शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

४६ हजार विद्यार्थी देणार दहावी-बारावीची परीक्षा

By admin | Updated: February 19, 2017 00:05 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे येत्या २८ फेब्रुवारीपासून बारावीची तर ७ मार्चपासून दहावीची परीक्षा घेण्यात येत आहे.

दहावीचे पाच केंद्र उपद्रवी : बारावीसाठी ६९ तर दहावीसाठी ९८ केंद्र गोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे येत्या २८ फेब्रुवारीपासून बारावीची तर ७ मार्चपासून दहावीची परीक्षा घेण्यात येत आहे. यात जिल्ह्यातून बारावीचे २३ हजार २१३ तर दहावीचे २३ हजार ३६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा ‘टर्निंग पॉईंट’ म्हणून या बोर्डाच्या परीक्षा ओळखल्या जातात. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचा या परीक्षांमध्ये अव्वल येण्यासाठी प्रयत्न सुरू असतो तर अनेक विद्यार्थी केवळ या परीक्षेत उत्तीर्ण झालो तरी धन्य झालो असे म्हणून त्यासाठी विविध क्लृप्त्या लढवतात. यामुळे अनेक केंद्रांवर कॉपीसारखे प्रकार घडतात. त्याला आळा घालण्यासाठी भरारी पथकांची भेट आणि इतर उपाय शिक्षण विभागाने केले आहेत. इयत्ता बारावीसाठी गोंदिया तालुक्यातील २२ केंद्रावरून ७ हजार ४८६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. आमगाव तालुक्यातील ६ केंद्रांवरून २ हजार ४७ विद्यार्थी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ७ केंद्रांवरून २ हजार ५३८ विद्यार्थी, देवरी तालुक्यातील ५ केंद्रांवरून १ हजार ८३२ विद्यार्थी, गोरेगाव तालुक्यातील ७ केंद्रांवरून २ हजार ५०५ विद्यार्थी, सडक-अर्जुनी तालुक्यातील ६ केंद्रांवरून २ हजार ४८ विद्यार्थी, सालेकसा तालुक्यातील ६ केंद्रांवरून १ हजार ७१२ विद्यार्थी तर तिरोडा तालुक्यातील १० केंद्रांवरून ३ हजार ४५ विद्यार्थी असे एकूण ६९ केंद्रांवरून २३ हजार २१३ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. दहावीसाठी गोंदिया तालुक्यातील २९ केंद्रांवरून ६ हजार ९९८ विद्यार्थी, आमगाव तालुक्यातील १० केंद्रांवरून २ हजार ४२४ विद्यार्थी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १० केंद्रांवरून २ हजार ८२८ विद्याथीर्, देवरी तालुक्यातील ९ केंद्रांवरून १ हजार ९१६ विद्यार्थी, गोरेगाव तालुक्यातील ९ केंद्रांवरून २ हजार ३२९ विद्यार्थी, सडक-अर्जुनी तालुक्यातील ९ केंद्रांवरून १ हजार ८७६ विद्यार्थी, सालेकसा तालुक्यातील ७ केंद्रांवरून १ हजार ५३३ विद्यार्थी तर तिरोडा तालुक्यातील १५ केंद्रांवरून ३ हजार १३२ विद्यार्थी असे एकूण ९८ केंद्रांवरून २३ हजार ३६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. (तालुका प्रतिनिधी) सात भरारी पथके राहणार दहावी व बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथकांची निर्मीती करण्यात आली आहे. त्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे पथक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे पथक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, डायट प्राचार्य, महिला पथक, बोर्डाचे पथक व जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार एक पथक अशी सात पथके तयार करण्यात आली आहेत. ही आहेत उपद्रवी केंद्रे जिल्ह्यात इयत्ता बारावीचे एकही केंद्र उपद्रवी नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. परंतु इयत्ता दहावीचे पाच केंद्र उपद्रवी आहेत. त्यात जि.प. शाळा दवनीवाडा, सुदामा हायस्कूल नागरा, मिलींद विद्यालय चान्ना/बाक्टी, सालेकसा हायस्कूल सालेकसा व मानवता विद्यालय बेरडीपार या पाच केंद्रांचा समावेश आहे. या ठिकाणी कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आढळले आहेत.