शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
2
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
3
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
4
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
5
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
6
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
7
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
8
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
9
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
10
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
11
बेबी खान लवकरच येणार, शूराचं पार पडलं डोहाळजेवण; सलमानसह टीव्ही कलाकारांची हजेरी
12
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
13
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
14
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
15
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
16
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
17
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
18
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
20
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ

३०० हेक्टर शेती पडीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 22:57 IST

जिल्ह्यात ९५५ गावे असून यात ३६ गावे पीक नसलेली आहेत. उर्वरित ९१९ गावांची अंतिम पीक पैसेवारी जिल्हाधिकारी यांनी नुकतीच जाहीर करुन प्रस्ताव शासनाच्या महसूल व वनविभागाला सादर केला. या प्रस्तावात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १४८ गावांची पिक पैसेवारी ही ५० पैश्यापेक्षा वर दाखविण्यात आली आहे.

ठळक मुद्देअर्जुनी मोरगाववर अन्याय : न्याय देण्याची गंगाधर परशुरामकर यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात ९५५ गावे असून यात ३६ गावे पीक नसलेली आहेत. उर्वरित ९१९ गावांची अंतिम पीक पैसेवारी जिल्हाधिकारी यांनी नुकतीच जाहीर करुन प्रस्ताव शासनाच्या महसूल व वनविभागाला सादर केला. या प्रस्तावात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १४८ गावांची पिक पैसेवारी ही ५० पैश्यापेक्षा वर दाखविण्यात आली आहे. ३०० हेक्टर शेतीही पडीक राहिल्याचे कृषी विभागाचेच आकडे आहेत. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यावर अंतिम पिक पैसेवारी काढताना अन्याय झाला आहे. त्याचे फेर सर्वेक्षण करुन तालुक्यातील शेतकºयांना न्याय देण्याची मागणी जि.प.सदस्य परशुरामकर यांनी शासनाकडे केली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण थोडेफार चांगले असले तरी तुडतुळा व मावा या कीडरोगांचा सर्वात जास्त प्रकोप अर्जुनी मोरगाव तालुक्यातच झाला. यावर्षी गोंदिया जिल्ह्याला पाऊस अल्प झाल्याने ६२ हजार हेक्टर जमीन पडीक राहीली. या सर्व बाबीचा उहापोह जुलै पासून झालेल्या जि.प.च्या सर्वच स्थायी समितीत व सर्वसाधारण सभेत करुन जिल्हा प्रशासनाला व सरकारला माहिती देण्यात आली. जिल्ह्यात एकूण ९५५ गावे असून ३६ गावे रिठी आहेत. त्यात पिक घेतले जात नाही. उर्वरित ९१९ गावांची अंतिम पिक पैसेवारीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्याचे महसूल व वनविभागाला ३० डिसेंबरला सादर केला.सदर प्रस्ताव शासनाचे ४ मार्च व ३ नोव्हेंबर २०१५ च्या निकषानुसार सादर करण्यात आला. यात ५० पैश्याच्या खालील पिक पैसेवारी असलेली ७७१ गावे व ५० पैश्याच्या वरील पिक पैसेवारीची १४८ गावे असा अहवाल सादर करण्यात आला आहे. ही सर्व गावे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आहेत.अर्जुनी मोरगाव तालुक्यात एकूण १५९ गावे असून त्यातील ११ गावे पीक नसलेली आहेत. उर्वरित १४९ गावाची अंतिम पिक पैसेवारी ५० पैश्याचे वर दाखविण्यात आली आहे. वास्तविक या तालुक्यातही सुमारे ३०० हेक्टर जमिनीवर रोवणीच झाली नाही असा कृषी विभागाचा अहवाल आहे. पिक हातात येण्याच्या कालावधीतच पिकांवर मावा व तुडतुळा या कीडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. या तालुक्यातील एकही गाव ५० पैश्याच्या आत येऊ नये ही शोकांतिका असल्याचे परशुरामकर यांनी म्हटले आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्याचे सर्वेक्षण करून येथील शेतकºयांना न्याय द्यावा अशी मागणी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी शासनाकडे केली आहे.