शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

३९३७ नागरिक आले ‘सेफ झोन’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:53 IST

गोंदिया : देशात कोरोनाला टक्कर देण्यासाठी लसीकरण जोमात असून आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स सोबतच आता ४५ वर्षांपेक्षा जास्त ...

गोंदिया : देशात कोरोनाला टक्कर देण्यासाठी लसीकरण जोमात असून आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स सोबतच आता ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. अशात जिल्ह्यत आतापर्यंत २४,९६६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये ३९३७ नागरिकांचा दुसरा डोसही घेऊन झाला आहे. यामुळे आता ते ‘सेफ झोन’मध्ये आले आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यात खळबळ माजली असून कित्येक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन केले जात आहे. मात्र आता कोरोना विरोधात लढण्यासाठी लस आली असून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, लसीकरणाची सुरुवात आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सला प्राधान्य देत करण्यात आली. मात्र आता कोरोनाचा वाढता धोका बघता ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी शहरातील ५ खासगी रुग्णालयातही लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

कोरोनासाठी देण्यात येणारी ही लस अत्यंत प्र‌भावी असल्याचे सांगितले जात असतानाच या लसीचे २ डोस घेणे गरजेचे आहे. २ डाेस घेतल्यानंतर काही दिवसांनी कोरोनाशी लढणाऱ्या एंटीबॉडीज तयार होतात असा तो फॉर्म्युला आहे. अशात जिल्ह्यात आतापर्यंत ३,९३७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी त्यांना दुसरा डोस घ्यायचा असल्याने दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी दिसत आहे. मात्र कोरोना लसीकरण जिल्ह्यात जोमात सुरू असल्याने लवकरच जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणार यात शंका नाही.

-------------------------

आतापर्यंत २४९६६ नागरिकांचे लसीकरण

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून बुधवारपर्यंत २४,९६६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये २१,०२९ नागरिकांचा पहिला डोस झाला असून ३,९३७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. यात, केटीएस व बीजीडब्ल्यू रुग्णालयात ८,०५३, उपजिल्हा रुग्णालयात २,६५१, ग्रामीण रुग्णालयात ११,४९९ तर प्राथमिक आरोग्य केंद्रात २,७६३ नागिकांनी लस घेतली आहे.

--------------------

भीती न बाळगता लस घ्या

नागरिकात कोरोना लसीला घेऊन आजही प्रमाणात शंका निर्माण झालेल्या आहेत. मात्र कोरोनाची लस अत्यंत सुरक्षित व प्रभावी असल्याने नागरिकांनी लस घेणे गरजेचे आहे. कोरोना विरोधात लढण्यासाठी भारताकडे लस हे शस्त्र तयार असून लसीमुळेच कोरोनापासून सुरक्षा करता येणार आहे. करिता नागरिकांनी लसीला घेऊन कसलीही भीती न बाळगता लसीकरण करवून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.