शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

३०५२ कामे ११ वर्षांपासून रखडलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:21 IST

जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेची कामे करण्याचे प्रावधान केंद्र शासनाने केले आहे. गोंदिया जिल्ह्यात या योजनेची उत्तम अमंलबजावणी यापूर्वी झाली. परंतु यंदा रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी जून्या कामांना प्राधान्य दिलेच नाही व नविन कामे सुरूही केली नाही.

ठळक मुद्देशासन निर्णय डावलला : उपजिल्हाधिकाऱ्यांचे ‘ते’ पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी केले रद्द

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेची कामे करण्याचे प्रावधान केंद्र शासनाने केले आहे. गोंदिया जिल्ह्यात या योजनेची उत्तम अमंलबजावणी यापूर्वी झाली. परंतु यंदा रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी जून्या कामांना प्राधान्य दिलेच नाही व नविन कामे सुरूही केली नाही. त्यामुळे ११ वर्षापासून जिल्ह्यातील रोहयोच्या ३ हजार ५० कामांना पुर्णत्वाची प्रतिक्षा आहे.बेजगारीवर मात करण्यासाठी केंद्रशासनाने रोजगार हमी योजना जोमाने राबविण्याचे निर्देश दिले. परंतु नवीन कामे मला विचारल्याशिवाय करू नका, असा फतवा उपजिल्हाधिकारी मनरेगा यांनी काढून कामांना खीळ बसविली व जुन्या कामांकडेही लक्ष दिले नाही. त्यामुळे मागील ११ वर्षापासून कामे प्रलंबित असल्यामुळे जिल्ह्यातील लाखो मजूरांच्या हाताला काम नाही. अपूर्ण कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यायला हवे होते.ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार कामाला सुरूवात करायला पाहिजे होती. जी कामे अपूर्ण आहेत त्याच प्रकारची नवीन कामे सुरू करू नये असे असतांना जून्या कामांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ अशी अवस्था जून्या कामांची झाली आहे.एखाद्या ग्राम पंचायतमध्ये अपेक्षीत मनुष्य दिवसाच्या मागणीपेक्षा अपूर्ण कामांवरील शिल्लक मनुष्य दिवसांची संख्या जास्त असल्यास नवीन कामांचे नियोजन न करता प्रथम कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिल्या आहेत. त्या ग्रामपंचायतचे आर्थिक वर्ष २०१९-२० साठी मजूर आर्थिक संकल्पात हे अपूर्ण कामांवरील शिल्लक मनुष्य दिवसाच्या संख्येऐवढे निश्चीत करावे. ग्रामपंचायतमध्ये मजूरांच्या मागणीनुसार काम सुरू करताना सेल्फवरील कामे प्राधान्याने मजुरांना उपलब्ध करून देण्याचे काम रोजगार सेवकाचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी रोहयो यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. कंत्राटी कर्मचाºयांना धारेवर घेऊन कामे केल्यास तुमच्या खिशातून झालेल्या कामाचे पैसे वसूल करील अशी तंबी उपजिल्हाधिकारी रोहयो यांनी पत्र क्र. ३२/२०१९ दिनांक ७ जानेवारी २०१९ ला या पत्रान्वये दिली होती. त्या पत्राला जिल्हाधिकाºयांनी रद्द केले आहे.जि.प.च्या सभेत गाजला होता मुद्दाजिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत रोहयोच्या कामाचा मुद्दा अर्धा तास जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी गाजवला होता. त्यानंतर प्रकरणी मुकाअ डॉ. राजा दयानिधी यांच्याशी चर्चा केली. मुकाअ यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यावर जुनी कामे प्रलंबित असल्याचे लक्ष वेधले गेले. जिल्हाधिकारी यांनी या जुन्या कामांना पुर्णत्वास नेण्याची कारवाई त्वरीत करा असे पत्र काढले.देवरी तालुक्यातील कामे रेंगाळलेलीसन २००५-०६ ते २०१५-१६ या ११ वर्षांच्या काळातील ३३६५ कामे रेंगाळलेली असल्याचे पत्र १ मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी मनरेगाचे उपजिल्हाधिकारी कोरडे यांना दिले. जिल्हाधिकाºयांकडे प्रलंबित असलेल्या रोहयोच्या कामाची यादी गेली तेव्हा ३ हजार ३६५ कामे अपूर्ण होती. परंतु १ मार्च पर्यंत ३ हजार ५० कामे अपूर्ण असल्याची माहिती पुढे आली. यात सर्वाधीक अपूर्ण असलेल्या कामाची संख्या देवरी तालुक्यातील असून त्याची संख्या १२४७ अशी आहे. त्या पाठोपाठ अर्जुनी-मोरगाव ५३८, गोरेगाव ३९१, सडक-अर्जुनी ३१६, तिरोडा १७५, सालेकसा १५४, गोंदिया १२७ व आमगाव १०४ कामे अपूर्ण आहेत.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी