शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

१२ पोलीस ठाण्यांतर्गत ४५ बालकांचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:35 IST

बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत आॅपरेशन मुस्कान अभियान राबविणे सुरू केले आहे.

ठळक मुद्देचार पोलीस ठाणे शांत : मिळालेल्या बालकांना करणार पालकांच्या स्वाधीन

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत आॅपरेशन मुस्कान अभियान राबविणे सुरू केले आहे. ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत न मिळालेल्या ४५ बालकांचा शोध पोलीस घेणार आहेत. यात ६ मुले व ३९ मुली अशा एकूण ४५ बालकांच्या शोधासाठी ६ वे आॅपरेशन मुस्कान गोंदिया जिल्हा पोलीस राबवित आहेत.मुलांकडून भीक मागविण्यासाठी लहान बालकांचे अपहरण करून मोठ्या शहरात नेले जाते. त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून मागविणे, तर काहींना वाममार्गाकडे वळविले जाते. मुलींना देह व्यवसायाच्या कामात लावण्यासाठी त्यांचे अपहरण केले जाते.१८ वर्षाखालील बेपत्ता व अपहरणाचे प्रमाण पाहून राज्य शासन या बालकांना शोधून त्यांच्या आईवडिलांच्या हवाली करण्यासाठी आॅपरेशन मुस्कान ही मोहीम राबवित आहे. या आॅपरेशनसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानके, रूग्णालय, उद्याने, चौक, रेल्वेस्थानक व सार्वजनिक ठिकाणी फिरस्ते किंवा भीक मागणाºया मुलांशी संपर्क केला जातो. त्या बालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेला स्वयंसेवी संस्थांचीही मदत मिळणे आवश्यक आहे. यापूर्वी राबविलेल्या पाच आॅपरेशनची फलश्रृती पाहता महाराष्टÑ शासनाने पुन्हा डिसेंबर महिनाभर ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.गोंदिया पोलीस दलाच्या अभिलेखावरील ४५ बालकांचा शोध घेण्यासाठी पोलीसांची चमू तयार झाली आहे.बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या ४५ बालकांत गोंदिया शहर ठाण्याच्या हद्दीतील १२ बालके, गोंदिया ग्रामीण ३, रावणवाडी ३, दवनीवाडा १, आमगाव ३, सालेकसा १, देवरी ४, अर्जुनी-मोरगाव ४, केशोरी १, तिरोडा ३, गोरेगाव ९, रामनगर १ अश्या ४५ बालकांपैकी ३९ मुली व ६ मुलांचा समावेश आहे.सामाजिक संघटना उदासीनया बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. परंतु या बालकांना त्यांच्या हक्काचे शिक्षण देणे या मूळ संकल्पनेला सर्वांनी तिलांजली देऊन फक्त त्यांना त्यांच्या आई-वडीलांच्या स्वाधीन करणे, आई-वडील नसल्यास बाल कल्याण समितीपुढे उभे करण्यापर्यंतचे काम पोलीस करतात. समितीने त्या बालकांना बाल सुधारगृहात पाठविण्यास सांगितल्यावर पोलीस त्या बालकांना नेऊन सोडून देतात. त्यानंतर त्या बालकांकडे दुर्लक्ष केले जाते. या बालकांचे शिक्षण व्हावे यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा होता. परंतु गोंदियातील कोणत्याही सामाजिक संघटना यापूर्वी पुढे आलेल्या नाहीत.त्यांचे जीवन फुलायला हवेबेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांना त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने आॅपरेशन मुस्कान प्रकल्पात पकडलेल्या अनेक बालकांचे जीवन आजही ‘जैसे थे’ आहे. आईवडील नसलेल्या बालकांना नागपूर येथील बाल सुधारगृहात पाठविण्यात येते व त्यांची स्थिती या अभियानानंतरही जशीच्या तशीच राहते.आॅपरेशन मुस्कानमध्ये काम करणारे पोलीस कर्मचारी स्वत:च्या अपहरण झालेल्या पाल्यांचा शोध घेण्यासाठी जेवढी मेहनत घेतील तेवढीच मेहनत सामान्य, गरीबांच्या मुला-मुलींना शोधण्यासाठी घेतील अशी अपेक्षा आहे.हरिष बैजलपोलीस अधीक्षक गोंदिया.