शहरं
Join us  
Trending Stories
1
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
2
राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
3
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
4
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
5
महापालिका निवडणुकांचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात! राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी
6
Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
7
तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय?
8
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
9
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
10
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
11
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
12
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
13
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
14
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
15
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
16
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
17
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
18
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
19
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
20
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
Daily Top 2Weekly Top 5

४४ लाख बेरोजगार रोजगाराच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 21:38 IST

पदवी व पदविका प्राप्त केल्यानंतर अनेक बेरोजगार उमेदवार रोजगाराच्या शोधात जिल्हा स्तरावरील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर रोजगारासाठी मोठ्या अपेक्षेने नोंदणी करतात.यातंर्गत राज्यातील ३५ जिल्ह्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर ४४ लाख ५६ हजार ३६६ उमेदवारांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे ऐवढे बेरोजगार राज्यात रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे असे म्हटल्यास वागवे होणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पदवी व पदविका प्राप्त केल्यानंतर अनेक बेरोजगार उमेदवार रोजगाराच्या शोधात जिल्हा स्तरावरील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर रोजगारासाठी मोठ्या अपेक्षेने नोंदणी करतात.यातंर्गत राज्यातील ३५ जिल्ह्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर ४४ लाख ५६ हजार ३६६ उमेदवारांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे ऐवढे बेरोजगार राज्यात रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे असे म्हटल्यास वागवे होणार नाही.पूर्वी सुशिक्षित बेरोजगार जिल्हा स्वंयरोजगार केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागते. नोंदणी करण्यासाठी रांगेत लागावे लागत होते. मात्र आता या केंद्राचे नाव आणि प्रणालीत बदल झाला आहे. या केंद्राचे नाव कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र असे झाले आहे. या केंद्रावर या माध्यमातून रोजगार देण्याचे काम केले जात नसल्याचे स्पष्ट सांगितले. मात्र यानंतरही मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवक या केंद्रावर आॅनलाईन नोंदणी मोठ्या अपेक्षेने करतात. राज्यातील या ३५ केंद्रातील आकडेवारीवर नजर टाकल्यास नाव नोदंणी केलेल्या बेरोजगारांची संख्या ४४ लाख ५६ हजार ३६६ ऐवढी आहे. हा केवळ नोंदणीकृत आकडा असून राज्यात बेरोजगारांची संख्या अधिक असल्याचे बोलल्या जाते. या केंद्राच्या माध्यमातून कुठलाच रोजगार प्राप्त होणार नसल्याने येथे नोंदणी करण्याचा कुठलाच फायदा नाही असे मानणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जिल्हास्तरावर नोंदणी झालेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वाधिक बेरोजगारांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे.पुणे जिल्हा ३ लाख ७२ हजार ०७३, नागपूर २ लाख ३४ हजार ६०६, औरगांबाद २ लाख ३५ हजार २८८, ठाणे २ लाख ४४ हजार ९९१, मुंबई २ लाख १६ हजार ७०३, नाशिक २ लाख २६ हजार ८१०, मुंबई शहर १ लाख ९ हजार ८०८, जळगाव १ लाख ८३ हजार ४४३, अहमदनगर १ लाख ६८ हजार ५०८, नांदेड १ लाख ५ हजार ८५६, बीड १ लाख ९ हजार ८०८, लातूर १ लाख १४ हजार ९१६, सोलापूर १ लाख ७० हजार ५९५, सातारा १ लाख १९ हजार ६९८, कोल्हापूर १ लाख ८५ हजार ९०१, सांगली १ लाख ३३ हजार ९७९ बेरोजगार युवकांनी नोंदणी केली आहे.४९ हजार युवकांना रोजगाराचा दावाकौशल्य विकास, रोेजगार व उद्योजकाता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून राज्यातील आत्तापर्यंत ४९ हजार ७९६ बेरोजगारांना रोजगार मिळाल्याची दावा केला आहे. विविध कंपन्यामध्ये जॉब प्लेसमेंट अंतर्गंत १८ हजार ७७३ पदे भरण्यात आली आहे. वर्धा १५९, नागपुर ७८३, भंडारा ७, गडचिरोली १ व चंद्रपूर २३ तर गोंदिया जिल्ह्यातील एकाही युवकाला रोजगार मिळाला नाही.