शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

३५ हजार महिलांना स्वयंपाकासाठी उज्ज्वलाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:40 IST

स्वयंपाकासाठी महिलांचे चुलीवर असलेले अवलंबित्व कमी करु न त्यांचा त्रास कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मे २०१६ पासून पंतप्रधान उज्ज्वला योजना सुरु केली.

ठळक मुद्देडोळ्यांचा त्रास टळणार : धूर व चुलींपासून महिलांची मुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्वयंपाकासाठी महिलांचे चुलीवर असलेले अवलंबित्व कमी करु न त्यांचा त्रास कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मे २०१६ पासून पंतप्रधान उज्ज्वला योजना सुरु केली. चुलीवर स्वयंपाक करताना चुलीतील जळत्या निखाºयांवर फुंकर मारताना निघणाºया धुरामुळे महिलांना डोळ्याचे आजार होतात. महिलांना होणारा हा त्रास आता प्रधानमंत्री उज्जवला गॅस योजनेमुळे कमी झाला आहे. जिल्ह्यातील ३५ हजार ४०१ महिलांच्या घरातील गॅस प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे पेटण्यास मदत झाली. त्यामुळे त्यांना स्वयंपाकासाठी मोठा आधार झाला आहे.काबाडकष्ट करणाºया दारिद्र्य रेषेखालील महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दुर्बल घटकातील महिलांना या योजनेचा जिल्ह्यात प्राधान्याने लाभ देण्यात येत आहे. ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही अशा १८ वर्षे पूर्ण केलेल्या विवाहित महिलेच्या कुटूंबाला या योजनेंतर्गत गॅस कनेक्शन देण्यात येत आहे.प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस कनेक्शन घेणाºया कुटूंबाला सिलिंडरचे १२५० रुपये, रेग्युलेटरची सुरक्षा ठेव राशी १५० रु पये, १०० रु पये सुरक्षा होज, गॅस पासबुकचे २५ रूपये आणि तपासणी शुल्क, इन्स्ट्रॉलेशन व प्रशासकीय शुल्क ७५ रुपये असे एकूण १६०० रु पये भरावे लागतात. हे पैसे केंद्र सरकारकडून लार्भाथ्याला कर्ज स्वरूपात दिल्या जाते. २ बर्नर असलेली शेगडी ९९० रुपयांमध्ये दिली जात आहे. रिफील गॅस हे कंपनीकडून ग्राहकाला कर्ज स्वरूपात दिल्या जात आहे. गॅसमुळे जर अपघात होवून व्यक्तीचा मृत्यू झाल्यास प्रति व्यक्ती ६ लाख रूपयांचा विमा सुध्दा काढण्यात येत आहे.प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ५ लाख ८९ हजार ८३ कुटुंबांनी तर शहरी भागातील १४ हजार ८५ कुटुंबांनी नोंदणी केली आहे. १ लाख ४२ हजार २१९ कुटुंबांचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले असून या योजनेसाठी ७१ हजार १४० कुटुंब पात्र ठरले आहे. त्यापैकी ३५ हजार ५७० कुटुंबांकडे पूर्वीचेच गॅस कनेक्शन असल्यामुळे उर्वरित ३५ हजार ४०१ कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे.ग्रामीण महिला शेतीची कामे करतात. जंगल व शेत परिसरातून आणलेल्या जळतणावर दोन्ही वेळचा स्वयंपाक करावा लागत असल्यामुळे त्यांना धुराचा सामना करावा लागतो. त्यामुळेमुळे त्यांना डोळ्यांच्या विकारांचा सामनादेखील करावा लागत होता. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून आता त्यांना गॅस कनेक्शन मिळाल्यामुळे स्वच्छ इंधन प्राप्त झाले. हजारो घरी उज्वला योजनेतून गॅस पेटला आणि चुली व धुरापासून महिलांना मुक्तता मिळाली आहे.