शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
4
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
5
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
6
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
7
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
8
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
9
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
10
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
11
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
12
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
13
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
14
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
15
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
16
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
17
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
18
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
19
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
20
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला

३८३ प्रकल्पग्रस्तांसाठी ३८.४३ कोटींचे पॅकेज

By admin | Updated: July 10, 2017 00:41 IST

तालुक्यातील ग्राम बिरसी येथील ३८३ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून ...

बोर्डाच्या बैठकीत विषय लागला मार्गी : उपविभागीय अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील ग्राम बिरसी येथील ३८३ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून यासाठी ३८.४३ कोटींच्या पॅकेजला मंजुरी मिळाली आहे. बोर्डाच्या १७५ व्या बैठकीत हा विषय निकाली लागला. बिरसी विमानतळ विस्तारीकरणासाठी प्राधीकरणने ग्राम परसवाडा, झिलमीली, कामठा व बिरसी या गावातील अनेकांची शेती व घरांचे अधिग्रहण केले होते. या प्रकल्पग्रस्तांनी योग्य तो मोबदला देण्याचे आश्वासन देऊनही तत्कालीन कॉंग्रेस सरकारने त्यांच्या कार्यकाळात काहीच मदत केली नाही. दरम्यान सन २०१४ मध्ये केंद्र व राज्यात भारतीय जनता पक्षाने सत्ता काबीज केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसनाच्या विषयाशी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या माध्यमातून खासदार नाना पटोले यांना अवगत करविले. प्रकल्पग्रस्तांचा हा गंभीर विषय असल्याने खासदार पटोले यांनी प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाला घेऊन दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या पुढे मांडला होता. यावर नामदार सिन्हा यांनी भारतीय विमानपत्तन प्राधीकरणचे के. सुधाकर यांच्याशी चर्चा करून हे प्रकरण मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते. तर याच विषयाला घेऊन नामदार सिन्हा यांच्यासोबत २९ मार्च रोजी खासदार पटोले, बिरसी विमानतळ अधिकारी रेड्डी व येथील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीतच नामदार सिन्हा यांच्याकडून पॅकेज मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या बैठकीच्या आधारावर ६ जून रोजी बोर्डाच्या १७५ व्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला व ३८.४३ कोटींच्या या पुनर्वसन पॅकेजच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. याबाबत भारतीय विमानपत्तन प्राधीकरणचे निर्देशक संदीप पिंपळापुरे यांनी तसे पत्र काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.