शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

३८५८ कोरोना चाचण्या अन् पाॅझिटिव्ह केवळ १३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:37 IST

गोंदिया : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता जिल्ह्यातून पूर्णपणे ओसरायला लागली आहे. बाधितांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने कोरोना ...

गोंदिया : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता जिल्ह्यातून पूर्णपणे ओसरायला लागली आहे. बाधितांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३०५ वर आली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने मंगळवारी (दि. ७) आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजन अशा एकूण ३८५८ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर मागील दोन दिवसांत एकही कोरोनाबाधित रुग्ण दगावला नाही. ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.

मे महिन्यापासूनच जिल्ह्यात कोरोनाला उतरती कळा लागली आहे, तर जून महिन्यात बाधितांची संख्या बरीच कमी झाली. त्यामुळे कोरोनाचा पाॅझिटिव्हिटी रेट २ टक्केच्या आतच आहे, तर ऑक्सिजन बेडवरील रुग्णसंख्या सुद्धा आता ३ टक्केच आहे. त्यामुळेच गोंदियाचा अनलॉकच्या पहिल्याच स्तरात समावेश झाला. परिणामी जिल्ह्यातील सर्वच निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे सर्वच व्यवहार अनलॉक झाल्याने व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी जिल्ह्यात ४१ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर १३ नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १७१३०० स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १६८८१० नमुने निगेटिव्ह आले. कोरोना बाधितांचा शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १६८८१० नमुने तपासणी करण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यात ४०९६० कोरोनाबाधित आढळले असून, त्यापैकी ३९९६२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ३०५ काेरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे.

..............

दररोज साडेचार हजारांवर नागरिकांचे लसीकरण

काेरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वाचे शस्त्र आहे. आतापर्यंत २ लाख ८१ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यात २ लाख १६ हजार नागरिकांना पहिला, तर ६५७६१ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. दररोज साडेचार हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.

..............

निर्बंध शिथिल झाले, कोरोना नव्हे

सोमवारपासून जिल्ह्यात अनलॉक करण्यात आले आहे. अनलॉक करताच पुन्हा नागरिक रस्त्यांवर आणि बाजारपेठेत गर्दी करू लागले आहेत. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याकडे दुलर्क्ष करीत आहेत. जिल्ह्यातून कोरोना पूर्णपणे गेला या आविर्भावात नागरिक वावरत आहेत. मात्र, कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नसून, आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे.