शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

४४ लाख बेरोजगार रोजगाराच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 21:38 IST

पदवी व पदविका प्राप्त केल्यानंतर अनेक बेरोजगार उमेदवार रोजगाराच्या शोधात जिल्हा स्तरावरील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर रोजगारासाठी मोठ्या अपेक्षेने नोंदणी करतात.यातंर्गत राज्यातील ३५ जिल्ह्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर ४४ लाख ५६ हजार ३६६ उमेदवारांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे ऐवढे बेरोजगार राज्यात रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे असे म्हटल्यास वागवे होणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पदवी व पदविका प्राप्त केल्यानंतर अनेक बेरोजगार उमेदवार रोजगाराच्या शोधात जिल्हा स्तरावरील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर रोजगारासाठी मोठ्या अपेक्षेने नोंदणी करतात.यातंर्गत राज्यातील ३५ जिल्ह्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर ४४ लाख ५६ हजार ३६६ उमेदवारांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे ऐवढे बेरोजगार राज्यात रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे असे म्हटल्यास वागवे होणार नाही.पूर्वी सुशिक्षित बेरोजगार जिल्हा स्वंयरोजगार केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागते. नोंदणी करण्यासाठी रांगेत लागावे लागत होते. मात्र आता या केंद्राचे नाव आणि प्रणालीत बदल झाला आहे. या केंद्राचे नाव कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र असे झाले आहे. या केंद्रावर या माध्यमातून रोजगार देण्याचे काम केले जात नसल्याचे स्पष्ट सांगितले. मात्र यानंतरही मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवक या केंद्रावर आॅनलाईन नोंदणी मोठ्या अपेक्षेने करतात. राज्यातील या ३५ केंद्रातील आकडेवारीवर नजर टाकल्यास नाव नोदंणी केलेल्या बेरोजगारांची संख्या ४४ लाख ५६ हजार ३६६ ऐवढी आहे. हा केवळ नोंदणीकृत आकडा असून राज्यात बेरोजगारांची संख्या अधिक असल्याचे बोलल्या जाते. या केंद्राच्या माध्यमातून कुठलाच रोजगार प्राप्त होणार नसल्याने येथे नोंदणी करण्याचा कुठलाच फायदा नाही असे मानणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जिल्हास्तरावर नोंदणी झालेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वाधिक बेरोजगारांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे.पुणे जिल्हा ३ लाख ७२ हजार ०७३, नागपूर २ लाख ३४ हजार ६०६, औरगांबाद २ लाख ३५ हजार २८८, ठाणे २ लाख ४४ हजार ९९१, मुंबई २ लाख १६ हजार ७०३, नाशिक २ लाख २६ हजार ८१०, मुंबई शहर १ लाख ९ हजार ८०८, जळगाव १ लाख ८३ हजार ४४३, अहमदनगर १ लाख ६८ हजार ५०८, नांदेड १ लाख ५ हजार ८५६, बीड १ लाख ९ हजार ८०८, लातूर १ लाख १४ हजार ९१६, सोलापूर १ लाख ७० हजार ५९५, सातारा १ लाख १९ हजार ६९८, कोल्हापूर १ लाख ८५ हजार ९०१, सांगली १ लाख ३३ हजार ९७९ बेरोजगार युवकांनी नोंदणी केली आहे.४९ हजार युवकांना रोजगाराचा दावाकौशल्य विकास, रोेजगार व उद्योजकाता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून राज्यातील आत्तापर्यंत ४९ हजार ७९६ बेरोजगारांना रोजगार मिळाल्याची दावा केला आहे. विविध कंपन्यामध्ये जॉब प्लेसमेंट अंतर्गंत १८ हजार ७७३ पदे भरण्यात आली आहे. वर्धा १५९, नागपुर ७८३, भंडारा ७, गडचिरोली १ व चंद्रपूर २३ तर गोंदिया जिल्ह्यातील एकाही युवकाला रोजगार मिळाला नाही.