शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४ तालुके झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून परिणामी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली आहे. परिणामी आता जिल्ह्यात ...

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून परिणामी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली आहे. परिणामी आता जिल्ह्यात फक्त १२ सक्रिय रुग्ण उरले असून जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव हे ४ तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. उरलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये ५ रुग्ण इतर राज्य व जिल्ह्यातील आहेत. मात्र, असे असतानाही खबरदारी घेणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केला होता. परिणामी सक्रिय रुग्ण संख्या ४१ हजारांच्या घरात पोहोचली आहे. मात्र, आता दुसरी लाट ओसरली असून जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. यामुळेच आता दररोज निघणारी बाधितांची संख्याही बोटावर मोजण्याइतपत आली आहे. जिल्ह्यात रविवारपर्यंत १२ सक्रिय रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. यातही ५ रुग्ण इतर राज्य व जिल्ह्यातील आहेत. यामुळे आता दिलासादायक स्थिती आहे.

शिवाय रुग्ण संख्या नियंत्रणात असल्यामुळे जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव हे ४ तालुके कोरोनामुक्त झाले आहे. तर गोंदिया तालुक्यात १, तिरोडा तालुक्यात २, आमगाव तालुक्यात ३ व सालेकसा तालुक्यात १ सक्रिय रूग्ण उरला आहे. म्हणजेच जिल्ह्यातील फक्त ७ रुग्ण सक्रिय आहेत. यावरून लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

------------------------

तिरोडा तालुक्यात कोरोनाची पुन्हा एंट्री

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सुमारे १५ दिवस कोरोनामुक्त असलेल्या तिरोडा तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाने एंट्री केली आहे. यामुळेच तिरोडा तालुक्यात २ सक्रिय रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. हाच प्रकार जिल्ह्यातील अन्य काही तालुक्यांत घडला आहे. म्हणजेच, कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यांना अधिकच खबरदारी घेण्याची गरज दिसून येत आहे.

------------------------------

उतावळेपणा न करता नियमांचे पालन गरजेचे

जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न व जिल्हावासीयांच्या सहकार्यामुळेच जिल्ह्यातील स्थिती आता नियंत्रणात असून लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होणार यात शंका वाटत नाही. मात्र, असे असतानाही तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला जात आहे. यामुळे नागरिकांनी उतावळेपणा न करणेच गरजेचे असून जिल्ह्याला तिसऱ्या लाटेपासून मुक्त ठेवण्यासाठी नियमांचे पालन करण्याची गरज आहे.