शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला २७०० हजार लग्नाचा बार (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:26 IST

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग सन २०२० मध्ये सुरू झाल्याने तीन महिने सतत लॉकडाऊन करण्यात आले होते. परंतु कोरोना ...

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग सन २०२० मध्ये सुरू झाल्याने तीन महिने सतत लॉकडाऊन करण्यात आले होते. परंतु कोरोना जसाजसा कमी होऊ लागला तसातसा लॉकडाऊन शिथिल करण्यात आला. लग्नसमारंभाला मंजुरी देण्यात आली. ५० लोकांच्या आतच लग्न समारंभ करा असे आदेश शासन, प्रशासनाने दिले. परंतु या आदेशाचा गैरफायदा घेत लग्नाचा बारच फुटला. सुरुवातीला काहींनी परवानगी घेतली. परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने लोकांनी परवानगी न घेताच ५०० ते १००० लोकांच्या गर्दीत लग्न समारंभ केले.

दररोज लग्न समारंभ उरकण्यात आले. ना तिथी, ना कोरोनाची भीती यात लग्न समारंभ झाल्याने यातूनच कोरोनाचा उद्रेक झाला. गोंदिया जिल्ह्यातील ९३६ गावांपैकी असा एकही गाव शिल्लक नाही त्या गावात या वर्षभरात लग्न झाले नसेल. जोमाने लग्न समारंभ पार पाडण्यात आले. डिजे, ढोल यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत लग्न करण्यात आले. गोंदिया जिल्ह्याच्या आठही तालुक्यांतील प्रत्येक तालुक्यात शेकडोच्या वर लग्न झालीत. या लग्न समारंभातून कोरोनाचा उद्रेक होऊ लागला. परिणामी आज कोरोनाने उग्र रूप धारण केले आहे.

.....

बॉक्स

रजिस्टर्ड लग्नाकडे कुणी भटकलेच नाहीत

कोरोनाच्या काळात कमी पैशात लग्न करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. परंतु रजिस्टर्ड लग्न करणाऱ्यांची संख्या गोंदिया जिल्ह्यात नाही. सर्वसामान्यांसाठी न्यायालय बंद असल्याने कुणीही रजिस्टर्ड विवाह करण्यासाठी कुणीच पुढे आला नाही. सर्वांनी कमी खर्चात कमी लोकांत लग्न करणे पसंत केले.

.........

बॉक्स

एप्रिल कठीणच

मागील वर्षापासून यंदाच्या मार्च महिन्यापर्यंत झालेल्या लग्न समारंभामुळे कोरोनाचा उद्रेक झाला. ही परिस्थती सावरणे आता एप्रिल महिन्यात कठीण झाले आहे. एप्रिल महिन्यात ४ एप्रिलपासूनच सरकारने कडक निर्बंध लावले. त्यानंतर १५ एप्रिलपासून संचारबंदी लावली तरीही लोक लग्न समारंभ करीतच आहेत.

......

मंगल कार्यालय चालकांच्या प्रतिक्रिया

१) कोरोनाच्या संसर्गामुळे दरवर्षीच्या तुलनेत अर्धेही लग्न समारंभ आमच्याकडे झाले नाहीत. ५० लोकांच्या आतच लग्न आटोपण्याचा सरकारचा आदेश असल्याने लोकांनी मंगल कार्यालय करण्यापेक्षा घरीच लग्न करणे पसंत केले आहे. त्यामुळे आमचा व्यवसाय बुडाला आहे.

- कैलास शेंडे, मंगल कार्यालय चालक

.....

२) कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून लग्न समारंभात वऱ्हाड्यांची घालून दिलेली अट ही मंगल कार्यालयात लग्न करण्यासाठी कारणीभूत ठरली. कमी लोकांत लग्न करायचे असेल तर मंगल कार्यालयात का लग्न करावे असे लोकांना वाटले. मंगल कार्यालयात थाटामाटाने लग्न न करता घरीच लग्न करण्यात आले, त्यामुळे लागत लावलेली रक्कम निघाली नाही.

- पुष्पकांत बहेकार, मंगल कार्यालय चालक, आमगाव