शहरं
Join us  
Trending Stories
1
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
2
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
3
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
4
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
5
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 
6
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
7
'धुरंधर' सिनेमाचं डोंबिवलीत होतंय शूट, माणकोली पूलावरुन संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल
8
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
9
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
10
Tarot Card: आगामी काळ प्रगतीचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
11
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
12
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
13
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
14
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
15
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
16
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
17
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
18
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
19
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
20
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी

४३३ गावात नांदू लागली शांतता

By admin | Updated: December 28, 2015 02:04 IST

गाव शांततेतून समृद्धीकडे जावे यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आणली.

नरेश रहिले गोंदियागाव शांततेतून समृद्धीकडे जावे यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आणली. या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील तंटे मोठ्या प्रमाणात कमी झाले. गोंदिया जिल्ह्यातील तंटामुक्त गावांचे सर्वेक्षण केल्यावर ५६६ पैकी ४३३ गावे आजही शांततेच्या मार्गावर असून त्या गावातील एकही तंटे पोलीस ठाण्यापर्यंत आले नाही. १२३ गावात तंटे झाल्याचे लक्षात आले.राज्य शासनाने १५ आॅगस्ट २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. या मोहिमेला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भरभरुन प्रतिसाद मिळाल्यामुळे १५ लाखावरील तंटे समोपचाराने मिटविण्यात आले. या मोहिमेला लोकचळवळीचा आधार मिळाला. या मालिकेत गोंदिया जिल्हा राज्यातील पहिला तंटामुक्त होणारा जिल्हा म्हणून नावारुपास आला. राज्यातील १८ हजारापेक्षा अधिक गावे तंटामुक्त पुरस्कारासाठी पात्र ठरली. परंतु तंटामुक्त पुरस्काराचे मानकरी ठरलेली गावे खरच तंटामुक्त आहेत का? या गावात तंटे झाले का? याचे सर्वेक्षण राज्यभरात पोलीस विभागातर्फे करण्यात आले. तंटामुक्त सेलला मागितलेल्या सर्वेक्षणात अजूनही जिल्ह्यातील तंटामुक्त गावात तंटे उद्भवत असल्याची माहिती पुढे आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील ५५६ गावांपैकी ४३३ गावात एकही तंटा झाला नाही. तर १२३ गावात तंटे झाले असल्याचा अहवाल गोंदिया पोलीस विभागाने राज्य शासनाच्या गृहमंत्रालयाला पाठविला आहे. ३ जानेवारी २०१४ च्या पत्रान्वये हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १२ गावात, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ११ गावात, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सात गावात, गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सहा गावात, अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १९ गावात, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाच गावात, नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चार गावात, सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सहा गावात, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दोन गावात, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सहा गावात, गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १२ गावात तर तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या २४ गावात तंटे झाले आहेत. तंटामुक्त पुरस्काराचे मानकरी असलेली ४३३ गावातील तंटामुक्त समितीच्या सदस्यांनी व नागरिकांनी पुरस्काराचे पावित्र्य राखून आपल्या गावातील तंटे पोलीस ठाण्यापर्यंत जाऊ दिले नाही. गोंदिया जिल्हा आता व्यसनमुक्त जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.