शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

४३३ गावात नांदू लागली शांतता

By admin | Updated: December 28, 2015 02:04 IST

गाव शांततेतून समृद्धीकडे जावे यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आणली.

नरेश रहिले गोंदियागाव शांततेतून समृद्धीकडे जावे यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आणली. या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील तंटे मोठ्या प्रमाणात कमी झाले. गोंदिया जिल्ह्यातील तंटामुक्त गावांचे सर्वेक्षण केल्यावर ५६६ पैकी ४३३ गावे आजही शांततेच्या मार्गावर असून त्या गावातील एकही तंटे पोलीस ठाण्यापर्यंत आले नाही. १२३ गावात तंटे झाल्याचे लक्षात आले.राज्य शासनाने १५ आॅगस्ट २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. या मोहिमेला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भरभरुन प्रतिसाद मिळाल्यामुळे १५ लाखावरील तंटे समोपचाराने मिटविण्यात आले. या मोहिमेला लोकचळवळीचा आधार मिळाला. या मालिकेत गोंदिया जिल्हा राज्यातील पहिला तंटामुक्त होणारा जिल्हा म्हणून नावारुपास आला. राज्यातील १८ हजारापेक्षा अधिक गावे तंटामुक्त पुरस्कारासाठी पात्र ठरली. परंतु तंटामुक्त पुरस्काराचे मानकरी ठरलेली गावे खरच तंटामुक्त आहेत का? या गावात तंटे झाले का? याचे सर्वेक्षण राज्यभरात पोलीस विभागातर्फे करण्यात आले. तंटामुक्त सेलला मागितलेल्या सर्वेक्षणात अजूनही जिल्ह्यातील तंटामुक्त गावात तंटे उद्भवत असल्याची माहिती पुढे आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील ५५६ गावांपैकी ४३३ गावात एकही तंटा झाला नाही. तर १२३ गावात तंटे झाले असल्याचा अहवाल गोंदिया पोलीस विभागाने राज्य शासनाच्या गृहमंत्रालयाला पाठविला आहे. ३ जानेवारी २०१४ च्या पत्रान्वये हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १२ गावात, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ११ गावात, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सात गावात, गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सहा गावात, अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १९ गावात, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाच गावात, नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चार गावात, सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सहा गावात, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दोन गावात, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सहा गावात, गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १२ गावात तर तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या २४ गावात तंटे झाले आहेत. तंटामुक्त पुरस्काराचे मानकरी असलेली ४३३ गावातील तंटामुक्त समितीच्या सदस्यांनी व नागरिकांनी पुरस्काराचे पावित्र्य राखून आपल्या गावातील तंटे पोलीस ठाण्यापर्यंत जाऊ दिले नाही. गोंदिया जिल्हा आता व्यसनमुक्त जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.