शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

५३४४ जणांना गुरूजींचे वेध

By admin | Updated: January 17, 2016 01:35 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सन २०१५ साठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा शनिवारी रोजी घेण्यात आली.

गोंदिया : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सन २०१५ साठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा शनिवारी रोजी घेण्यात आली. या परीक्षेत डीएडच्या ३ हजार ५७७ तर बीएडच्या १ हजार ७६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. जिल्ह्यातील २४ केंद्रावरुन ही परीक्षा घेण्यात आली आहे.ही परीक्षा सुरक्षित पार पडावी, यासाठी सात पथके तयार करण्यात आली होती. या परीक्षा केंद्रावर या पथकाची निगरानी होती. मात्र परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घण्यात आली. यापूर्वी १५ डिसेंबर २०१३ ला पहिली परीक्षा व १४ डिसेंबर २०१४ ला दुसरी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर सन २०१५ या वर्षासाठी आज (दि.१६) तिसरी परीक्षा घेण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी शहरातील २४ केंद्राची निवड करण्यात आली होती. यामध्ये डी.टी.एड. पात्रताधारक ३ हजार ८३० विद्यार्थ्यांसाठी १५ केंद्र तर बी.एड. पात्रताधारक १ हजार ८९० विद्यार्थ्यांसाठी ९ केंद्राची निवड करण्यात आली होती. परीक्षा सकाळ व दुपार अशा दोन पाळीत घेण्यात आली आहे. यामध्ये रविंद्रनाथ टागोर बंगाली हायस्कूल येथे उर्दू व इंग्रजी माध्यमासाठी दोन केंद्र होते त्यात डी.एड.चे ४० तर बी.एड.चे ५९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विवेक मंदिर शाळेत एका केंद्रावरून ६०० विद्यार्थी, बी.एन.आदर्श सिंधी हायस्कूल येथून ८०० विद्यार्थी, मनोहर म्यु. हॉयर सेकंडरी शाळेतून ६५० विद्यार्थी, मनोहरभाई कनिष्ठ महाविद्यालयातून ४०० विद्यार्थी, राजस्थानी कन्या हायस्कूल येथून ५००, महावीर मारवाडी शाळेत ७००, गुजराती नॅशनल हायस्कूल ४०६, एस.एस.गर्ल्स हायस्कूल येथून २००, सरस्वती महिला विद्यालय पुनाटोली २७५, जे.एम.हायस्कूल पुनाटोली २५०, जानकीदेवी चौरागडे हायस्कूल २००, एस.एस.गर्ल्स महाविद्यालयात ३०० व गोंदिया पब्लीक शाळा या केंद्रावर ३४० विद्यार्थ्यानी परीक्षा दिली. एकूण २४ केंद्राच्या माध्यमातून ५ हजार ७२० विद्यार्थी परीक्षेला बसणार होते. परंतु डीएडचे ३ हजार ५७७ व बीएडचे १ हजार ७६७ असे एकूण ५ हजार ३४४ जणांनी परीक्षा दिली आहे. या परीक्षेला डीएडचे २५३ तर बीएडचे १२३ परीक्षार्थी गैरहजर होते. प्रत्येक केंद्रावर परीक्ष सुरळीत पार पाडण्यासाठी ६ झोनल अधिकारी, २ सहायक परीक्षक तर प्रत्येक केंद्रावर १ केंद्र संचालक होते. २५ विद्यार्थ्यांमागे १ समवेक्षक तर १२५ विद्यार्थ्यांमध्ये १ पर्यवेक्षकाची निवड करण्यात आली होती. मागील ३ वर्षापासून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेतली जात आहे. मात्र यापूर्वीच्या घेण्यात आलेल्या दोन्ही परीक्षेपेक्षा परीक्षार्थ्यांची संख्या रोडावली आहे. या परीक्षेमुळे डीटीएड व बीएडच्या विद्यार्थ्यांमधील गुणांची चाचपणी केली जाणार आहे, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी यांनी दिली आहे.(तालुका प्रतिनिधी)परीक्षेसाठी सात भरारी पथकमहाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा जिल्ह्यातील २४ केंद्रावरून घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाच्या वतीने सात भरारी पथके तयार करण्यात आली होती. यात जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यपालन अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी,माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण व डॉयट प्राचार्य यांचे प्रत्येकी एक असे सात भरारी पथक तयार करण्यात आले होते.