शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बालकल्याणने केले ४७ बालकांचे संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:16 IST

विखुरलेल्या वाड्या, वस्त्या, बेघर, अनाथ, मात्यापित्यांचे संरक्षण नसलेली बालके, रस्त्यावर, रेल्वे स्थानकावर भीक मागणारी मुले, दुर्बल घटक व वंचीत गटातील बालकांचे संगोपण करण्याचे काम भारत सरकारने सुरू केले आहे.

ठळक मुद्देवर्षभराचा आढावा : २८ बालके पालकांच्या स्वाधीन

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विखुरलेल्या वाड्या, वस्त्या, बेघर, अनाथ, मात्यापित्यांचे संरक्षण नसलेली बालके, रस्त्यावर, रेल्वे स्थानकावर भीक मागणारी मुले, दुर्बल घटक व वंचीत गटातील बालकांचे संगोपण करण्याचे काम भारत सरकारने सुरू केले आहे. १ सप्टेंबर २०१७ ते ३१ आॅगस्ट २०१८ या वर्षभरात गोंदिया जिल्ह्यातील ४७ बालकांचे संगोपन महिला बाल कल्याण संरक्षण समितीने केले आहे.निराधार, निराश्रीत, विधवा, परित्यक्ता व एडस्ग्रस्त अश्या महिलांच्या मुलांच्या संगोपनासाठी शासनातर्फे बाल संगोपन योजना राबविली जाते. गोंदिया जिल्ह्यातील ३९२ बालकांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. बाल संगोपन योजनेचा लाभ घेणाऱ्या बालकांना प्रत्येक महिन्याला कार्यालयांतर्गत असलेल्या चालकांना ४२५ रुपये तर संस्थेअंतर्गत असलेल्या बालकांना ५०० रूपये महिन्याकाठी लाभ देण्यात येतो. त्या बालकांचा शैक्षणिक दर्जा वाढावा, त्याच्या मातांना त्यांचे पोषण करता यावे, यासाठी दरमहिन्याला त्या बालकांच्या मातांच्या खात्यांवर हे पैसे टाकले जातात. मुलगा १८ वर्षाचा होईपर्यंत त्यांना बालसंगोपण योजनेचा लाभ देण्यात येतो. यासाठी वर्षातून दोन वेळा या योजनेचा निधी बाल विकास विभागाला येत असतो.महिला बाल संरक्षण समितीने वर्षभरात २१ मुले २६ मुली अश्या ४७ बालकांची प्रकरणे हाताळलीे आहेत. संस्थेत दाखल करण्यात आलेल्या १५ बालकांपैकी ४ मुले ११ मुलींचा समावेश आहे.२८ बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यात १७ मुले व ११ मुलींचा समावेश आहे. एक मुलगी अनाथ सापडली होती.एक परित्यागीत मुलगी सापडली होती. या समितीने ४ बालकांना दत्तकासाठी विधीमुक्त केले. जिल्ह्याबाहेर ६ बालके मिळाली होती. त्यात एक मुलगा व ५ मुलींचा समावेश आहे. जिल्ह्यातून दुसºया जिल्ह्यात २ बालके पाठविण्यात आली.३९२ बालकांचे करताहेत संगोपननिराधार, निराश्रीत, विधवा, परित्यक्ता व एडस्ग्रस्त अश्या महिलांच्या मुलांच्या संगोपन महिला बालक कल्याण समितीतर्फे करण्यात येत आहे. सध्यास्थितीत १८७ मुले व २०५ मुली अश्या ३९२ बालकांचे संगोपण करण्यात येत आहे. संस्थेंतर्गत नुतनीकरण्यात आलेली बालके २१, चालू वर्षात संस्थेंतर्गत दाखल ३ बालके, संस्था बाह्य व वैयक्तीक नोंदणी करण्यात आलेली १९३ बालके, चालू वर्षात संस्था बाह्य व वैयक्तीक नोंदणी करण्यात आलेली १७५ बालकांचा समावेश आहे.निरीक्षण गृह नाहीछोट्या-मोठ्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या विधी संघर्षीत बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा स्तरावर बाल निरीक्षण गृह असायला हवे. परंतु गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीला १९ वर्षाचा कालावधी लोटूनही गोंदिया जिल्ह्यात विधी संघर्षीत बालकांसाठी निरीक्षण गृह नसल्याने त्या बालकांना भंडारा, नागपूर याठिकाणी पाठवावे लागते.समाजातील वंचीत घटकाला न्याय देण्यासाठी बाल संगोपण योजनेचा लाभ शासनाकडून देण्यात येतो. गरजू बालके, अनाथ ज्यांचे पालन पोषण करण्यास पालक असमर्थ असतील अश्या पालकांना बाल संगोपण योजनेचा लाभ देण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा.-डॉ.माधुरी नासरेअध्यक्ष बाल कल्याण समिती गोंदिया.