शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

३८३ प्रकल्पग्रस्तांसाठी ३८.४३ कोटींचे पॅकेज

By admin | Updated: July 10, 2017 00:41 IST

तालुक्यातील ग्राम बिरसी येथील ३८३ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून ...

बोर्डाच्या बैठकीत विषय लागला मार्गी : उपविभागीय अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील ग्राम बिरसी येथील ३८३ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून यासाठी ३८.४३ कोटींच्या पॅकेजला मंजुरी मिळाली आहे. बोर्डाच्या १७५ व्या बैठकीत हा विषय निकाली लागला. बिरसी विमानतळ विस्तारीकरणासाठी प्राधीकरणने ग्राम परसवाडा, झिलमीली, कामठा व बिरसी या गावातील अनेकांची शेती व घरांचे अधिग्रहण केले होते. या प्रकल्पग्रस्तांनी योग्य तो मोबदला देण्याचे आश्वासन देऊनही तत्कालीन कॉंग्रेस सरकारने त्यांच्या कार्यकाळात काहीच मदत केली नाही. दरम्यान सन २०१४ मध्ये केंद्र व राज्यात भारतीय जनता पक्षाने सत्ता काबीज केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसनाच्या विषयाशी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या माध्यमातून खासदार नाना पटोले यांना अवगत करविले. प्रकल्पग्रस्तांचा हा गंभीर विषय असल्याने खासदार पटोले यांनी प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाला घेऊन दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या पुढे मांडला होता. यावर नामदार सिन्हा यांनी भारतीय विमानपत्तन प्राधीकरणचे के. सुधाकर यांच्याशी चर्चा करून हे प्रकरण मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते. तर याच विषयाला घेऊन नामदार सिन्हा यांच्यासोबत २९ मार्च रोजी खासदार पटोले, बिरसी विमानतळ अधिकारी रेड्डी व येथील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीतच नामदार सिन्हा यांच्याकडून पॅकेज मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या बैठकीच्या आधारावर ६ जून रोजी बोर्डाच्या १७५ व्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला व ३८.४३ कोटींच्या या पुनर्वसन पॅकेजच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. याबाबत भारतीय विमानपत्तन प्राधीकरणचे निर्देशक संदीप पिंपळापुरे यांनी तसे पत्र काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.