शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

लसीकरणात ४५-६० वयोगटाची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:29 IST

गोंदिया : कोरोनाला मात देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर जोर दिला आहे. शिवाय आता लसीला घेऊन नागरिकांतील संभ्रम ...

गोंदिया : कोरोनाला मात देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर जोर दिला आहे. शिवाय आता लसीला घेऊन नागरिकांतील संभ्रम ही काहीसा कमी होताना दिसत असून स्वेच्छेने नागरिक लसीकरणासाठी घराबाहेर पडत आहेत. यामुळेच आतापर्यंत जिल्ह्यात २१६०२५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात ४५-६० वयोगटातील नागरिकांची आघाडी असून ८३५७० नागरिकांनी लस घेतली आहे. तर ६० वर्षांवरील ७३९१३ ज्येष्ठांनीही लस घेतली आहे.

कोरोनाला मात देण्यासाठी देशात लसीकरणाला १५ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. अगोदर कोव्हॅक्सीन व कोव्हीशिल्ड या दोन लसींना शासनाने मंजुरी दिली होती. त्यानंतर आता आणखी काही लसींना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र सध्या तरी या दोनच लसींचा वापर देशात केला जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केल्याने जास्तीतजास्त लसीकरण करून कोरोनाला थोपविण्यावर शासनाचा भर आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यातही लसीकरणाची व्यापक मोहीम राबविली जात असून त्याला नागरिकांचा प्रतिसाद चांगला लाभत आहे.

जिल्ह्यात बुधवारपर्यंत (दि.१९) ची लसीकरणाची आकडेवारी बघितल्यास २१६०२५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. विशेष म्हणजे, लसीकरणासाठी आता नागरिक स्वत: केंद्रावर जाताना दिसत आहे. म्हणजेच, लसीला घेऊन असलेले संभ्रम व भीती आता कमी होताना दिसत आहे. लसीकरणासाठी शासकीय केंद्र असतानाच खाजगी हॉस्पिटल्सलाही परवानगी देण्यात आली आहे. लसीकरणात प्रामुख्याने ४५-६० वर्षे वयोगटातील नागरिकांची आघाडी दिसत असून ८३५७० नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. तर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकही काही कमी नसून ७३९१३ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. विशेष म्हणजे, लसीकरणासाठी आता नागरिक गर्दी करीत असल्याने लसीकरण केंद्रांमध्येही वाढ केली जात आहे. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होऊ नये.

----------------------------

१८-४४ वयोगटाच्या लसीकरणाची मागणी

शासनाने ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. मात्र मध्यंतरी कोरोनाची दुसरी लाट बघता १८ वर्षांवरील नागरिकांसाठीही लसीकरण सुरू करण्यात आले होते. यामध्ये ११६५२ नागरिकांनी लसीकरण करवून घेतले. काही दिवसच चाललेल्या या गटाच्या लसीकरणात ही संख्या मात्र खूप जास्त दिसत आहे. आता या गटाचे लसीकरण बंद असून या गटाचे लसीकरण सुरू करण्याची मागणी पालक व नागरिकांकडून केली जात आहे.