शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

गोंदिया जिल्ह्यात ३ लाख क्विंटल धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:14 IST

आदिवासी विकास महामंडळाने शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी अद्यापही गोदामांची व्यवस्था केली नाही. परिणामी ३ लाख २ हजार क्विंटल धान ताडपत्र्यांचा आधार घेवून उघड्यावर पडला आहे.

ठळक मुद्देआदिवासी विकास महामंडळ दरवर्षी नुकसान तरी धडा नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आदिवासी विकास महामंडळाने शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी अद्यापही गोदामांची व्यवस्था केली नाही. परिणामी ३ लाख २ हजार क्विंटल धान ताडपत्र्यांचा आधार घेवून उघड्यावर पडला आहे. जिल्ह्यात सोमवारी (दि.१७) झालेल्या अवकाळी पावसाचा फटका या उघड्यावरील धानाला बसल्याची माहिती आहे.जिल्हा मार्केटिंग फडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा या दोन्ही विभागाची जिल्ह्यात एकूण शंभर धान खरेदी उघडण्यात आली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आत्तापर्यंत ६ लाख क्विंटल तर आदिवासी विकास महामंडळाने ३ लाख २ हजार क्विंटल धान खरेदी केली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी गोदामांची व्यवस्था केली जाते. मात्र आदिवासी विकास महामंडळातंर्गत खरेदी येणारा धान ठेवण्यासाठी गोदामांची व्यवस्था नाही. त्यामुळे खरेदी केलेला ३ लाख क्विंटल धान केंद्रावर उघड्यावर पडला आहे. जिल्ह्यात सोमवारी (दि.१७) झालेल्या अवकाळी पावसाचा काही प्रमाणात या धानाला फटका बसला. मात्र या विभागाच्या अधिकाऱ्यांनी खरेदी केंद्रावरील धान ताडपत्र्या झाकून ठेवला असून तो पूर्णपणे सुरक्षीत असल्याचा दावा केला. तर या केंद्रावर धान विक्रीस नेणाºया शेतकºयांची धान ओला झाल्याची ओरड आहे. आदिवासी विकास महामंडळातंर्गत मागील पंधरा ते वीस वर्षांपासून धान खरेदी केली जाते. मात्र खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी अद्यापही गोदामांची व्यवस्था करण्यात आली नाही. परिणामी दरवर्षी खरेदी केलेला धान उघड्यावर ठेवावा लागतो. याला अवकाळी पावसाचा फटका बसून नुकसान होते. मात्र यानंतरही या विभागाने कुठलाच धडा घेतला नाही.

कोट्यवधी रुपयांचे नुकसानआदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेला धान उघड्यावर राहिल्यामुळे आठ ते दहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्रकार देवरी येथे सात वर्षांपूर्वी घडला होता. याची तेव्हा भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी दखल घेतली होती. तेव्हा शासनाने गोदामांची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन सुध्दा हवेत विरल्याचे चित्र आहे.

अवकाळी पावसाचा खरेदी केंद्रावरील धानाला फटका बसला नसून धान पूर्णपणे ताडपत्र्या झाकून ठेवला असून धान पूर्णपणे सुरक्षीत आहे.- सुरेश आंबडकर, प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ.गोदामांचा प्रस्ताव मंत्रालयातचआदिवासी विकास महामंडळातंर्गत खरेदी केला जाणार धान ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात गोदामांची व्यवस्था करण्यात यावी.असा प्रस्ताव या विभागाच्या अधिकाºयांनी शासनाकडे पाठविला. मात्र मागील दहा वर्षांपासून या प्रस्तावावर कुठलाच निर्णय न झाल्याने गोदामांचा प्रस्ताव मंत्रालयातच धूळ खात पडला आहे.

टॅग्स :agricultureशेती