शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

‘बाघ’च्या डाव्या कालव्यासाठी ३.९९ कोटी रुपयांचा निधी

By admin | Updated: April 11, 2016 01:59 IST

राज्य शासनाच्या जयलसंपदा विभागाने जिल्ह्यातील बाघ इटियाडोह प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरील २७ किलोमीटरदरम्यान

पालकमंत्री, आमदारांचे प्रयत्न : कालव्याचे बांधकाम विस्तार व सुधारणा होणारगोंदिया : राज्य शासनाच्या जयलसंपदा विभागाने जिल्ह्यातील बाघ इटियाडोह प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरील २७ किलोमीटरदरम्यान शिल्लक असलेले मातीकाम, बांधकाम विस्तार व सुधारणा करण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. यासाठी ३ कोटी ९९ लाख ५३ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निधीसाठी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच आ.गोपालदास अग्रवाल यांनीही त्यासंदर्भात मागणी केली होती.बाघ प्रकल्पाचे बांधकाम १९७० मध्ये पूर्ण करण्यात आले असून या धरणाची एकूण उपयुक्त साठवण क्षमता ३६८.९६ दलघमी आहे. आंतरराज्य करारानुसार पाण्याचा वाटा महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांच्यात ३:१ असा आहे. प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची एकूण लांबी ६५ किलोमिटर असून उजव्या मुख्य कालव्याची लांबी ६४.५० किलोमीटर आहे. प्रकल्पाच्या कालवे प्रणालीची एकूण लांबी ४५० किलोमीटर असून त्यावर लहान-मोठी १ हजार ८९६ बांधकामे आहेत. या प्रकल्पाद्वारे गोंदिया जिल्ह्यात आमगाव, गोंदिया व सालेकसा तालुक्यातील ३५ हजार ७१८ हेक्टर क्षेत्राला सिंचन होते. प्रकल्पाच्या कालव्याचे बांधकाम ४५ वर्षापूर्वीचे असल्याने त्यावरील बांधकामे जीर्णावस्थेत असून बहुतांश बांधकाम पूर्णत: किंवा अंशत: क्षतिग्रस्त झाली आहेत. त्यामुळे कालव्यातील पाण्याला पाझर फुटले आहेत. पाण्याची गळती रोखण्यासाठी अनेक कामे हाती घेणे गरजेचे झाले होते.यासंदर्भात कालव्याच्या संकल्पीत काटछेदाप्रमाणे पुन:स्थापित करणे व निवडक आवश्यक ठिकाणी पाच टक्के लांबीमध्ये अस्तरीकरणाचा प्रस्ताव, तसेच अंशत: क्षतिग्रस्त बांधकामाची दुरुस्ती आणि पूर्णत: क्षतिग्रस्त बांधकामाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. विशेष म्हणजे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. दरम्यान, राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने १ एप्रिल रोजी एक अध्यादेश काढून सदर कामाकरिता व त्यासाठी आवश्यक ३९९.५३ लक्ष रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे कालव्याची उपरोक्त कामे पूर्ण झाल्यावर १ हजार १५५ हेक्टर क्षेत्र पुन:स्थापित होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)