शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

३२ मंडळात रंगला लोकमान्य उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2016 00:36 IST

कोणत्याही स्पर्धेत तालुक्यातून प्रथम येणाऱ्यांना जिल्हास्तरावर स्पर्धेत भाग घेता येते.

१४ मंडळांना मिळणार, १७ पुरस्कारनरेश रहिले गोंदियाकोणत्याही स्पर्धेत तालुक्यातून प्रथम येणाऱ्यांना जिल्हास्तरावर स्पर्धेत भाग घेता येते. किंवा प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक घेणाऱ्यांना जिल्हास्तरावर सहभागी केले जाते. परंतु शिक्षण विभागाने लोकमान्य उत्सवात कोणत्याही मंडळावर अन्याय होऊ नये म्हणून या स्पर्धेत उतरलेल्या जिल्ह्यातील ३२ ही मंडळांना जिल्हास्तरावरील स्पर्धेत सहभागी केले आहे. शासन निर्णयात जिल्हास्तरावर कोणत्या मंडळांना सहभागी करावे असे स्पष्ट नमूद नसल्यामुळे या स्पर्धेत उतरलेल्या ३२ मंडळांना जिल्हास्तरावरील स्पर्धेत सहभागी केले.गणेशोत्सवातून मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावे, समाजात जनजागृती घडवावी यासाठी राज्य शासनाने यावर्षापासून स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाओ, व्यसनमुक्ती व जलसंवर्धन याविषयाला घेऊन लोकमान्य उत्सव साजरा केला. या उत्सवादरम्यान जिल्ह्यातील ३२ गणेश मंडळे सहभागी झाली असून यापैकी १४ गणेश मंडळांना १७ पुरस्कार दिले जाणार आहेत. लोकमान्य उत्सव साजरा करताना सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी शासनाने पाच विषय देऊन त्या विषयावर आकर्षक देखावे तयार करणाऱ्या मंडळांना तालुका स्तरापासून विभागस्तरापर्यंत प्रथम, व्दितीय व तृतीय असे रोख बक्षीस ठेवण्यात आले. परंतु तीन पुरस्कारासाठी कमीत कमी पाच मंडळे सहभागी व्हायला हवे, अन्यथा तीन पुरस्कार दिले जाणार नाही असे शासनाने सूचविले होते. एका तालुक्यातून चार मंडळे सहभागी झाल्यास त्या तालुक्याला फक्त दोन, तीन मंडळे सहभागी होणाऱ्या तालुक्याला फक्त एकच पुरस्कार देण्याचे शासनाने ठरविले.त्यामुळे जिल्ह्यातील आठही तालुक्यातील गणेश मंडळ सहभागी झाले असले तरी फक्त सहा तालुक्यातील मंडळांना पुरस्कार दिला जाणार आहे. त्यातल्या गोरेगाव, गोंदिया व सालेकसा या तीन तालुक्यांना प्रत्येकी तीन पुरस्कार, तिरोडा व देवरी यांना प्रत्येकी दोन, आमगावला एक तर अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी तालुक्यात प्रत्येकी दोन मंडळ सहभागी झाल्याने हे तालुके तालुकास्तराच्या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. सामाजिक भान ठेवून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी जनजागृतीच्या दृष्टीने देखावे, सामाजिक कार्य, समाजाचा सहभाग आदि विषयांना घेऊन शासनाने ठरवून दिलेल्या पाच पैकी एका संकल्पनेवर जनजागृती घडवून आणण्याचे काम करायचे होते. जिल्ह्यात ९६३ ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्ती स्थापन केल्या होत्या. या स्पर्धेत जिल्हाभरातून ३२ मंडळे सहभागी झाले होते. सालेकसा तालुक्यातील पाच मंडळांपैकी एका मंडळाची धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून नोंदणी नव्हती परंतु शासनाने ३ सप्टेंबर रोजी काढलेल्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पोलीस ठाण्याची परवानगी असेल ते मंडळही स्पर्धेत सहभागी होऊ शकतात असे सांगितले होते. जिल्हास्तरावरचे तीन पुरस्कार दिले जाणार आहे. एकूण १७ पुरस्कार होत असले तरी हे पुरस्कार १४ गणेश मंडळांना दिले जाणार होते. परंतु तालुका स्तरावर क्रमांक न मिळालेले किंवा स्पर्धेअभावी तालुक्यातून वंचीत राहीलेल्या मंडळांना जिल्हास्तरावर पुरस्कार मिळाल्यास पुरस्कार घेणाऱ्या मंडळांची संख्या वाढणार आहे.४.८० लाखांचे बक्षीस मिळणारगोंदिया जिल्ह्यात आठ तालुके आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय असे २४ पुरस्कार तर जिल्हास्तरावर तीन पुरस्कार असे एकूण २७ पुरस्कार आहेत. प्रत्येक तालुक्याला तीन पुरस्कार द्यायचे होते. परंतु पाच किंवा त्यापेक्षा अधिक मंडळे सहभागी झाले असतील तर तीन पुरस्कार द्यावे, चार मंडळे सहभागी झालेत तर दोन पुरस्कार, तीन मंडळ सहभागी झालेत तर एकच पुरस्कार देण्याचे प्रावधान केल्याने अनेक मंडळांची गोची झाली. जिल्ह्यातील मंडळांना चार लाख ८० हजारांचे पुरस्कार दिले जाणार आहे.