शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

४९ तलावातून काढला गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 20:39 IST

ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४९ तलावांतून गाळ काढण्याचे कार्य योजनेच्या पहिल्या वर्षात करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार : २४ हजार घनमीटर गाळाचा उपसा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४९ तलावांतून गाळ काढण्याचे कार्य योजनेच्या पहिल्या वर्षात करण्यात आले आहे. यांतर्गत तलावांतून २४ हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. शेतात टाकण्यात आलेल्या या गाळामुळे शेतीची उत्पादकता वाढली असून शेतकºयांची आर्थिक स्थिती सुधारण्यासही मदत होणार आहे.तलावाचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. सोळाव्या शतकात इथल्या मालगुजारांनी सिंचनाची व्यवस्था म्हणून आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तलावांची निर्मिती केली. स्वातंत्र्योत्तर काळात शासनाने सिंचनासाठी धरणे बांधली. आता या तलाव आणि धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे तलाव आणि धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. यांना पुनर्जीवित करु न त्यांची मुळ साठवण क्षमता पुनर्स्थापित करण्यासोबतच कृषी उत्पन्नात भरीव वाढ देखील होत आहे.यासाठी राज्य शासनाने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही अभिनव योजना ६ मे २०१७ च्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयानुसार राबविण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात या योजनेला लोकचळवळीचे स्वरु प प्राप्त झाले. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील २९० तलावांची निवड गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेत पहिल्या वर्षी करण्यात आली. त्यापैकी ४९ तलावांमधून गाळ काढण्याचे काम करण्यात आले.लोकसहभागाच्या या कामात ३७२ शेतकºयांनी देखील आपला सहभाग नोंदवून लाभ घेतला. जिल्ह्यातील ९ ग्रामपंचायती अंतर्गत ही कामे करण्यात आली. तलावात साचलेला सुपिक गाळ शेतीमध्ये टाकून शेतीची उत्पादकता वाढविण्यावर भर देण्यात आला. जवळपास २४ हजार ९३.२ घनमीटर गाळ तलावांमधून काढण्यात आला. काढलेला काही गाळ ४४ हेक्टर शेतीत टाकण्यात आला. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतून पहिल्या वर्षी करण्यात आलेल्या या कामामधून जलसाठ्यांची पुनर्स्थापना करण्यात हातभार तर लागलाच सोबत जलस्त्रोतांच्या उपलब्धतेत शाश्वत स्वरु पात वाढ होण्यास मदत झाली.या योजनेतून गाळ काढण्याच्या कार्यक्र माचा ३७२ शेतकºयांनी लाभ तर घेतलाच सोबत या योजनेत त्यांचा सहभाग देखील महत्वपूर्ण ठरला. त्यामुळे या शेतकºयांना शेतीसाठी लागणाºया खताच्या खर्चात बचत झाली. या योजनेमुळे तलाव गाळमुक्त होण्यास मदत तर होतच आहे सोबत शेती गाळयुक्त होत आहे. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढत आहे. उत्पादकता वाढीमुळे शेतकºयांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होत आहे.