शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जिल्ह्यात लावणार ४५ लाख २९ हजार ५०० रोपटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 21:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाने सन २०१८ मध्ये राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केल्याने या संकल्पात गोंदिया जिल्ह्यात ४५ लाख २९ हजार ५०० रोपटी लावण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. विदेशी वृक्षांची रोपटे लावण्यापेक्षा देशी रोपट्यांना प्राथमिकता देत कोणती रोपटी किती टक्क्याप्रमाणे लावावी यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र ...

ठळक मुद्दे१३ कोटी वृक्ष लागवडीत सहभाग: देशी वृक्षांवर जिल्हाधिकाऱ्यांचा भर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाने सन २०१८ मध्ये राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केल्याने या संकल्पात गोंदिया जिल्ह्यात ४५ लाख २९ हजार ५०० रोपटी लावण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. विदेशी वृक्षांची रोपटे लावण्यापेक्षा देशी रोपट्यांना प्राथमिकता देत कोणती रोपटी किती टक्क्याप्रमाणे लावावी यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र शासनाने जुलै २०१७ मध्ये २ कोटी वृक्ष लागवड करण्याचा माणस बांधला होता. सन २०१८ मध्ये राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्र शासनाचा आहे. या संकल्पात गोंदिया जिल्ह्याचा वाटा ४५ लाख २९ हजार ५०० रोपट्यांचा राहणार आहे. यात प्रादेशिक वनविभाग १० लाख ७० हजार रोपटे लावेल. सामाजिक वनिकरण ५ लाख रोपटे, वनविकास महामंडळ (एफडीसीएम) ३ लाख, इतर विभागाकडून २० लाख ६० हजार ७२६, जिल्ह्यातील ५४५ ग्राम पंचायती ५ लाख ९९ हजार ५०० रोपटे लावणार आहेत. असे एकूण ४५ लाख २९ हजार ५०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी बहुतांश ठिकाणी खड्डे खोदण्याचे काम पूर्ण झाले. काही ठिकाणी खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे.देशी रोपट्यांना प्राधान्ययंदाच्या वृक्षारोपणात एकाच प्रजातीचे रोपटे एक टक्यापेक्षा जास्त लावणार नाहीत. परंतु देशी रोपट्यांना मोठ्या प्रमाणात लावले जाणार आहे. २५ टक्के वड, पिंपळ, उंबर ही रोपटे लावण्यात येणार आहेत. ७५ टक्के आवळा, करू, चारूळी, फळ झाडे व बांबू रोपटे लावली जातील. गोंदिया जिल्ह्यातील ५४५ ग्राम पंचायती गावातील रस्ता व स्माशन भूमीकडे जाणाºया रस्त्यावर वृक्षारोपण करतील. या रस्त्यासाठी १३५६.५४ हेक्टर क्षेत्र प्रपत्र ४ प्रमाणे वृक्षारोपणासाठी खुले आहे.मागच्या वर्षीची २७ टक्के रोपटी मेलीगोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ग्राम पंचायतींनी वृक्षारोपणाच्या कामात चांगले सहकार्य केले. या कामात सर्वात जास्त हलगर्जी आमगाव तालुक्याची झाली आहे. आमगाव तालुक्यात लावलेली ३५ टक्के रोपटी मेली आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३२ टक्के, देवरी तालुक्यातील १६ टक्के, गोंदिया तालुक्यातील ११ टक्के, गोरेगाव तालुक्यातील २८ टक्के, सालेकसा तालुक्यातील २९ टक्के, सडक-अर्जुनी तालुक्यातील २८ टक्के, तिरोडा तालुक्यातील २५ टक्के रोपटी मेली. जिल्ह्याची टक्केवारी पाहिली असता २७ टक्के रोपटी जगू शकली नाहीत.