शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

जागेच्या अधिग्रहणासाठी ३२ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 21:50 IST

शहरातील पूर्व बायपासच्या (पोलीस मुख्यालय कारंजा-जिल्हाधिकारी कार्यालय-बालाघाट रोड) बांधकामात येत असलेली जागेची अडचण आता दूर होणार आहे.

ठळक मुद्देशहरातील पूर्व बायपास : डिसेंबर अखेर होणार मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील पूर्व बायपासच्या (पोलीस मुख्यालय कारंजा-जिल्हाधिकारी कार्यालय-बालाघाट रोड) बांधकामात येत असलेली जागेची अडचण आता दूर होणार आहे. बायपाससाठी जागा अधिग्रहीत करण्यासाठी ३२ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळेच लवकरच जागेचे अधिग्रहण करून बायपासचे उर्वरीत काम पूर्ण केले जाणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत बायपास वाहतुकीसाठी मोकळा होणार असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी म्हटले आहे.छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यांना लागून असल्याने गोंदिया शहरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. यात प्रामुख्याने जड वाहनांचा समावेश असून शहरातून ही वाहतूक होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. शिवाय ट्राफीक जामची समस्या शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत होती.या समस्येवर कायमचा तोडगा निघावा यासाठी बायपास रस्ता तयार करण्यासाठी आमदार अग्रवाल यांचे प्रयत्न सुरू होते. बायपासने वाहतूक सुरू झाल्यास ट्राफीक जाम व अपघातांची समस्या सुटणार ही बाब आमदार अग्रवाल यांनी हेरली होती. यासाठी त्यांनी १० वर्षांपूर्वी जागा अधिग्रहणाची प्रक्रीया सुरू केली होती. तर तत्कालीन कॉंग्रेस सरकारमधील केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री कमलनाथ यांना विनंती करून पूर्वी बायपाससाठी केंद्रीय रस्ते निधीमधून सुमारे ६८ कोटी रूपयांचा निधी मंजूर करवून घेतला होता.यातील सुमारे १५ कोटी रूपयांचा निधी जागा अधिग्रहीत करण्यासाठी वापरण्यात आला. एवढेच नव्हे तर रेल्वे लाईन असल्याने त्यावर उड्डाणपुलाचे बांधकामही करण्यात आले. मात्र या बायपास बांधकामात मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या व त्यांच्यावर मात करीत आता बायपासचे सुमारे ९९ टक्के काम जवळपास पूर्ण झाले आहे.गोरेगाव- आमगाव रस्त्याला जोडणारा बायपास रस्ता उपयोगासाठी मोकळा करण्यात आला आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय ते बालाघाट रोड पर्यंत महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चुकीमुळे सुमारे २०० मीटर लांब जागा अधिग्रहीत करता आली नाही. परिणामी बायपासचे पूर्ण होऊनही त्याचा उपयोग होत नव्हता.शहरासाठी महत्वपूर्ण बायपास रस्ता असल्याने आमदार अग्रवाल यांनी उर्वरीत जागेच्या अधिग्रहणासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाला पाठविला होता. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूरी देत जागा अधिग्रहीत करण्यासाठी ३२ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे.निधी मिळाल्याने जागेची अडचण आता दूर होणार असून लवकरच बायपास वाहतुकीसाठी मोकळा होणार आहे.