शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

४४ लाख बेरोजगार रोजगाराच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 21:38 IST

पदवी व पदविका प्राप्त केल्यानंतर अनेक बेरोजगार उमेदवार रोजगाराच्या शोधात जिल्हा स्तरावरील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर रोजगारासाठी मोठ्या अपेक्षेने नोंदणी करतात.यातंर्गत राज्यातील ३५ जिल्ह्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर ४४ लाख ५६ हजार ३६६ उमेदवारांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे ऐवढे बेरोजगार राज्यात रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे असे म्हटल्यास वागवे होणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पदवी व पदविका प्राप्त केल्यानंतर अनेक बेरोजगार उमेदवार रोजगाराच्या शोधात जिल्हा स्तरावरील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर रोजगारासाठी मोठ्या अपेक्षेने नोंदणी करतात.यातंर्गत राज्यातील ३५ जिल्ह्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर ४४ लाख ५६ हजार ३६६ उमेदवारांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे ऐवढे बेरोजगार राज्यात रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे असे म्हटल्यास वागवे होणार नाही.पूर्वी सुशिक्षित बेरोजगार जिल्हा स्वंयरोजगार केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागते. नोंदणी करण्यासाठी रांगेत लागावे लागत होते. मात्र आता या केंद्राचे नाव आणि प्रणालीत बदल झाला आहे. या केंद्राचे नाव कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र असे झाले आहे. या केंद्रावर या माध्यमातून रोजगार देण्याचे काम केले जात नसल्याचे स्पष्ट सांगितले. मात्र यानंतरही मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवक या केंद्रावर आॅनलाईन नोंदणी मोठ्या अपेक्षेने करतात. राज्यातील या ३५ केंद्रातील आकडेवारीवर नजर टाकल्यास नाव नोदंणी केलेल्या बेरोजगारांची संख्या ४४ लाख ५६ हजार ३६६ ऐवढी आहे. हा केवळ नोंदणीकृत आकडा असून राज्यात बेरोजगारांची संख्या अधिक असल्याचे बोलल्या जाते. या केंद्राच्या माध्यमातून कुठलाच रोजगार प्राप्त होणार नसल्याने येथे नोंदणी करण्याचा कुठलाच फायदा नाही असे मानणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जिल्हास्तरावर नोंदणी झालेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वाधिक बेरोजगारांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे.पुणे जिल्हा ३ लाख ७२ हजार ०७३, नागपूर २ लाख ३४ हजार ६०६, औरगांबाद २ लाख ३५ हजार २८८, ठाणे २ लाख ४४ हजार ९९१, मुंबई २ लाख १६ हजार ७०३, नाशिक २ लाख २६ हजार ८१०, मुंबई शहर १ लाख ९ हजार ८०८, जळगाव १ लाख ८३ हजार ४४३, अहमदनगर १ लाख ६८ हजार ५०८, नांदेड १ लाख ५ हजार ८५६, बीड १ लाख ९ हजार ८०८, लातूर १ लाख १४ हजार ९१६, सोलापूर १ लाख ७० हजार ५९५, सातारा १ लाख १९ हजार ६९८, कोल्हापूर १ लाख ८५ हजार ९०१, सांगली १ लाख ३३ हजार ९७९ बेरोजगार युवकांनी नोंदणी केली आहे.४९ हजार युवकांना रोजगाराचा दावाकौशल्य विकास, रोेजगार व उद्योजकाता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून राज्यातील आत्तापर्यंत ४९ हजार ७९६ बेरोजगारांना रोजगार मिळाल्याची दावा केला आहे. विविध कंपन्यामध्ये जॉब प्लेसमेंट अंतर्गंत १८ हजार ७७३ पदे भरण्यात आली आहे. वर्धा १५९, नागपुर ७८३, भंडारा ७, गडचिरोली १ व चंद्रपूर २३ तर गोंदिया जिल्ह्यातील एकाही युवकाला रोजगार मिळाला नाही.