शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२५ ई-रिक्षा धावतात रस्त्यावर

By admin | Updated: August 28, 2016 01:00 IST

महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, अकोला, लातूर व अमरावती हे ठिकाण वगळता महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी बंदी असलेले ई-रिक्षा जिल्ह्यात सर्रास धावताहेत

नरेश रहिले  गोंदियामहाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, अकोला, लातूर व अमरावती हे ठिकाण वगळता महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी बंदी असलेले ई-रिक्षा जिल्ह्यात सर्रास धावताहेत. अशाच दोन रिक्षांना परिवहन विभागाने पकडले असून अन्य रिक्षांवरही कारवाई केली जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यात २५ ई-रिक्षा धावत असल्याची माहिती आहे.बॅटरीवर चालणारे ई-रिक्षा दिल्लीत प्रकरणाने गाजले. त्यानंतरही महाराष्ट्रात या ई-रिक्षाला बंदी होती. मात्र प्रायोगिक तत्त्वावर नागपूर, वर्धा, अकोला, लातूर व अमरावती या ठिकाणी ई-रिक्षा सुरू करण्यात आले. परंतु हे ठिकाण वगळले तर अख्या महाराष्ट्रात ई-रिक्षाला बंदी असताना गोंदिया व तिरोडा येथे ई-रिक्षा विक्रीची दुकाने थाटून हे वाहन विक्री केले जात आहे. गोंदिया जिल्ह्यात आजघडीला २५ ई-रिक्षा धावत असल्याची माहिती परिवहन विभागामार्फत मिळाली. राज्य शासनाची या ई-रिक्षांना मंजूरी नाही, त्यांची नोंदणी झाली नसून क्रमांक नसताना रस्त्यावर बिनधास्तपणे हे वाहन चालविले जात आहे. या वाहनचालकांनी अपघात करून वाहन पळवून नेले तर त्यांना शोधणे अत्यंत कठीण होणार आहे. अनाधिकृतपणे हे रिक्षा जिल्ह्यातील रस्त्यांवर बिनधास्तपणे धावत आहेत. यावर कारवाई होणार आहे. असेच रस्त्यावर विनाक्रमांक धावणाऱ्या दोन रिक्क्षांना गोंदिया व तिरोडात जप्त करण्यात आले आहे. परिवहन विभागाची पोलिसांत तक्रारबंदी असलेले ई-रिक्षा जिल्ह्यात धावत असल्याने दोन ईरिक्षावर कारवाई करून एक वाहन तिरोडा पोलीस ठाण्यात तर दुसरे वाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लावण्यात आले आहे. जप्त केलेल्या त्या वाहनांना सोडण्यासाठी नागपूर येथून परिवहन विभागाचे कर्मचारी मांडवेकर यांना मंगळवारी फोन आला होता. ते वाहन न सोडल्यास तुम्हाला व तुमच्या अधिकाऱ्यांना ठार करू अशी धमकी फोनवरून देण्यात आली. या प्रकरणाची तक्रार परिवहन विभागाने शहर पाोलिसांकडे केली आहे. ई-रिक्षावर गोंदियात बंदी असताना अनाधिकृतपणे कुणीही ई-रिक्षा खरेदी करू नये अन्यथा तुमचे नुकसान होईल. नोंदणी होत नसलेली वाहने रस्त्यावर चालविणे हा कायद्याने गुन्हा आहे. ई-रिक्षाला बंदी असल्यामुळे नागरिकांनी स्वत:चे आर्थिक नुकसान करू नये.-विजय चव्हाणउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया.