शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

४४८ ग्रामपंचायतींना मनरेगाच्या कामांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 22:49 IST

जिल्हा प्रशासनातर्फे मागील काही दिवसांपासून सर्वाधिक रोजगार उपलब्ध करुन दिल्याचा दावा केला जात आहे.

ठळक मुद्देरोजगारांची कामाच्या शोधात भटकंती : केवळ ९८ ग्रा.पं.मध्ये मनरेगाची कामे

आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्हा प्रशासनातर्फे मागील काही दिवसांपासून सर्वाधिक रोजगार उपलब्ध करुन दिल्याचा दावा केला जात आहे. मनरेगाच्या कामात जिल्ह्यातच नव्हे तर देशात आघाडी घेतल्याचे आठ दिवसांपूर्वी सांगण्यात आले. मात्र जिल्ह्यातील एकूण ५४६ ग्रामपंचायतपैकी केवळ ९८ ग्रा. पं. अंतर्गत मनरेगाची कामे सुरू असल्याची बाब पुढे आली आहे.अत्यल्प पाऊस आणि कीडरोगांमुळे खरीप हंगाम शेतकºयांच्या हातून गेला. तर रब्बीतील पिकांना गारपीट आणि वादळी पावसाचा तडाखा बसला. परिणामी शेतकºयांच्या हाताला काम नाही. मजुरांना रोजगारासाठी भटकावे लागू नये, यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कामे उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले. यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतींना कामांची यादी व प्रस्ताव मागविले आहे. जिल्ह्यात एकूण ५४८ ग्रामपंचायत असून यापैकी ९८ ग्रामपंचायत अंतर्गंत मनरेगाचीे ३६० कामे सुरू असून या कामांवर ६६ हजार ८४३ मजूर कार्यरत असल्याची माहिती आहे. तर उर्वरित ४४८ ग्रामपंचायत अंतर्गत मनरेगाची कामे सुरूच करण्यात आली नाही. त्यामुळे या गावातील मजुरांना रोजगाराच्या शोधात शहराकडे भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.मनरेगाची कामे राबविण्यात जिल्ह्यातील दोन ते तीन तालुके माघारल्याची माहिती आहे. एकीकडे गारपीट व वादळी पावसामुळे शेतीची कामे ठप्प आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला कामे नाहीत. त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. मात्र दुसरीकडे प्रशासनाकडून मनरेगाची कामे आणि सर्वाधिक रोजगार उपलब्ध करुन दिल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे मनरेगाची याशिवाय नेमकी पुन्हा कुठे कामे सुरू आहेत. असा सवाल उपस्थित केला जात आहे. गावा गावातील नेते व गावकरी मनरेगाची कामे सुरू करुन रोजगार उपलब्ध करुन देण्याची मागणी संबंधित यंत्रणेला करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.