शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
2
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
3
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
4
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
5
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
6
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
7
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
8
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
9
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
10
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
11
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
12
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
13
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
14
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
15
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
16
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
17
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
18
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
19
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
Daily Top 2Weekly Top 5

४३३९ जणांनी दिली टीईटीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 06:00 IST

पहिला पेपर १२ केंद्रांवरून घेण्यात आला असून यात दोन हजार ९०० परीक्षार्थी पात्र होते. त्यातील दोन हजार ६१५ जणांनी परीक्षा दिली असून २८५ परीक्षार्थी गैरहजर होते. दुसरा पेपर आठ केंद्रांवरून घेण्यात आला व त्यात एक हजार ८५१ परीक्षार्थी पात्र होते. यातील एक हजार ७२४ जणांनी परीक्षा दिली असून १२७ परीक्षार्थी गैरहजर होते.

ठळक मुद्दे४१२ परीक्षार्थी गैरहजर : वेळेत न पोहचल्याचा अनेकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ चा पेपर रविवारी (दि.१९) जिल्ह्यातील २० केंद्रांवरून घेण्यात आला. इंग्रजी, मराठी, उर्दू, बंगाली, हिंदी, सिंधी, गुजराती, कन्नड व तेलगू अशा नऊ माध्यमांतून टीईटीचा पेपर घेण्यात आला आहे.पहिला पेपर १२ केंद्रांवरून घेण्यात आला असून यात दोन हजार ९०० परीक्षार्थी पात्र होते. त्यातील दोन हजार ६१५ जणांनी परीक्षा दिली असून २८५ परीक्षार्थी गैरहजर होते. दुसरा पेपर आठ केंद्रांवरून घेण्यात आला व त्यात एक हजार ८५१ परीक्षार्थी पात्र होते. यातील एक हजार ७२४ जणांनी परीक्षा दिली असून १२७ परीक्षार्थी गैरहजर होते. असे दोन्ही पेपर चार हजार ७५१ परीक्षार्थीं पैकी चार हजार ३३९ परीक्षार्थींंनी दिले असून ४१२ विद्यार्थी गैरहजर होते.शहरात जे.एम.हायस्कूल सिव्हील लाईन्स, मनोहर म्युनिसीपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, राजस्थान कन्या हायस्कूल, मनोहर म्युनिसीपल हायर सेकंडरी स्कूल, बी.एन.आदर्श सिंधी हायस्कूल, एस.एस.गर्ल्स हायस्कूल, महावीर मारवाडी हायस्कूल, एस.एस.गर्ल्स ज्युनिअर कॉलेज, बी.एच.जे.कॉलेज, जे.एम.हायस्कूल (मुख्य), रविंद्रनाथ टागोर हायस्कूल, निर्मल इंग्लीश स्कूल, श्रीमती सरस्वतीबाई महिला विद्यालय व गुजराती राष्ट्रीय हायस्कूल असे १४ परीक्षा केंद्र होते. पहिल्या पेपरचे १२ केंद्र तर दुसऱ्या पेपरचे आठ केंद्र होते.परीक्षेच्या वेळी ऑनलाईन अर्जात जे माध्यम नोंदविले होते ते माध्यम विद्यार्थ्यांना मिळाले. उत्तर पत्रीका ए,बी, सी,डी असे असून १५० गुणांना १५० प्रश्न होते. उत्तरासाठी बहुपर्याय होते त्यातील एक उत्तर होते. एका वर्गात २४ परीक्षार्थी बसण्याची सोय करण्यात आली होती. केंद्र संचालक व झोनल ऑफिसरच्या नियुक्ता करण्यात आल्या होत्या.२० केंद्रांसाठी पाच झोन तयार करण्यात आले होते. पेपर-१ करीता १२ केंद्र असून त्यासाठी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजताची वेळ होती. पेपर-२ करीता आठ केंद्र असून दुपारी २ ते ४.३० वाजताची वेळ होती. ४० टक्के दिव्यांग असल्याचे ज्यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांचे पत्र होते त्याला शिक्षणाधिकारी यांच्याकडून प्रमाणीत करून लेखनीक करीता अधिकचा वेळ देण्यात आला होता. टीईटीची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, उपशिक्षणाधिीकारी आर.पी. रामटेके, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी व सर्व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी सहकार्य केले.वेळेत न पोहचल्याने पेपर देता आला नाहीपरीक्षार्थ्यांनी दिलेल्या वेळेच्या अर्धा तास पूर्वी म्हणजेच १० वाजता परीक्षा केंद्रावर पोहचण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु या सूचनांचे काहींनी पालन न केल्यामुळे त्यांना टीईटीचा पेपर देता आला नाही. सकाळी १०.१० वाजता पोहचणाऱ्यांनाही परीक्षा केंद्रात प्रवेश न दिल्यामुळे काही वेळ परीक्षार्थ्यांनी बाहेर ओरड केली. परंतु चूक आपलीच आहे हे लक्षात आले असता ते परीक्षा केंद्रावरून घरी परतले. अनेक केंद्रांवर हा प्रकार बघायला मिळाला.

टॅग्स :examपरीक्षाTeacherशिक्षक