शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

४६ हजार महिलांची सक्षमतेकडे वाटचाल

By admin | Updated: October 10, 2015 02:16 IST

चूल आणि मूल या मर्यादित विश्वातून बाहेर येत जिल्ह्यातील सर्वसाधारण महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय ...

बचत गटांचा आधार : पदरमोड करून जमविले ८ कोटी ५८ लाखगोंदिया : चूल आणि मूल या मर्यादित विश्वातून बाहेर येत जिल्ह्यातील सर्वसाधारण महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय थाटत आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. ग्रामीण भागातील सावित्रीच्या लेकींचे हे कार्य इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) ग्रामीण महिलांना गावपातळीवर संघटित करुन त्यांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक बचतीची सवय लावली आहे. माविमंचे योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणामुळे अनेक महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी उद्योग व व्यवसायाची कास धरली आहे. सात तालुक्यात विशेष घटक योजना-१७७, सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना- ३५०, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक- ११०, स्वयंसिद्धा योजना-४०, तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम-६९३, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान - २११३ असे एकूण ३८८४ महिलांचे बचत गट माविमंकडून कार्यरत आहेत.उत्पन्न वाढीसाठी सुक्ष्म उपजिविका आराखडा तयार करण्यात आला आहे. बचत गटाच्या माध्यमातून शेळीपालन प्रकल्प, दुग्ध व्यवसाय, सामूहिक शेती, लाख उत्पादन, स्वस्त धान्य दुकान चालविणे, अंगणवाड्यांना आहार पुरवठा करणे, लाकडी नक्षीदार वस्तू तयार करणे, कुक्कुटपालन यासह अन्य उद्योग व्यवसाय बचत गटातील महिला करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)महिलांनी केली आठ कोटींची बचतमहिला आर्थिक विकास महामंडळाने अर्जुनी-मोरगाव तालुका वगळता उर्वरित सात तालुक्यातील ४१६ गावांमध्ये ३८८४ महिला बचत गटांची स्थापना केली. या माध्यमातून ४६ हजार ४७२ महिलांना संघटित करण्यात आले आहे. या महिलांनी पदरमोड करुन पै-पै जमवून तब्बल ८ कोटी ५८ लक्ष ४० हजार रुपयांची बचत केली आहे. बचतीची सवय आणि अंतर्गत पैशाचे आदान-प्रदान बघता बँकांनी छोट्या विविध प्रकारच्या उद्योग-वयवसायासाठी तब्बल ४१ कोटी ७५ लक्ष ३१ हजार ५०० रुपये कर्ज स्वरुपात बचत गटांना उपलब्ध करून दिले आहेत. उद्योग व्यवसाय करण्यास बचत गट सक्षम असल्याचा विश्वास मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन बँकांनी दाखविला आहे. गटांना घेतले ४२.७५ कोटींचे कर्ज उद्योग-व्यवसायासाठी आतापर्यंत ३१६० बचत गटांनी सन २००२ पासून सप्टेंबर २०१५ पर्यंत ४२ कोटी ७५ लक्ष ३१ हजार ५०० रुपयांचे बँक कर्ज घेतले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान माविमंच्या माध्यमातून तिरोडा आणि सालेकसा तालुक्यात राबविण्यात येत आहे. या तालुक्यातील ११३९ बचत गटांना प्रतिबचत गट १५ हजार रुपये याप्रमाणे १ कोटी ७० लक्ष ७५ हजार रुपये फिरता निधी वाटप केला आहे.जिल्ह्यातील ५७१ महिला बचत गटांना आयसीआयसीआय बँकेने सन २०१५-१६ या वर्षात सप्टेंबर २०१५ अखेर ५ कोटी ३७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकानी सप्टेंबर अखेर १२७ गटांना ८२ लक्ष ९५ हजार रुपये कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन दिले असल्याची माहिती माविमंचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोेसे यांनी दिली.