावीर मारवाडी शाळेत ७००, गुजराती नॅशनल हायस्कूल ४०६, एस.एस.गर्ल्स हायस्कूल येथून २००, सरस्वती महिला विद्यालय पुनाटोली २७५, जे.एम.हायस्कूल पुनाटोली २५०, जानकीदेवी चौरागडे हायस्कूल २००, एस.एस.गर्ल्स महाविद्यालयात ३०० व गोंदिया पब्लीक शाळा या केंद्रावर ३४० विद्यार्थ्यानी परीक्षा दिली. एकूण २४ केंद्राच्या माध्यमातून ५ हजार ७२० विद्यार्थी परीक्षेला बसणार होते. परंतु डीएडचे ३ हजार ५७७ व बीएडचे १ हजार ७६७ असे एकूण ५ हजार ३४४ जणांनी परीक्षा दिली आहे. या परीक्षेला डीएडचे २५३ तर बीएडचे १२३ परीक्षार्थी गैरहजर होते. प्रत्येक केंद्रावर परीक्ष सुरळीत पार पाडण्यासाठी ६ झोनल अधिकारी, २ सहायक परीक्षक तर प्रत्येक केंद्रावर १ केंद्र संचालक होते. २५ विद्यार्थ्यांमागे १ समवेक्षक तर १२५ विद्यार्थ्यांमध्ये १ पर्यवेक्षकाची निवड करण्यात आली होती. मागील ३ वर्षापासून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेतली जात आहे. मात्र यापूर्वीच्या घेण्यात आलेल्या दोन्ही परीक्षेपेक्षा परीक्षार्थ्यांची संख्या रोडावली आहे. या परीक्षेमुळे डीटीएड व बीएडच्या विद्यार्थ्यांमधील गुणांची चाचपणी केली जाणार आहे, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी यांनी दिली आहे.(तालुका प्रतिनिधी)परीक्षेसाठी सात भरारी पथकमहाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा जिल्ह्यातील २४ केंद्रावरून घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाच्या वतीने सात भरारी पथके तयार करण्यात आली होती. यात जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यपालन अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी,माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण व डॉयट प्राचार्य यांचे प्रत्येकी एक असे सात भरारी पथक तयार करण्यात आले होते.