शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
3
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
4
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
5
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
6
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
7
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
8
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
9
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
10
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
11
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
12
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
13
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
14
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
15
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
16
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
17
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
18
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
19
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
20
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला २७०० हजार लग्नाचा बार (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:26 IST

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग सन २०२० मध्ये सुरू झाल्याने तीन महिने सतत लॉकडाऊन करण्यात आले होते. परंतु कोरोना ...

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग सन २०२० मध्ये सुरू झाल्याने तीन महिने सतत लॉकडाऊन करण्यात आले होते. परंतु कोरोना जसाजसा कमी होऊ लागला तसातसा लॉकडाऊन शिथिल करण्यात आला. लग्नसमारंभाला मंजुरी देण्यात आली. ५० लोकांच्या आतच लग्न समारंभ करा असे आदेश शासन, प्रशासनाने दिले. परंतु या आदेशाचा गैरफायदा घेत लग्नाचा बारच फुटला. सुरुवातीला काहींनी परवानगी घेतली. परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने लोकांनी परवानगी न घेताच ५०० ते १००० लोकांच्या गर्दीत लग्न समारंभ केले.

दररोज लग्न समारंभ उरकण्यात आले. ना तिथी, ना कोरोनाची भीती यात लग्न समारंभ झाल्याने यातूनच कोरोनाचा उद्रेक झाला. गोंदिया जिल्ह्यातील ९३६ गावांपैकी असा एकही गाव शिल्लक नाही त्या गावात या वर्षभरात लग्न झाले नसेल. जोमाने लग्न समारंभ पार पाडण्यात आले. डिजे, ढोल यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत लग्न करण्यात आले. गोंदिया जिल्ह्याच्या आठही तालुक्यांतील प्रत्येक तालुक्यात शेकडोच्या वर लग्न झालीत. या लग्न समारंभातून कोरोनाचा उद्रेक होऊ लागला. परिणामी आज कोरोनाने उग्र रूप धारण केले आहे.

.....

बॉक्स

रजिस्टर्ड लग्नाकडे कुणी भटकलेच नाहीत

कोरोनाच्या काळात कमी पैशात लग्न करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. परंतु रजिस्टर्ड लग्न करणाऱ्यांची संख्या गोंदिया जिल्ह्यात नाही. सर्वसामान्यांसाठी न्यायालय बंद असल्याने कुणीही रजिस्टर्ड विवाह करण्यासाठी कुणीच पुढे आला नाही. सर्वांनी कमी खर्चात कमी लोकांत लग्न करणे पसंत केले.

.........

बॉक्स

एप्रिल कठीणच

मागील वर्षापासून यंदाच्या मार्च महिन्यापर्यंत झालेल्या लग्न समारंभामुळे कोरोनाचा उद्रेक झाला. ही परिस्थती सावरणे आता एप्रिल महिन्यात कठीण झाले आहे. एप्रिल महिन्यात ४ एप्रिलपासूनच सरकारने कडक निर्बंध लावले. त्यानंतर १५ एप्रिलपासून संचारबंदी लावली तरीही लोक लग्न समारंभ करीतच आहेत.

......

मंगल कार्यालय चालकांच्या प्रतिक्रिया

१) कोरोनाच्या संसर्गामुळे दरवर्षीच्या तुलनेत अर्धेही लग्न समारंभ आमच्याकडे झाले नाहीत. ५० लोकांच्या आतच लग्न आटोपण्याचा सरकारचा आदेश असल्याने लोकांनी मंगल कार्यालय करण्यापेक्षा घरीच लग्न करणे पसंत केले आहे. त्यामुळे आमचा व्यवसाय बुडाला आहे.

- कैलास शेंडे, मंगल कार्यालय चालक

.....

२) कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून लग्न समारंभात वऱ्हाड्यांची घालून दिलेली अट ही मंगल कार्यालयात लग्न करण्यासाठी कारणीभूत ठरली. कमी लोकांत लग्न करायचे असेल तर मंगल कार्यालयात का लग्न करावे असे लोकांना वाटले. मंगल कार्यालयात थाटामाटाने लग्न न करता घरीच लग्न करण्यात आले, त्यामुळे लागत लावलेली रक्कम निघाली नाही.

- पुष्पकांत बहेकार, मंगल कार्यालय चालक, आमगाव