शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

४६ हजार विद्यार्थी देणार दहावी-बारावीची परीक्षा

By admin | Updated: February 19, 2017 00:05 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे येत्या २८ फेब्रुवारीपासून बारावीची तर ७ मार्चपासून दहावीची परीक्षा घेण्यात येत आहे.

दहावीचे पाच केंद्र उपद्रवी : बारावीसाठी ६९ तर दहावीसाठी ९८ केंद्र गोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे येत्या २८ फेब्रुवारीपासून बारावीची तर ७ मार्चपासून दहावीची परीक्षा घेण्यात येत आहे. यात जिल्ह्यातून बारावीचे २३ हजार २१३ तर दहावीचे २३ हजार ३६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा ‘टर्निंग पॉईंट’ म्हणून या बोर्डाच्या परीक्षा ओळखल्या जातात. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचा या परीक्षांमध्ये अव्वल येण्यासाठी प्रयत्न सुरू असतो तर अनेक विद्यार्थी केवळ या परीक्षेत उत्तीर्ण झालो तरी धन्य झालो असे म्हणून त्यासाठी विविध क्लृप्त्या लढवतात. यामुळे अनेक केंद्रांवर कॉपीसारखे प्रकार घडतात. त्याला आळा घालण्यासाठी भरारी पथकांची भेट आणि इतर उपाय शिक्षण विभागाने केले आहेत. इयत्ता बारावीसाठी गोंदिया तालुक्यातील २२ केंद्रावरून ७ हजार ४८६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. आमगाव तालुक्यातील ६ केंद्रांवरून २ हजार ४७ विद्यार्थी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ७ केंद्रांवरून २ हजार ५३८ विद्यार्थी, देवरी तालुक्यातील ५ केंद्रांवरून १ हजार ८३२ विद्यार्थी, गोरेगाव तालुक्यातील ७ केंद्रांवरून २ हजार ५०५ विद्यार्थी, सडक-अर्जुनी तालुक्यातील ६ केंद्रांवरून २ हजार ४८ विद्यार्थी, सालेकसा तालुक्यातील ६ केंद्रांवरून १ हजार ७१२ विद्यार्थी तर तिरोडा तालुक्यातील १० केंद्रांवरून ३ हजार ४५ विद्यार्थी असे एकूण ६९ केंद्रांवरून २३ हजार २१३ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. दहावीसाठी गोंदिया तालुक्यातील २९ केंद्रांवरून ६ हजार ९९८ विद्यार्थी, आमगाव तालुक्यातील १० केंद्रांवरून २ हजार ४२४ विद्यार्थी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १० केंद्रांवरून २ हजार ८२८ विद्याथीर्, देवरी तालुक्यातील ९ केंद्रांवरून १ हजार ९१६ विद्यार्थी, गोरेगाव तालुक्यातील ९ केंद्रांवरून २ हजार ३२९ विद्यार्थी, सडक-अर्जुनी तालुक्यातील ९ केंद्रांवरून १ हजार ८७६ विद्यार्थी, सालेकसा तालुक्यातील ७ केंद्रांवरून १ हजार ५३३ विद्यार्थी तर तिरोडा तालुक्यातील १५ केंद्रांवरून ३ हजार १३२ विद्यार्थी असे एकूण ९८ केंद्रांवरून २३ हजार ३६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. (तालुका प्रतिनिधी) सात भरारी पथके राहणार दहावी व बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथकांची निर्मीती करण्यात आली आहे. त्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे पथक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे पथक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, डायट प्राचार्य, महिला पथक, बोर्डाचे पथक व जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार एक पथक अशी सात पथके तयार करण्यात आली आहेत. ही आहेत उपद्रवी केंद्रे जिल्ह्यात इयत्ता बारावीचे एकही केंद्र उपद्रवी नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. परंतु इयत्ता दहावीचे पाच केंद्र उपद्रवी आहेत. त्यात जि.प. शाळा दवनीवाडा, सुदामा हायस्कूल नागरा, मिलींद विद्यालय चान्ना/बाक्टी, सालेकसा हायस्कूल सालेकसा व मानवता विद्यालय बेरडीपार या पाच केंद्रांचा समावेश आहे. या ठिकाणी कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आढळले आहेत.