शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

३४५ शिक्षकांना तूर्त दिलासा

By admin | Updated: June 11, 2016 01:51 IST

जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या नियमांना डावलून करण्यात आल्याचा आरोप

प्रशासकीय बदल्यांना स्थगिती : शिक्षक संघाच्या प्रयत्नांना आले यशगोंदिया : जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या नियमांना डावलून करण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर ग्राम विकास व जलसंधारण विभागाचे कक्ष अधिकारी संजय कुडवे यांनी या बदल्यांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. परिणामी बदली झालेल्या ३४५ शिक्षकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.कार्यरत असलेल्या शाळांना डिजीटल करण्यासाठी मोठा खटाटोप करणाऱ्या शिक्षकांना प्रशासकीय बदलीत दुसऱ्या शाळेत जावे लागत होते. तसेच सदर बदल्या करताना जि.प.च्या शिक्षण विभागाने नियमांना धाब्यावर बसवून बदल्या केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केला होता. हे प्रकरण ३ जूनपासून गाजत आहे. या प्रकरणाला घेऊन खा.नाना पटोले, तिरोडाचे आ.विजय रहांगडाले व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी हा मुद्दा मंत्रालयापर्यंत नेऊन जि.प.ने केलेल्या बदल्यांवर स्थगिती आणली. जि.प.ने ३४५ शिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या, तर १०७ लोकांना बदलीतून विविध कारणे दाखवून सूट दिली होती. ४९ शिक्षक अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी होते, त्यांना मात्र जागा नसल्याचे दाखवून हलविले नाही. हा सर्व प्रकार पाहून शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, नूतन बांगरे, यू.पी. बांगरे, सुधीर बाजपेयी, शंकर नागपुरे, शंकर चव्हाण यांनी पुढाकार घेऊन आ.विजय रहांगडाले यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडे व्यथा मांडल्यावर त्यांनी शिक्षकांचे शिष्टमंडळ मुंबईला घेऊन गेले. जि.प.ने ३ जून रोजी सार्वत्रिक बदल्यांच्या समूपदेशन कार्यशाळेत मोठ्या प्रमाणात अनियमीतता केली. महाराष्ट्र शिक्षक संघाच्या या मागणीला पुढे रेटण्यासाठी केदार गोटेफोडे, नागसेन भालेराव, अयुब खान, पवन कोल्हे, वाय.एस. मुंगुलमारे, वाय.एस. भगत, बी.बी. ठाकरे, अनिरूध्द मेश्राम, चंद्रशेखर दमाहे, ए.जी. पठाण, ओमप्रकाश डहाके, पी.के. पटले, रमेश संग्रामे, पी.के. लोथे, वाय.बी. पटले, विजय बिसेन, डी.पी. बोरकर, दुर्गा कोकोडे, राजू गुनेवार, अरविंद नाकाडे, एन.जे. चव्हाण, लक्षमी हविणखेडे, एन.एस. कोरे, रमेश भलावी, ओमेश्वरी बिसेन, श्रीधर पंचभाई, डी.बी.पटले, अनिता माकडे, कल्पना मानकर व पुष्पा पटले यांनीही सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)अशी झाली अनियमितताप्रशासकीय बदली पात्र शिक्षकांची यादी विहीत कालावधीत प्रसिध्द केली नाही. कार्यशाळेच्या १६ तासापूर्वी प्रसिध्द करण्यात आलेली यादी दोषपूर्ण होती, मात्र आक्षेप घेण्यास वेळ देण्यात आला नाही. समूपदेशन प्रक्रिया पूर्ण करण्याकरीता शिक्षकांना कोणत्याही प्रकारची लेखी सूचना देण्यात आली नाही. प्रशासकीय बदलीने रिक्त होणाऱ्या व उपलब्ध रिक्त पदांची पूर्ण व अचूक माहिती समुपदेशनाच्या किमान दोन दिवसाअगोदर कार्यशाळेत दाखविण्यात आली नाही. नक्षलग्रस्त भागातील शिक्षकांच्या बळजबरीने बदल्या करण्यात आल्या. पती-पत्नी एकत्रिकरणाला बगल दिली. जिल्हा पातळीवरील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बदलीतून सूट देण्यात आली नाही. सन २०११-१२ मध्ये प्रशासकीय बदल्यांतील शिक्षकांची पुन्हा प्रशासकीय बदली करण्यात आली. आजारी शिक्षकांची सूड भावनेडून नक्षलग्रस्त भागात बदली करण्यात आली. मराठी माध्यमांवर हिंदी शिक्षक व हिंदी माध्यमांवर मराठी शिक्षक देण्यात आले. आपल्या मर्जीतील शिक्षकांना कोणतेही कारण नसताना बदलीतून सूट देण्यात आली, असे अनेक आरोप या बदल्यांसंदर्भात झाले.