शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

३१० भूमिहीन शेतकरी कुटुंबाना बायोगॅस संयंत्र

By admin | Updated: July 4, 2016 01:29 IST

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी बायोगॅस संयंत्र वरदान ठरत आहे. बायोगॅस संयंत्रामुळे भोजन व इतर घरगुती काम सहज होत आहेत.

तीन वर्षांतील आढावा: संयंत्रासाठी ३६ लाख ४० हजार खर्चगोंदिया : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी बायोगॅस संयंत्र वरदान ठरत आहे. बायोगॅस संयंत्रामुळे भोजन व इतर घरगुती काम सहज होत आहेत. शिवाय महिलांना धूर व त्रासापासून सुटका मिळत आहे. यामुळे महिलांचे जीवनस्तर उंचावत आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात मागील तीन वर्षात ३१० भूमिहीन शेतकऱ्यांच्या महिलांना बायोगॅस संयंत्र देण्यात आले आहे. यावर ३६ लाख ३९ हजार ६९४ रूपये खर्च करण्यात आलेत. राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रमांतर्गत सन २०१३-१४ मध्ये ग्रामीण क्षेत्रातील १०० लोकांना बायोगॅस संयंत्र देण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात आले. यावर्षी ११ लाख ४० हजार ७१२ रूपये अनुदान मिळाले असून त्यातून ११ लाख २७ हजार ७१२ खर्च करण्यात आले. सन २०१४-१५ मध्येही १०० कुटुंबांना बायोगॅस देण्यात आले असून त्यावर ११ लाख ६९ हजार १८ रूपये खर्च करण्यात आले. सन २०१५-१६ मध्ये ११० कुटुंबांना बायोगॅस देण्याचे उद्दीट्ये होते व ते पुर्ण करण्यात आले. या वर्षासाठी मिळालेल्या १३ लाख ६३ हजार ३३६ रूपयांतून १३ लाख ४९ हजार ३६४ रूपये खर्च करण्यात आले. कृषी विभागाकडे ३३ हजार ४०० रूपये शिल्लक आहेत. बायोगॅस संयंत्रासाठी देण्यात येणारा निधी अत्यंत कमी असल्याने तो वाढविण्यात यावा अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)अशांना मिळतो लाभ ही योजना अल्पभूधारक, अतिअल्पभूधारक व भूमिहीन शेतकऱ्यांसाठी आहे. लाभ घेण्यासाठी त्यांच्या नावावर शेतीचा सातबारा व ८ ‘अ’ चा उतारा असणे गरजेचे आहे. लाभार्थी भूमिहीन व शेतमजूर असल्यास तलाठ्याचे प्रमाणपत्र, ग्रामसेवकाचे ५ ते ६ म्हशी असल्याचे प्रमाणपत्र, स्वत:च्या खर्चातून बायोगॅस संयंत्र तयार करण्याचे अर्ज पंचायत समितीत करणे गरजेचे आहे.९ हजारांचे अनुदानसर्वसाधारण स्वच्छता व पर्यावरण संतुलनाच्या उद्देशातून राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. कृषि विभागाद्वारे २ ते ६ घनमीटर क्षमतेच्या एका बायोगॅस संयंत्रासाठी ९ हजार रूपयांचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येते. बायोगॅस संयंत्राला शौचालयास जोडल्यावर १२०० रूपयांचे अतिरिक्त अनुदान मिळेल. मागील तीन वर्षात २३० बायोगॅस संयंत्राला शौचालयास जोडले गेले. परिणामी गावात आता स्वच्छता नांदत आहे.