शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

४६ हजार महिलांची सक्षमतेकडे वाटचाल

By admin | Updated: October 10, 2015 02:16 IST

चूल आणि मूल या मर्यादित विश्वातून बाहेर येत जिल्ह्यातील सर्वसाधारण महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय ...

बचत गटांचा आधार : पदरमोड करून जमविले ८ कोटी ५८ लाखगोंदिया : चूल आणि मूल या मर्यादित विश्वातून बाहेर येत जिल्ह्यातील सर्वसाधारण महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय थाटत आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. ग्रामीण भागातील सावित्रीच्या लेकींचे हे कार्य इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) ग्रामीण महिलांना गावपातळीवर संघटित करुन त्यांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक बचतीची सवय लावली आहे. माविमंचे योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणामुळे अनेक महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी उद्योग व व्यवसायाची कास धरली आहे. सात तालुक्यात विशेष घटक योजना-१७७, सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना- ३५०, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक- ११०, स्वयंसिद्धा योजना-४०, तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम-६९३, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान - २११३ असे एकूण ३८८४ महिलांचे बचत गट माविमंकडून कार्यरत आहेत.उत्पन्न वाढीसाठी सुक्ष्म उपजिविका आराखडा तयार करण्यात आला आहे. बचत गटाच्या माध्यमातून शेळीपालन प्रकल्प, दुग्ध व्यवसाय, सामूहिक शेती, लाख उत्पादन, स्वस्त धान्य दुकान चालविणे, अंगणवाड्यांना आहार पुरवठा करणे, लाकडी नक्षीदार वस्तू तयार करणे, कुक्कुटपालन यासह अन्य उद्योग व्यवसाय बचत गटातील महिला करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)महिलांनी केली आठ कोटींची बचतमहिला आर्थिक विकास महामंडळाने अर्जुनी-मोरगाव तालुका वगळता उर्वरित सात तालुक्यातील ४१६ गावांमध्ये ३८८४ महिला बचत गटांची स्थापना केली. या माध्यमातून ४६ हजार ४७२ महिलांना संघटित करण्यात आले आहे. या महिलांनी पदरमोड करुन पै-पै जमवून तब्बल ८ कोटी ५८ लक्ष ४० हजार रुपयांची बचत केली आहे. बचतीची सवय आणि अंतर्गत पैशाचे आदान-प्रदान बघता बँकांनी छोट्या विविध प्रकारच्या उद्योग-वयवसायासाठी तब्बल ४१ कोटी ७५ लक्ष ३१ हजार ५०० रुपये कर्ज स्वरुपात बचत गटांना उपलब्ध करून दिले आहेत. उद्योग व्यवसाय करण्यास बचत गट सक्षम असल्याचा विश्वास मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन बँकांनी दाखविला आहे. गटांना घेतले ४२.७५ कोटींचे कर्ज उद्योग-व्यवसायासाठी आतापर्यंत ३१६० बचत गटांनी सन २००२ पासून सप्टेंबर २०१५ पर्यंत ४२ कोटी ७५ लक्ष ३१ हजार ५०० रुपयांचे बँक कर्ज घेतले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान माविमंच्या माध्यमातून तिरोडा आणि सालेकसा तालुक्यात राबविण्यात येत आहे. या तालुक्यातील ११३९ बचत गटांना प्रतिबचत गट १५ हजार रुपये याप्रमाणे १ कोटी ७० लक्ष ७५ हजार रुपये फिरता निधी वाटप केला आहे.जिल्ह्यातील ५७१ महिला बचत गटांना आयसीआयसीआय बँकेने सन २०१५-१६ या वर्षात सप्टेंबर २०१५ अखेर ५ कोटी ३७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकानी सप्टेंबर अखेर १२७ गटांना ८२ लक्ष ९५ हजार रुपये कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन दिले असल्याची माहिती माविमंचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोेसे यांनी दिली.