शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

गोंदिया जिल्ह्यात ३ लाख क्विंटल धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:14 IST

आदिवासी विकास महामंडळाने शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी अद्यापही गोदामांची व्यवस्था केली नाही. परिणामी ३ लाख २ हजार क्विंटल धान ताडपत्र्यांचा आधार घेवून उघड्यावर पडला आहे.

ठळक मुद्देआदिवासी विकास महामंडळ दरवर्षी नुकसान तरी धडा नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आदिवासी विकास महामंडळाने शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी अद्यापही गोदामांची व्यवस्था केली नाही. परिणामी ३ लाख २ हजार क्विंटल धान ताडपत्र्यांचा आधार घेवून उघड्यावर पडला आहे. जिल्ह्यात सोमवारी (दि.१७) झालेल्या अवकाळी पावसाचा फटका या उघड्यावरील धानाला बसल्याची माहिती आहे.जिल्हा मार्केटिंग फडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा या दोन्ही विभागाची जिल्ह्यात एकूण शंभर धान खरेदी उघडण्यात आली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आत्तापर्यंत ६ लाख क्विंटल तर आदिवासी विकास महामंडळाने ३ लाख २ हजार क्विंटल धान खरेदी केली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी गोदामांची व्यवस्था केली जाते. मात्र आदिवासी विकास महामंडळातंर्गत खरेदी येणारा धान ठेवण्यासाठी गोदामांची व्यवस्था नाही. त्यामुळे खरेदी केलेला ३ लाख क्विंटल धान केंद्रावर उघड्यावर पडला आहे. जिल्ह्यात सोमवारी (दि.१७) झालेल्या अवकाळी पावसाचा काही प्रमाणात या धानाला फटका बसला. मात्र या विभागाच्या अधिकाऱ्यांनी खरेदी केंद्रावरील धान ताडपत्र्या झाकून ठेवला असून तो पूर्णपणे सुरक्षीत असल्याचा दावा केला. तर या केंद्रावर धान विक्रीस नेणाºया शेतकºयांची धान ओला झाल्याची ओरड आहे. आदिवासी विकास महामंडळातंर्गत मागील पंधरा ते वीस वर्षांपासून धान खरेदी केली जाते. मात्र खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी अद्यापही गोदामांची व्यवस्था करण्यात आली नाही. परिणामी दरवर्षी खरेदी केलेला धान उघड्यावर ठेवावा लागतो. याला अवकाळी पावसाचा फटका बसून नुकसान होते. मात्र यानंतरही या विभागाने कुठलाच धडा घेतला नाही.

कोट्यवधी रुपयांचे नुकसानआदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेला धान उघड्यावर राहिल्यामुळे आठ ते दहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्रकार देवरी येथे सात वर्षांपूर्वी घडला होता. याची तेव्हा भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी दखल घेतली होती. तेव्हा शासनाने गोदामांची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन सुध्दा हवेत विरल्याचे चित्र आहे.

अवकाळी पावसाचा खरेदी केंद्रावरील धानाला फटका बसला नसून धान पूर्णपणे ताडपत्र्या झाकून ठेवला असून धान पूर्णपणे सुरक्षीत आहे.- सुरेश आंबडकर, प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ.गोदामांचा प्रस्ताव मंत्रालयातचआदिवासी विकास महामंडळातंर्गत खरेदी केला जाणार धान ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात गोदामांची व्यवस्था करण्यात यावी.असा प्रस्ताव या विभागाच्या अधिकाºयांनी शासनाकडे पाठविला. मात्र मागील दहा वर्षांपासून या प्रस्तावावर कुठलाच निर्णय न झाल्याने गोदामांचा प्रस्ताव मंत्रालयातच धूळ खात पडला आहे.

टॅग्स :agricultureशेती