शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

४४८ ग्रामपंचायतींना मनरेगाच्या कामांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 22:49 IST

जिल्हा प्रशासनातर्फे मागील काही दिवसांपासून सर्वाधिक रोजगार उपलब्ध करुन दिल्याचा दावा केला जात आहे.

ठळक मुद्देरोजगारांची कामाच्या शोधात भटकंती : केवळ ९८ ग्रा.पं.मध्ये मनरेगाची कामे

आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्हा प्रशासनातर्फे मागील काही दिवसांपासून सर्वाधिक रोजगार उपलब्ध करुन दिल्याचा दावा केला जात आहे. मनरेगाच्या कामात जिल्ह्यातच नव्हे तर देशात आघाडी घेतल्याचे आठ दिवसांपूर्वी सांगण्यात आले. मात्र जिल्ह्यातील एकूण ५४६ ग्रामपंचायतपैकी केवळ ९८ ग्रा. पं. अंतर्गत मनरेगाची कामे सुरू असल्याची बाब पुढे आली आहे.अत्यल्प पाऊस आणि कीडरोगांमुळे खरीप हंगाम शेतकºयांच्या हातून गेला. तर रब्बीतील पिकांना गारपीट आणि वादळी पावसाचा तडाखा बसला. परिणामी शेतकºयांच्या हाताला काम नाही. मजुरांना रोजगारासाठी भटकावे लागू नये, यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कामे उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले. यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतींना कामांची यादी व प्रस्ताव मागविले आहे. जिल्ह्यात एकूण ५४८ ग्रामपंचायत असून यापैकी ९८ ग्रामपंचायत अंतर्गंत मनरेगाचीे ३६० कामे सुरू असून या कामांवर ६६ हजार ८४३ मजूर कार्यरत असल्याची माहिती आहे. तर उर्वरित ४४८ ग्रामपंचायत अंतर्गत मनरेगाची कामे सुरूच करण्यात आली नाही. त्यामुळे या गावातील मजुरांना रोजगाराच्या शोधात शहराकडे भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.मनरेगाची कामे राबविण्यात जिल्ह्यातील दोन ते तीन तालुके माघारल्याची माहिती आहे. एकीकडे गारपीट व वादळी पावसामुळे शेतीची कामे ठप्प आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला कामे नाहीत. त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. मात्र दुसरीकडे प्रशासनाकडून मनरेगाची कामे आणि सर्वाधिक रोजगार उपलब्ध करुन दिल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे मनरेगाची याशिवाय नेमकी पुन्हा कुठे कामे सुरू आहेत. असा सवाल उपस्थित केला जात आहे. गावा गावातील नेते व गावकरी मनरेगाची कामे सुरू करुन रोजगार उपलब्ध करुन देण्याची मागणी संबंधित यंत्रणेला करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.