शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात जाणाऱ्या २५ फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:27 IST

गोंदिया : महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव बघता मध्य प्रदेश सरकारने येथील बस फेऱ्या बंद केल्या आहेत. त्यानुसार गोंदिया ...

गोंदिया : महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव बघता मध्य प्रदेश सरकारने येथील बस फेऱ्या बंद केल्या आहेत. त्यानुसार गोंदिया आगारातून मध्य प्रदेश येथे जाणाऱ्या २५ फेऱ्या शनिवारपासून (दि. २०) बंद रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या ३१ मार्चपर्यंत फेऱ्यांवर बंदी घालण्यात आली असून, याबाबत शुक्रवारी (दि. १९) गोंदिया आगाराला तसे आदेश मिळाले आहेत.

राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. दररोज हजारोंच्या संख्येत बाधितांची संख्या वाढत चालली असून, कित्येक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची पाळी आली आहे. अशा स्थितीत प्रवाशांची ये-जा सुरू राहिल्यास त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच बाब हेरून मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातून तेथे जात असलेल्या बस फेऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. २० मार्चपासून येत्या ३१ मार्चपर्यंत या फेऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच, मध्य प्रदेशात जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच बसेस आता मध्य प्रदेशात जाणार नाहीत व अशात महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांचा बसेसद्वारे असलेला संपर्क तुटणार आहे.

या आदेशानुसार, गोंदिया आगारालाही शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी बसफेऱ्या बंद करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे, मध्य प्रदेश राज्याची सीमा जेमतेम २० किलोमीटर असून तेथील नागरिक मोठ्या प्रमाणात दररोज गोंदियात येतात. यात बसने त्यांचा प्रवास जास्तीतजास्त प्रमाणात होतो. मात्र, आता बसफेऱ्या बंद पडल्याने त्यांची गैरसोय होणार आहे. शिवाय, गोंदिया आगाराच्या उत्पन्नावरही याचा परिणाम होणार यात शंका नाही. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही राज्यांच्या सरकारने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे. गोंदिया आगारातून मध्य प्रदेश राज्यात एकूण २५ फेऱ्या जात होत्या. यामध्ये १ लांजी, १९ बालाघाट तर ५ रजेगावच्या फेऱ्या आहेत. मात्र, आता या आदेशानंतर या २५ फेऱ्या पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.

----------------------------

डोंगरगड फेरीही बंद

मध्य प्रदेश राज्याला बस फेऱ्या जोडत असतानाच छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथेही गोंदिया आगाराची १ फेरी होती. मात्र, सध्या ती फेरीही बंद करण्यात आली आहे. याशिवाय मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडासाठीही गोंदिया आगारातून बस जात होती. ती फेरीही २१ फेब्रुवारीपासून बंद असून, सध्या ती फेरी सावनेरपर्यंतच जात आहे.

-----------------------

तिरोडा आगाराच्या ४ फेऱ्या बंद

मध्य प्रदेश राज्यात गोंदिया आगाराच्या फेऱ्या जात असतानाच जिल्ह्यातीलच तिरोडा आगारातून ४ फेऱ्या बालाघाटला जात होत्या. मात्र, आता त्यांच्या या ४ फेऱ्याही बंद करण्यात आल्या आहेत. एकंदर दोन्ही आगारांकडून दोन्ही राज्यांतील प्रवाशांसाठी असलेली ही सुविधा आता खंडित झाली आहे.