शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मृतांच्या अंत्यसंस्कारावर पालिकेला ४० लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:36 IST

गोंदिया : देशात मागील वर्षी कोरोनाने शिरकाव केला असून तेव्हापासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. पहिल्या लाटेत जिल्ह्यातील सुमारे २०० ...

गोंदिया : देशात मागील वर्षी कोरोनाने शिरकाव केला असून तेव्हापासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. पहिल्या लाटेत जिल्ह्यातील सुमारे २०० नागरिकांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतर दुसऱ्या लाटेने अवघ्या देशासह जिल्ह्यात कहर केला. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील सुमारे ४५० नागरिकांचा कोरोनाने जीव घेतला आहे. कोरोना ही आता राष्ट्रीय महामारी घोषित झाली असून संसर्गजन्य असलेल्या महामारीत कित्येक मृतांच्या नातेवाइकांनी मृतदेहही स्वीकारले नाहीत. अशांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी नगर परिषदेने स्वीकारली असून त्यांच्यावरील अंत्यसंस्काराचा संपूर्ण खर्च नगर परिषदेने आपल्या तिजोरीतून केला आहे.

यामध्ये काही जिल्ह्यातील तर काही अन्य जिल्हे व राज्यांतील मृतांचाही समावेश आहे. मात्र माणुसकी जपत कोरोनाने मरण पावलेल्या सर्वांच्या मृतदेहावर नगर परिषदेने अंत्यसंस्कार केले. यासाठी नगर परिषदेला ४० लाख रुपयांचा खर्च आला आहे. नगर परिषदेने आतापर्यंत ८०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. यासाठी प्रत्येकी चार हजार रुपये खर्च नगर परिषदेला करावा लागला आहे. तर अंत्यसंस्कारासाठी नगर परिषदेने कंत्राट दिले होते. संबंधित कंत्राटदाराच्या कामगारांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.

---------------------------

कोट

कोरोना ही महामारी असून यामुळे मरण पावलेल्यांच्या अंत्यसंस्काराचा खर्च नगर परिषदेने आपल्या तिजोरीतून केला आहे. आतापर्यंत ८०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून यासाठी नगर परिषदेने ४० लाख रुपये खर्च केले आहेत. संपूर्ण व्यवस्था व्यवस्थितपणे करण्यात आली आहे.

- करण चव्हाण,

मुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदिया

--------------------------

कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी नगर परिषदेकडे आहे. त्यांच्याच माध्यमातून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. संपूर्ण व्यवस्था नगर परिषदेने सांभाळली आहे.

- डॉ. अमरीश मोहबे,

जिल्हा शल्य चिकिसक, गोंदिया

-----------------------------

कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आली असून तसे आदेशच आहेत. त्यानुसार, नगर परिषद प्रशासन मृतांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत आहे.

- राजेश खवले,

जिल्हाधिकारी, गोंदिया

------------------------

एका अंत्यसंस्काराचा खर्च चार हजार रुपये

नगर परिषदेच्या माध्यमातून आतापर्यंत ८०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यामध्ये नगर परिषदेच्या तिजोरीतून ४० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यात प्रत्येकी चार हजार रुपये एका अंत्यसंस्कारासाठी नगर परिषदेला खर्च आला आहे. यामध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकूड, डिझेल व अन्य खर्च येत होते.

---------------------------------

अंत्यसंस्कारासाठी दिले कंत्राट

नगर परिषदेने कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कंत्राट दिले होते. संबंधित कंत्राटदाराच्या कामगारांनी कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. रुग्णालयातून थेट मोक्षधाम येथे मृतदेह नेल्यावर तेथे कंत्राटदाराचे कामगार पूर्ण व्यवस्था करून ठेवते होते व मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत होते. नगर परिषदेच्या माध्यमातून आतापर्यंत असे ८०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.