शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
4
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
5
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
6
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
7
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
8
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
9
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
10
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
11
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
12
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
13
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
14
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
15
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
16
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
17
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
20
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?

जिल्ह्यातील ४ तालुके झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून परिणामी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली आहे. परिणामी आता जिल्ह्यात ...

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून परिणामी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली आहे. परिणामी आता जिल्ह्यात फक्त १२ सक्रिय रुग्ण उरले असून जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव हे ४ तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. उरलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये ५ रुग्ण इतर राज्य व जिल्ह्यातील आहेत. मात्र, असे असतानाही खबरदारी घेणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केला होता. परिणामी सक्रिय रुग्ण संख्या ४१ हजारांच्या घरात पोहोचली आहे. मात्र, आता दुसरी लाट ओसरली असून जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. यामुळेच आता दररोज निघणारी बाधितांची संख्याही बोटावर मोजण्याइतपत आली आहे. जिल्ह्यात रविवारपर्यंत १२ सक्रिय रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. यातही ५ रुग्ण इतर राज्य व जिल्ह्यातील आहेत. यामुळे आता दिलासादायक स्थिती आहे.

शिवाय रुग्ण संख्या नियंत्रणात असल्यामुळे जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव हे ४ तालुके कोरोनामुक्त झाले आहे. तर गोंदिया तालुक्यात १, तिरोडा तालुक्यात २, आमगाव तालुक्यात ३ व सालेकसा तालुक्यात १ सक्रिय रूग्ण उरला आहे. म्हणजेच जिल्ह्यातील फक्त ७ रुग्ण सक्रिय आहेत. यावरून लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

------------------------

तिरोडा तालुक्यात कोरोनाची पुन्हा एंट्री

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सुमारे १५ दिवस कोरोनामुक्त असलेल्या तिरोडा तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाने एंट्री केली आहे. यामुळेच तिरोडा तालुक्यात २ सक्रिय रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. हाच प्रकार जिल्ह्यातील अन्य काही तालुक्यांत घडला आहे. म्हणजेच, कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यांना अधिकच खबरदारी घेण्याची गरज दिसून येत आहे.

------------------------------

उतावळेपणा न करता नियमांचे पालन गरजेचे

जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न व जिल्हावासीयांच्या सहकार्यामुळेच जिल्ह्यातील स्थिती आता नियंत्रणात असून लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होणार यात शंका वाटत नाही. मात्र, असे असतानाही तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला जात आहे. यामुळे नागरिकांनी उतावळेपणा न करणेच गरजेचे असून जिल्ह्याला तिसऱ्या लाटेपासून मुक्त ठेवण्यासाठी नियमांचे पालन करण्याची गरज आहे.