शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

३१० भूमिहीन शेतकरी कुटुंबाना बायोगॅस संयंत्र

By admin | Updated: July 4, 2016 01:29 IST

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी बायोगॅस संयंत्र वरदान ठरत आहे. बायोगॅस संयंत्रामुळे भोजन व इतर घरगुती काम सहज होत आहेत.

तीन वर्षांतील आढावा: संयंत्रासाठी ३६ लाख ४० हजार खर्चगोंदिया : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी बायोगॅस संयंत्र वरदान ठरत आहे. बायोगॅस संयंत्रामुळे भोजन व इतर घरगुती काम सहज होत आहेत. शिवाय महिलांना धूर व त्रासापासून सुटका मिळत आहे. यामुळे महिलांचे जीवनस्तर उंचावत आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात मागील तीन वर्षात ३१० भूमिहीन शेतकऱ्यांच्या महिलांना बायोगॅस संयंत्र देण्यात आले आहे. यावर ३६ लाख ३९ हजार ६९४ रूपये खर्च करण्यात आलेत. राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रमांतर्गत सन २०१३-१४ मध्ये ग्रामीण क्षेत्रातील १०० लोकांना बायोगॅस संयंत्र देण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात आले. यावर्षी ११ लाख ४० हजार ७१२ रूपये अनुदान मिळाले असून त्यातून ११ लाख २७ हजार ७१२ खर्च करण्यात आले. सन २०१४-१५ मध्येही १०० कुटुंबांना बायोगॅस देण्यात आले असून त्यावर ११ लाख ६९ हजार १८ रूपये खर्च करण्यात आले. सन २०१५-१६ मध्ये ११० कुटुंबांना बायोगॅस देण्याचे उद्दीट्ये होते व ते पुर्ण करण्यात आले. या वर्षासाठी मिळालेल्या १३ लाख ६३ हजार ३३६ रूपयांतून १३ लाख ४९ हजार ३६४ रूपये खर्च करण्यात आले. कृषी विभागाकडे ३३ हजार ४०० रूपये शिल्लक आहेत. बायोगॅस संयंत्रासाठी देण्यात येणारा निधी अत्यंत कमी असल्याने तो वाढविण्यात यावा अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)अशांना मिळतो लाभ ही योजना अल्पभूधारक, अतिअल्पभूधारक व भूमिहीन शेतकऱ्यांसाठी आहे. लाभ घेण्यासाठी त्यांच्या नावावर शेतीचा सातबारा व ८ ‘अ’ चा उतारा असणे गरजेचे आहे. लाभार्थी भूमिहीन व शेतमजूर असल्यास तलाठ्याचे प्रमाणपत्र, ग्रामसेवकाचे ५ ते ६ म्हशी असल्याचे प्रमाणपत्र, स्वत:च्या खर्चातून बायोगॅस संयंत्र तयार करण्याचे अर्ज पंचायत समितीत करणे गरजेचे आहे.९ हजारांचे अनुदानसर्वसाधारण स्वच्छता व पर्यावरण संतुलनाच्या उद्देशातून राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. कृषि विभागाद्वारे २ ते ६ घनमीटर क्षमतेच्या एका बायोगॅस संयंत्रासाठी ९ हजार रूपयांचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येते. बायोगॅस संयंत्राला शौचालयास जोडल्यावर १२०० रूपयांचे अतिरिक्त अनुदान मिळेल. मागील तीन वर्षात २३० बायोगॅस संयंत्राला शौचालयास जोडले गेले. परिणामी गावात आता स्वच्छता नांदत आहे.