शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

४४ गावातील सातबारा होणार बिनचूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 20:45 IST

सातबाऱ्यातील त्रुटींमुळे अनेक शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. तर छोट्याशा त्रुटीमुळे त्यांना शासकीय कार्यालय आणि न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात.

ठळक मुद्देविनाशुल्क दुरूस्ती : आ.अग्रवाल यांचा पाठपुरावा

आॅनलाईन लोकमतगोंदिया : सातबाऱ्यातील त्रुटींमुळे अनेक शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. तर छोट्याशा त्रुटीमुळे त्यांना शासकीय कार्यालय आणि न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. हीे अडचण लक्षात घेत महसूल आणि भूमि अभिलेख विभागातर्फे जमिनीची पुर्नमोजणी करुन बिनचूक सातबारा तयार करुन दिला जाणार आहे. यासाठी शेतकºयांकडून कुठलेही शुल्क घेतले जाणार नाही.चकबंदीनंतर गोंदिया तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सातबारामध्ये त्रुटी आढळल्या. परिणामी शेतकऱ्यांना विविध अडचणीना सामोरे जावे लागत होते. तर अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत होते. सातबारातील त्रुटी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी भूमि अभिलेख आणि महसूल विभागाकडे अर्ज आणि शुल्क भरुन देखील रेकार्ड दुरूस्ती करुन देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. शेतकºयांची ही अडचण लक्षात घेत आ. गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्रुटी असलेल्या शेतकºयांच्या सातबाराची नि:शुल्क दुरूस्ती आणि पुर्नमोजणी करुन देण्याची मागणी केली. त्यानंतर महसूल विभागाने किती गावांमधील शेतकºयांच्या सातबारामध्ये त्रुटी आहेत, याचे सर्वेक्षण केले असता गोंदिया तालुक्यातील ४४ गावांमधील सातबारामध्ये सर्वाधिक त्रुटी आढळल्या. या सर्व त्रुटी संबंधित विभागाने जमिनीची पुर्नमोजणी करुन दुरूस्त करुन द्याव्यात. यासाठी आ. अग्रवाल यांनी महसूल विभागाचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, भूमि अभिलेख विभागाचे विभागीय उपसंचालक बाळासाहेब काळे, जमाबंदी आयुक्त आणि भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेतली. त्यानंतर महसूल विभागाचे सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सातबारामधील त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले. उपसंचालक काळे यांनी गोंदिया तालुका भूमि अभिलेख निरीक्षक पवार यांना दोन महिन्यात पुर्नमोजणीचे काम पूर्ण करुन सर्व शेतकºयांच्या सातबारामधील त्रुटी दूर करुन शेतकऱ्यांना सुधारित सातबारा वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला असून दुरूस्तीसाठी करावी लागणारी पायपीट सुद्धा कमी होणार आहे.चूक शासनाची, भुर्दंड शेतकऱ्यांना कासातबारामधील त्रुटीस महसूल आणि भूमिअभिलेख विभागाची यंत्रणा जबाबदार आहे. त्यात दुरूस्ती करून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून कुठलेही शुल्क वसूल करण्यात येऊ नये. त्रुटींना पूर्णपणे प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहे, मग त्याचा आर्थिक भूर्दंड शेतकऱ्यांना का? असा सवाल उपस्थितीत करित आ.अग्रवाल यांनी याला विरोध केला. तसेच एकाही शेतकºयाकडून शुल्क वसूल न करण्याची मागणी केली होती. त्याची शासनाने दखल घेत जमिनीची पुर्नमोजणी नि:शुल्क करुन देण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे.या गावातील सातबारात सर्वाधिक त्रुटीगोंदिया तालुक्यातील सातबारामध्ये सर्वाधिक त्रुटी असलेल्या गावांमध्ये एकोडी, गंगाझरी, महालगाव, मुरदाडा, अदासी, दतोरा, दागोटोला, नवरगाव खुर्द, पोवरीटोला, मोरवाही, आसोली, बटाना, मुरपार, पिपरटोला, नवेगाव (धा.) या गावांचा समावेश आहे.