शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

३१० भूमिहीन शेतकरी कुटुंबाना बायोगॅस संयंत्र

By admin | Updated: July 4, 2016 01:29 IST

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी बायोगॅस संयंत्र वरदान ठरत आहे. बायोगॅस संयंत्रामुळे भोजन व इतर घरगुती काम सहज होत आहेत.

तीन वर्षांतील आढावा: संयंत्रासाठी ३६ लाख ४० हजार खर्चगोंदिया : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी बायोगॅस संयंत्र वरदान ठरत आहे. बायोगॅस संयंत्रामुळे भोजन व इतर घरगुती काम सहज होत आहेत. शिवाय महिलांना धूर व त्रासापासून सुटका मिळत आहे. यामुळे महिलांचे जीवनस्तर उंचावत आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात मागील तीन वर्षात ३१० भूमिहीन शेतकऱ्यांच्या महिलांना बायोगॅस संयंत्र देण्यात आले आहे. यावर ३६ लाख ३९ हजार ६९४ रूपये खर्च करण्यात आलेत. राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रमांतर्गत सन २०१३-१४ मध्ये ग्रामीण क्षेत्रातील १०० लोकांना बायोगॅस संयंत्र देण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात आले. यावर्षी ११ लाख ४० हजार ७१२ रूपये अनुदान मिळाले असून त्यातून ११ लाख २७ हजार ७१२ खर्च करण्यात आले. सन २०१४-१५ मध्येही १०० कुटुंबांना बायोगॅस देण्यात आले असून त्यावर ११ लाख ६९ हजार १८ रूपये खर्च करण्यात आले. सन २०१५-१६ मध्ये ११० कुटुंबांना बायोगॅस देण्याचे उद्दीट्ये होते व ते पुर्ण करण्यात आले. या वर्षासाठी मिळालेल्या १३ लाख ६३ हजार ३३६ रूपयांतून १३ लाख ४९ हजार ३६४ रूपये खर्च करण्यात आले. कृषी विभागाकडे ३३ हजार ४०० रूपये शिल्लक आहेत. बायोगॅस संयंत्रासाठी देण्यात येणारा निधी अत्यंत कमी असल्याने तो वाढविण्यात यावा अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)अशांना मिळतो लाभ ही योजना अल्पभूधारक, अतिअल्पभूधारक व भूमिहीन शेतकऱ्यांसाठी आहे. लाभ घेण्यासाठी त्यांच्या नावावर शेतीचा सातबारा व ८ ‘अ’ चा उतारा असणे गरजेचे आहे. लाभार्थी भूमिहीन व शेतमजूर असल्यास तलाठ्याचे प्रमाणपत्र, ग्रामसेवकाचे ५ ते ६ म्हशी असल्याचे प्रमाणपत्र, स्वत:च्या खर्चातून बायोगॅस संयंत्र तयार करण्याचे अर्ज पंचायत समितीत करणे गरजेचे आहे.९ हजारांचे अनुदानसर्वसाधारण स्वच्छता व पर्यावरण संतुलनाच्या उद्देशातून राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. कृषि विभागाद्वारे २ ते ६ घनमीटर क्षमतेच्या एका बायोगॅस संयंत्रासाठी ९ हजार रूपयांचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येते. बायोगॅस संयंत्राला शौचालयास जोडल्यावर १२०० रूपयांचे अतिरिक्त अनुदान मिळेल. मागील तीन वर्षात २३० बायोगॅस संयंत्राला शौचालयास जोडले गेले. परिणामी गावात आता स्वच्छता नांदत आहे.