शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

३०० हेक्टर शेती पडीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 22:57 IST

जिल्ह्यात ९५५ गावे असून यात ३६ गावे पीक नसलेली आहेत. उर्वरित ९१९ गावांची अंतिम पीक पैसेवारी जिल्हाधिकारी यांनी नुकतीच जाहीर करुन प्रस्ताव शासनाच्या महसूल व वनविभागाला सादर केला. या प्रस्तावात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १४८ गावांची पिक पैसेवारी ही ५० पैश्यापेक्षा वर दाखविण्यात आली आहे.

ठळक मुद्देअर्जुनी मोरगाववर अन्याय : न्याय देण्याची गंगाधर परशुरामकर यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात ९५५ गावे असून यात ३६ गावे पीक नसलेली आहेत. उर्वरित ९१९ गावांची अंतिम पीक पैसेवारी जिल्हाधिकारी यांनी नुकतीच जाहीर करुन प्रस्ताव शासनाच्या महसूल व वनविभागाला सादर केला. या प्रस्तावात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १४८ गावांची पिक पैसेवारी ही ५० पैश्यापेक्षा वर दाखविण्यात आली आहे. ३०० हेक्टर शेतीही पडीक राहिल्याचे कृषी विभागाचेच आकडे आहेत. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यावर अंतिम पिक पैसेवारी काढताना अन्याय झाला आहे. त्याचे फेर सर्वेक्षण करुन तालुक्यातील शेतकºयांना न्याय देण्याची मागणी जि.प.सदस्य परशुरामकर यांनी शासनाकडे केली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण थोडेफार चांगले असले तरी तुडतुळा व मावा या कीडरोगांचा सर्वात जास्त प्रकोप अर्जुनी मोरगाव तालुक्यातच झाला. यावर्षी गोंदिया जिल्ह्याला पाऊस अल्प झाल्याने ६२ हजार हेक्टर जमीन पडीक राहीली. या सर्व बाबीचा उहापोह जुलै पासून झालेल्या जि.प.च्या सर्वच स्थायी समितीत व सर्वसाधारण सभेत करुन जिल्हा प्रशासनाला व सरकारला माहिती देण्यात आली. जिल्ह्यात एकूण ९५५ गावे असून ३६ गावे रिठी आहेत. त्यात पिक घेतले जात नाही. उर्वरित ९१९ गावांची अंतिम पिक पैसेवारीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्याचे महसूल व वनविभागाला ३० डिसेंबरला सादर केला.सदर प्रस्ताव शासनाचे ४ मार्च व ३ नोव्हेंबर २०१५ च्या निकषानुसार सादर करण्यात आला. यात ५० पैश्याच्या खालील पिक पैसेवारी असलेली ७७१ गावे व ५० पैश्याच्या वरील पिक पैसेवारीची १४८ गावे असा अहवाल सादर करण्यात आला आहे. ही सर्व गावे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आहेत.अर्जुनी मोरगाव तालुक्यात एकूण १५९ गावे असून त्यातील ११ गावे पीक नसलेली आहेत. उर्वरित १४९ गावाची अंतिम पिक पैसेवारी ५० पैश्याचे वर दाखविण्यात आली आहे. वास्तविक या तालुक्यातही सुमारे ३०० हेक्टर जमिनीवर रोवणीच झाली नाही असा कृषी विभागाचा अहवाल आहे. पिक हातात येण्याच्या कालावधीतच पिकांवर मावा व तुडतुळा या कीडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. या तालुक्यातील एकही गाव ५० पैश्याच्या आत येऊ नये ही शोकांतिका असल्याचे परशुरामकर यांनी म्हटले आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्याचे सर्वेक्षण करून येथील शेतकºयांना न्याय द्यावा अशी मागणी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी शासनाकडे केली आहे.