शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

३०० हेक्टर शेती पडीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 22:57 IST

जिल्ह्यात ९५५ गावे असून यात ३६ गावे पीक नसलेली आहेत. उर्वरित ९१९ गावांची अंतिम पीक पैसेवारी जिल्हाधिकारी यांनी नुकतीच जाहीर करुन प्रस्ताव शासनाच्या महसूल व वनविभागाला सादर केला. या प्रस्तावात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १४८ गावांची पिक पैसेवारी ही ५० पैश्यापेक्षा वर दाखविण्यात आली आहे.

ठळक मुद्देअर्जुनी मोरगाववर अन्याय : न्याय देण्याची गंगाधर परशुरामकर यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात ९५५ गावे असून यात ३६ गावे पीक नसलेली आहेत. उर्वरित ९१९ गावांची अंतिम पीक पैसेवारी जिल्हाधिकारी यांनी नुकतीच जाहीर करुन प्रस्ताव शासनाच्या महसूल व वनविभागाला सादर केला. या प्रस्तावात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १४८ गावांची पिक पैसेवारी ही ५० पैश्यापेक्षा वर दाखविण्यात आली आहे. ३०० हेक्टर शेतीही पडीक राहिल्याचे कृषी विभागाचेच आकडे आहेत. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यावर अंतिम पिक पैसेवारी काढताना अन्याय झाला आहे. त्याचे फेर सर्वेक्षण करुन तालुक्यातील शेतकºयांना न्याय देण्याची मागणी जि.प.सदस्य परशुरामकर यांनी शासनाकडे केली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण थोडेफार चांगले असले तरी तुडतुळा व मावा या कीडरोगांचा सर्वात जास्त प्रकोप अर्जुनी मोरगाव तालुक्यातच झाला. यावर्षी गोंदिया जिल्ह्याला पाऊस अल्प झाल्याने ६२ हजार हेक्टर जमीन पडीक राहीली. या सर्व बाबीचा उहापोह जुलै पासून झालेल्या जि.प.च्या सर्वच स्थायी समितीत व सर्वसाधारण सभेत करुन जिल्हा प्रशासनाला व सरकारला माहिती देण्यात आली. जिल्ह्यात एकूण ९५५ गावे असून ३६ गावे रिठी आहेत. त्यात पिक घेतले जात नाही. उर्वरित ९१९ गावांची अंतिम पिक पैसेवारीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्याचे महसूल व वनविभागाला ३० डिसेंबरला सादर केला.सदर प्रस्ताव शासनाचे ४ मार्च व ३ नोव्हेंबर २०१५ च्या निकषानुसार सादर करण्यात आला. यात ५० पैश्याच्या खालील पिक पैसेवारी असलेली ७७१ गावे व ५० पैश्याच्या वरील पिक पैसेवारीची १४८ गावे असा अहवाल सादर करण्यात आला आहे. ही सर्व गावे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आहेत.अर्जुनी मोरगाव तालुक्यात एकूण १५९ गावे असून त्यातील ११ गावे पीक नसलेली आहेत. उर्वरित १४९ गावाची अंतिम पिक पैसेवारी ५० पैश्याचे वर दाखविण्यात आली आहे. वास्तविक या तालुक्यातही सुमारे ३०० हेक्टर जमिनीवर रोवणीच झाली नाही असा कृषी विभागाचा अहवाल आहे. पिक हातात येण्याच्या कालावधीतच पिकांवर मावा व तुडतुळा या कीडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. या तालुक्यातील एकही गाव ५० पैश्याच्या आत येऊ नये ही शोकांतिका असल्याचे परशुरामकर यांनी म्हटले आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्याचे सर्वेक्षण करून येथील शेतकºयांना न्याय द्यावा अशी मागणी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी शासनाकडे केली आहे.