शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

‘बाघ’च्या डाव्या कालव्यासाठी ३.९९ कोटी रुपयांचा निधी

By admin | Updated: April 11, 2016 01:59 IST

राज्य शासनाच्या जयलसंपदा विभागाने जिल्ह्यातील बाघ इटियाडोह प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरील २७ किलोमीटरदरम्यान

पालकमंत्री, आमदारांचे प्रयत्न : कालव्याचे बांधकाम विस्तार व सुधारणा होणारगोंदिया : राज्य शासनाच्या जयलसंपदा विभागाने जिल्ह्यातील बाघ इटियाडोह प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरील २७ किलोमीटरदरम्यान शिल्लक असलेले मातीकाम, बांधकाम विस्तार व सुधारणा करण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. यासाठी ३ कोटी ९९ लाख ५३ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निधीसाठी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच आ.गोपालदास अग्रवाल यांनीही त्यासंदर्भात मागणी केली होती.बाघ प्रकल्पाचे बांधकाम १९७० मध्ये पूर्ण करण्यात आले असून या धरणाची एकूण उपयुक्त साठवण क्षमता ३६८.९६ दलघमी आहे. आंतरराज्य करारानुसार पाण्याचा वाटा महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांच्यात ३:१ असा आहे. प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची एकूण लांबी ६५ किलोमिटर असून उजव्या मुख्य कालव्याची लांबी ६४.५० किलोमीटर आहे. प्रकल्पाच्या कालवे प्रणालीची एकूण लांबी ४५० किलोमीटर असून त्यावर लहान-मोठी १ हजार ८९६ बांधकामे आहेत. या प्रकल्पाद्वारे गोंदिया जिल्ह्यात आमगाव, गोंदिया व सालेकसा तालुक्यातील ३५ हजार ७१८ हेक्टर क्षेत्राला सिंचन होते. प्रकल्पाच्या कालव्याचे बांधकाम ४५ वर्षापूर्वीचे असल्याने त्यावरील बांधकामे जीर्णावस्थेत असून बहुतांश बांधकाम पूर्णत: किंवा अंशत: क्षतिग्रस्त झाली आहेत. त्यामुळे कालव्यातील पाण्याला पाझर फुटले आहेत. पाण्याची गळती रोखण्यासाठी अनेक कामे हाती घेणे गरजेचे झाले होते.यासंदर्भात कालव्याच्या संकल्पीत काटछेदाप्रमाणे पुन:स्थापित करणे व निवडक आवश्यक ठिकाणी पाच टक्के लांबीमध्ये अस्तरीकरणाचा प्रस्ताव, तसेच अंशत: क्षतिग्रस्त बांधकामाची दुरुस्ती आणि पूर्णत: क्षतिग्रस्त बांधकामाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. विशेष म्हणजे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. दरम्यान, राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने १ एप्रिल रोजी एक अध्यादेश काढून सदर कामाकरिता व त्यासाठी आवश्यक ३९९.५३ लक्ष रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे कालव्याची उपरोक्त कामे पूर्ण झाल्यावर १ हजार १५५ हेक्टर क्षेत्र पुन:स्थापित होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)