शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

३३ टक्के शेतकऱ्यांनाच शेतकरी सन्मानचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 22:49 IST

विजय मानकर। लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात सुरु केलेल्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ आतापर्यंत तालुक्यातील ...

ठळक मुद्देलाभार्थ्यांची पायपीट सुरूच : यादी पाठविण्यास विलंब, अनेक शेतकरी प्रतीक्षेत

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात सुरु केलेल्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ आतापर्यंत तालुक्यातील केवळ ३३ टक्केच शेतकऱ्यांना मिळाल्याची माहिती आहे. ज्या शेतकऱ्यांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळाला नाही ते अद्यापही तहसील कार्यालयाची पायपीट करीत असल्याचे चित्र आहे.केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शेतकरी सन्मान योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाकाठी ६ हजार मानधन देण्याची घोषणा केली होती. यापैकी दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता मार्च अथवा एप्रिलमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा देखील करण्यात आला. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम लवकरात लवकर जमा करण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेला युध्द पातळीवर कामाला लावण्यात आले.यानंतरही तालुक्यात आतापर्यंत केवळ ३३ टक्केच शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. तालुक्यात एकूण शेतकऱ्यांची संख्या जवळपास २३ हजार असून त्यापैकी आतापर्यंत ७ हजार ६४० शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यात आला. शेतकरी सन्मान योजना सुरु झाली याला जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लोटला. त्यामुळे दुसऱ्या हप्त्याची रक्कम सुध्दा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणे अपेक्षीत होते.मात्र ती केवळ १५ टक्के शेतकऱ्यांनाच मिळाली आहे.एकूण २३ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ ३ हजार ५६८ शेतकऱ्यांच्या खात्यात दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली.चार हजार शेतकरी अपात्र?तालुक्यातील एकूण २३ हजार शेतकऱ्यांपैकी काही खातेदार ह्यात नसून काही कायमचे बाहेरगावी राहत असलेले शेतकरी,शासकीय नोकरी करणारे पेंशनधारक व पदाधिकारी इत्यादी शेतकरी अपात्र ठरत असून अशा शेतकऱ्यांची संख्या जवळपास चार हजारावर आहे.त्यांना वगळता तालुक्यात जवळपास १९ हजार शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळू शकतो.वेळकाढृू धोरणाचा परिणामशेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करुन शासनाकडे पाठविणाºया यंत्रणेच्या वेळकाढू धोरणामुळे वेळेत यादी केंद्र सरकारकडे पोहचत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकºयांच्या खात्यावर योजनेचे पैसे जमा होण्यास विलंब होत आहे.शेतकºयांची यादी आवश्यक माहितीसह तयार करुन महसूल विभागाच्या संबधीत विभागाकडे देण्याची जवाबदारी तलाठी कार्यालय,ग्रामपंचायत आणि कृषी विभागाकडे सोपविली होती. मात्र या विभागाकडे इतरही कामे असल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे.सर्व पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करुन पाठविण्यात आल्या आहेत.लवकरच प्रत्येक पात्र लाभार्थ्याना योजनेचा लाभ मिळेल. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रथम टप्याचे दोन हजार मिळाले त्यांच्या खात्यात दुसऱ्या व तिसऱ्या टप्याची ठराविक कालावधी जमा केली जाईल.- सी.जी.पित्तुलवार, तहसीलदार, सालेकसा.