शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

३९३७ नागरिक आले ‘सेफ झोन’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:53 IST

गोंदिया : देशात कोरोनाला टक्कर देण्यासाठी लसीकरण जोमात असून आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स सोबतच आता ४५ वर्षांपेक्षा जास्त ...

गोंदिया : देशात कोरोनाला टक्कर देण्यासाठी लसीकरण जोमात असून आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स सोबतच आता ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. अशात जिल्ह्यत आतापर्यंत २४,९६६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये ३९३७ नागरिकांचा दुसरा डोसही घेऊन झाला आहे. यामुळे आता ते ‘सेफ झोन’मध्ये आले आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यात खळबळ माजली असून कित्येक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन केले जात आहे. मात्र आता कोरोना विरोधात लढण्यासाठी लस आली असून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, लसीकरणाची सुरुवात आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सला प्राधान्य देत करण्यात आली. मात्र आता कोरोनाचा वाढता धोका बघता ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी शहरातील ५ खासगी रुग्णालयातही लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

कोरोनासाठी देण्यात येणारी ही लस अत्यंत प्र‌भावी असल्याचे सांगितले जात असतानाच या लसीचे २ डोस घेणे गरजेचे आहे. २ डाेस घेतल्यानंतर काही दिवसांनी कोरोनाशी लढणाऱ्या एंटीबॉडीज तयार होतात असा तो फॉर्म्युला आहे. अशात जिल्ह्यात आतापर्यंत ३,९३७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी त्यांना दुसरा डोस घ्यायचा असल्याने दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी दिसत आहे. मात्र कोरोना लसीकरण जिल्ह्यात जोमात सुरू असल्याने लवकरच जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणार यात शंका नाही.

-------------------------

आतापर्यंत २४९६६ नागरिकांचे लसीकरण

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून बुधवारपर्यंत २४,९६६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये २१,०२९ नागरिकांचा पहिला डोस झाला असून ३,९३७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. यात, केटीएस व बीजीडब्ल्यू रुग्णालयात ८,०५३, उपजिल्हा रुग्णालयात २,६५१, ग्रामीण रुग्णालयात ११,४९९ तर प्राथमिक आरोग्य केंद्रात २,७६३ नागिकांनी लस घेतली आहे.

--------------------

भीती न बाळगता लस घ्या

नागरिकात कोरोना लसीला घेऊन आजही प्रमाणात शंका निर्माण झालेल्या आहेत. मात्र कोरोनाची लस अत्यंत सुरक्षित व प्रभावी असल्याने नागरिकांनी लस घेणे गरजेचे आहे. कोरोना विरोधात लढण्यासाठी भारताकडे लस हे शस्त्र तयार असून लसीमुळेच कोरोनापासून सुरक्षा करता येणार आहे. करिता नागरिकांनी लसीला घेऊन कसलीही भीती न बाळगता लसीकरण करवून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.