शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

२५ ई-रिक्षा धावतात रस्त्यावर

By admin | Updated: August 28, 2016 01:00 IST

महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, अकोला, लातूर व अमरावती हे ठिकाण वगळता महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी बंदी असलेले ई-रिक्षा जिल्ह्यात सर्रास धावताहेत

नरेश रहिले  गोंदियामहाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, अकोला, लातूर व अमरावती हे ठिकाण वगळता महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी बंदी असलेले ई-रिक्षा जिल्ह्यात सर्रास धावताहेत. अशाच दोन रिक्षांना परिवहन विभागाने पकडले असून अन्य रिक्षांवरही कारवाई केली जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यात २५ ई-रिक्षा धावत असल्याची माहिती आहे.बॅटरीवर चालणारे ई-रिक्षा दिल्लीत प्रकरणाने गाजले. त्यानंतरही महाराष्ट्रात या ई-रिक्षाला बंदी होती. मात्र प्रायोगिक तत्त्वावर नागपूर, वर्धा, अकोला, लातूर व अमरावती या ठिकाणी ई-रिक्षा सुरू करण्यात आले. परंतु हे ठिकाण वगळले तर अख्या महाराष्ट्रात ई-रिक्षाला बंदी असताना गोंदिया व तिरोडा येथे ई-रिक्षा विक्रीची दुकाने थाटून हे वाहन विक्री केले जात आहे. गोंदिया जिल्ह्यात आजघडीला २५ ई-रिक्षा धावत असल्याची माहिती परिवहन विभागामार्फत मिळाली. राज्य शासनाची या ई-रिक्षांना मंजूरी नाही, त्यांची नोंदणी झाली नसून क्रमांक नसताना रस्त्यावर बिनधास्तपणे हे वाहन चालविले जात आहे. या वाहनचालकांनी अपघात करून वाहन पळवून नेले तर त्यांना शोधणे अत्यंत कठीण होणार आहे. अनाधिकृतपणे हे रिक्षा जिल्ह्यातील रस्त्यांवर बिनधास्तपणे धावत आहेत. यावर कारवाई होणार आहे. असेच रस्त्यावर विनाक्रमांक धावणाऱ्या दोन रिक्क्षांना गोंदिया व तिरोडात जप्त करण्यात आले आहे. परिवहन विभागाची पोलिसांत तक्रारबंदी असलेले ई-रिक्षा जिल्ह्यात धावत असल्याने दोन ईरिक्षावर कारवाई करून एक वाहन तिरोडा पोलीस ठाण्यात तर दुसरे वाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लावण्यात आले आहे. जप्त केलेल्या त्या वाहनांना सोडण्यासाठी नागपूर येथून परिवहन विभागाचे कर्मचारी मांडवेकर यांना मंगळवारी फोन आला होता. ते वाहन न सोडल्यास तुम्हाला व तुमच्या अधिकाऱ्यांना ठार करू अशी धमकी फोनवरून देण्यात आली. या प्रकरणाची तक्रार परिवहन विभागाने शहर पाोलिसांकडे केली आहे. ई-रिक्षावर गोंदियात बंदी असताना अनाधिकृतपणे कुणीही ई-रिक्षा खरेदी करू नये अन्यथा तुमचे नुकसान होईल. नोंदणी होत नसलेली वाहने रस्त्यावर चालविणे हा कायद्याने गुन्हा आहे. ई-रिक्षाला बंदी असल्यामुळे नागरिकांनी स्वत:चे आर्थिक नुकसान करू नये.-विजय चव्हाणउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया.