शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
6
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
7
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
8
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
9
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

बालकल्याणने केले ४७ बालकांचे संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:16 IST

विखुरलेल्या वाड्या, वस्त्या, बेघर, अनाथ, मात्यापित्यांचे संरक्षण नसलेली बालके, रस्त्यावर, रेल्वे स्थानकावर भीक मागणारी मुले, दुर्बल घटक व वंचीत गटातील बालकांचे संगोपण करण्याचे काम भारत सरकारने सुरू केले आहे.

ठळक मुद्देवर्षभराचा आढावा : २८ बालके पालकांच्या स्वाधीन

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विखुरलेल्या वाड्या, वस्त्या, बेघर, अनाथ, मात्यापित्यांचे संरक्षण नसलेली बालके, रस्त्यावर, रेल्वे स्थानकावर भीक मागणारी मुले, दुर्बल घटक व वंचीत गटातील बालकांचे संगोपण करण्याचे काम भारत सरकारने सुरू केले आहे. १ सप्टेंबर २०१७ ते ३१ आॅगस्ट २०१८ या वर्षभरात गोंदिया जिल्ह्यातील ४७ बालकांचे संगोपन महिला बाल कल्याण संरक्षण समितीने केले आहे.निराधार, निराश्रीत, विधवा, परित्यक्ता व एडस्ग्रस्त अश्या महिलांच्या मुलांच्या संगोपनासाठी शासनातर्फे बाल संगोपन योजना राबविली जाते. गोंदिया जिल्ह्यातील ३९२ बालकांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. बाल संगोपन योजनेचा लाभ घेणाऱ्या बालकांना प्रत्येक महिन्याला कार्यालयांतर्गत असलेल्या चालकांना ४२५ रुपये तर संस्थेअंतर्गत असलेल्या बालकांना ५०० रूपये महिन्याकाठी लाभ देण्यात येतो. त्या बालकांचा शैक्षणिक दर्जा वाढावा, त्याच्या मातांना त्यांचे पोषण करता यावे, यासाठी दरमहिन्याला त्या बालकांच्या मातांच्या खात्यांवर हे पैसे टाकले जातात. मुलगा १८ वर्षाचा होईपर्यंत त्यांना बालसंगोपण योजनेचा लाभ देण्यात येतो. यासाठी वर्षातून दोन वेळा या योजनेचा निधी बाल विकास विभागाला येत असतो.महिला बाल संरक्षण समितीने वर्षभरात २१ मुले २६ मुली अश्या ४७ बालकांची प्रकरणे हाताळलीे आहेत. संस्थेत दाखल करण्यात आलेल्या १५ बालकांपैकी ४ मुले ११ मुलींचा समावेश आहे.२८ बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यात १७ मुले व ११ मुलींचा समावेश आहे. एक मुलगी अनाथ सापडली होती.एक परित्यागीत मुलगी सापडली होती. या समितीने ४ बालकांना दत्तकासाठी विधीमुक्त केले. जिल्ह्याबाहेर ६ बालके मिळाली होती. त्यात एक मुलगा व ५ मुलींचा समावेश आहे. जिल्ह्यातून दुसºया जिल्ह्यात २ बालके पाठविण्यात आली.३९२ बालकांचे करताहेत संगोपननिराधार, निराश्रीत, विधवा, परित्यक्ता व एडस्ग्रस्त अश्या महिलांच्या मुलांच्या संगोपन महिला बालक कल्याण समितीतर्फे करण्यात येत आहे. सध्यास्थितीत १८७ मुले व २०५ मुली अश्या ३९२ बालकांचे संगोपण करण्यात येत आहे. संस्थेंतर्गत नुतनीकरण्यात आलेली बालके २१, चालू वर्षात संस्थेंतर्गत दाखल ३ बालके, संस्था बाह्य व वैयक्तीक नोंदणी करण्यात आलेली १९३ बालके, चालू वर्षात संस्था बाह्य व वैयक्तीक नोंदणी करण्यात आलेली १७५ बालकांचा समावेश आहे.निरीक्षण गृह नाहीछोट्या-मोठ्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या विधी संघर्षीत बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा स्तरावर बाल निरीक्षण गृह असायला हवे. परंतु गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीला १९ वर्षाचा कालावधी लोटूनही गोंदिया जिल्ह्यात विधी संघर्षीत बालकांसाठी निरीक्षण गृह नसल्याने त्या बालकांना भंडारा, नागपूर याठिकाणी पाठवावे लागते.समाजातील वंचीत घटकाला न्याय देण्यासाठी बाल संगोपण योजनेचा लाभ शासनाकडून देण्यात येतो. गरजू बालके, अनाथ ज्यांचे पालन पोषण करण्यास पालक असमर्थ असतील अश्या पालकांना बाल संगोपण योजनेचा लाभ देण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा.-डॉ.माधुरी नासरेअध्यक्ष बाल कल्याण समिती गोंदिया.