शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

तलाठ्यांच्या सहा पदांसाठी ३१४८ अर्ज

By admin | Updated: September 9, 2016 01:59 IST

जिल्ह्यात तलाठ्यांच्या अवघ्या ६ जागांसाठी तब्बल ३१४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

गोंदिया : जिल्ह्यात तलाठ्यांच्या अवघ्या ६ जागांसाठी तब्बल ३१४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात सर्वसाधारण प्रवर्गातील ४४८ तर राखीव प्रवर्गांमधील २७०० अर्ज आहेत. येत्या ११ सप्टेंबरला होणाऱ्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. विशेष म्हणजे यावेळी प्रथमच मुलाखती न घेता परीक्षेच्या निकालावरून थेट नियुक्तीचे आदेश मिळणार असल्यामुळे बेरोजगार उमेदवारांमध्ये अधिक उत्सुकता दिसून येत आहे. वर्ग ३ व ४ च्या कोणत्याही स्थायी पदांच्या भरतींसाठी मुलाखतींमध्ये कोणतीही गडबड होऊ नये यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आता मुलाखती बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांनी परीक्षेत कमावलेल्या गुणांवरच त्यांच्या नोकरीचे भवितव्य असल्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शन ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण काळजी घेतल्याचे दिसून येते.तलाठ्यांची सहा पदे भरायची आहेत. त्यासाठी परीक्षेतील गुणांच्या आधारे कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पहिल्या १२ किंवा १८ उमेदवारांना बोलविले जाऊ शकते. त्यात ज्या उमेदवारांचे कागदपत्र अपात्र ठरतील त्यांना संधी गमवावी लागेल आणि पुढील उमेदवाराला संधी मिळेल. ईटीएच लि.पुणे या एजन्सीला परीक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. यात सदर पदांसाठी अर्ज मागविणारी जाहीरात प्रकाशित करणे, आॅनलाईन अर्ज स्वीकारणे, त्यांची स्क्रुटीनी करणे, अर्जदारांना हॉल तिकीट देणे आणि निकाल प्रकाशित करणे ही जबाबदारी ‘महाआॅनलाईन’कडे होती. तर परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका पुरविण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी सांभाळली. ईटीएच या कंपनीकडे उत्तरपत्रिका पुरविणे, त्यांची तपासणी करणे, गुणांची यादी तयार करणे, उत्तरपत्रिकांची स्कॅनिंग करून पीडीएफ करणे अशा जबाबदाऱ्या आहेत. ज्या १२ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे त्या केंद्रांवर कलम १४४ लागू राहील. (जिल्हा प्रतिनिधी)पारदर्शकता राहणारसदर परीक्षेची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहील याची दक्षता आम्ही घेतली आहे. परीक्षेनंतर उमेदवारांचे पेपर कोषागार विभागाच्या कस्टडीत राहणार असल्यामुळे कोणतीही गडबड होण्यास वाव नाही. शिवाय सर्व पेपरचे स्कॅनिंगही होणार आहे.- प्रवीण महिरेनिवासी उपजिल्हाधिकारी, गोंदिया