शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

२३८ ग्राम विद्युत व्यवस्थापक अडकले ‘मानधनात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 21:01 IST

ग्रामीण भागात महावितरण कंपनीमार्फत कार्यरत असलेला लाईमन अनेक गावांसाठी नियुक्त असतो.

ठळक मुद्देफक्त १८७ लोकांचे प्रस्ताव पाठविले: ५९ ग्रामपंचायतीत विद्युत व्यवस्थापकांचा अभाव

आॅनलाईन लोकमतगोंदिया : ग्रामीण भागात महावितरण कंपनीमार्फत कार्यरत असलेला लाईमन अनेक गावांसाठी नियुक्त असतो. त्या लाईनमनला त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या गावांमध्ये वीज वितरणाचे जाळे उपलब्ध आहेत. त्यात काही बिघाड झाला किंवा दुरूस्ती करायची असल्यास लाईनमन तातडीने सेवा देऊ शकत नाही. विद्युत विषयक अडचणी सोडविण्यासाठी शासनाने ३ हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत ग्राम विद्युत व्यवस्थापक नेमण्याची संकल्पना पुढे आणली. परंतु या संदर्भातील निर्णयाला दीडवर्ष लोटूनही जिल्ह्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापक संपूर्ण ग्रामपंचायतीत नियुक्त केले नाही.सद्यास्थितीत गोंदिया जिल्ह्यात ५४५ ग्रामपंचायती आहेत. परंतु यापैकी ४८४ ग्रामपंचायतींची लोकसंख्येच्या ३ हजार किंवा त्यापेक्षा अधिक आहे. ग्राम विद्युत व्यवस्थापक या सर्व ग्राम पंचायतीमध्ये नियुक्त करायचे होते. परंतु ग्रामसेवकांच्या उदासिनतेमुळे अजूनही ५९ ग्रामपंचायतीत ग्राम विद्युत व्यवस्थापकाची नियुक्ती केलेली आहे. ४८४ पैकी ४२५ ग्रामपंचायतमध्ये ग्राम विद्युत व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आली. परंतु नियुक्त केलेल्या २३८ ग्राम विद्युत व्यवस्थापकाचा ठराव ग्रामपंचायतींनी महावितरण कंपनीकडे न पाठविल्यामुळे त्यांच्या वेतनाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.गोंदिया तालुक्यात १०९ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ८४ ग्रामपंचायती ३ हजार लोकसंख्येच्या आहेत. ८१ ग्रामपंचायतीत ग्रामविद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती झाली. ३ ग्रामपंचायतीत ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती झाली नाही. महावितरणकडे ८१ प्रस्ताव पाठविण्यात आले. तिरोडा तालुक्यात ९५ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ९० ग्रामपंचायती ३ हजार लोकसंख्येच्या आहेत. ८३ ग्रामपंचायतीत ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती झाली. ७ ग्रामपंचायतीत ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती झाली नाही. महावितरणकडे एकही प्रस्ताव पाठविले नाही. आमगाव तालुक्यात ५६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ५३ ग्रामपंचायती ३ हजार लोकसंख्येच्या आहेत. ३४ ग्रामपंचायतीत ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती झाली. १९ ग्रामपंचायतीत ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती झाली नाही. महावितरणकडे २६ प्रस्ताव पाठविण्यात आले. सालेकसा तालुक्यात ४२ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ३८ ग्रामपंचायती ३ हजार लोकसंख्येच्या आहेत. ३६ ग्रामपंचायतीत ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती झाली. २ ग्रामपंचायतीत ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती झाली नाही. महावितरणकडे ३७ प्रस्ताव पाठविण्यात आले. देवरी तालुक्यात ५५ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ५२ ग्रामपंचायती ३ हजार लोकसंख्येच्या आहेत.४५ ग्रामपंचायतीत ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती झाली. ७ ग्रामपंचायतीत ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती झाली नाही. महावितरणकडे एकही प्रस्ताव पाठविण्यात आले नाही. गोरेगाव तालुक्यात ५५ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ४६ ग्रामपंचायती ३ हजार लोकसंख्येच्या आहेत. ४२ ग्रामपंचायतीत ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती झाली. ४ ग्रामपंचायतीत ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती झाली नाही. महावितरणकडे एकही प्रस्ताव पाठविण्यात आले नाही. सडक-अर्जुनी तालुक्यात ६३ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ५८ ग्रामपंचायती ३ हजार लोकसंख्येच्या आहेत. ५१ ग्रामपंचायतीत ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती झाली. ७ ग्रामपंचायतीत ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती झाली नाही. महावितरणकडे ४३ प्रस्ताव पाठविण्यात आले.अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ७० ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ६३ ग्रामपंचायती ३ हजार लोकसंख्येच्या आहेत. ५३ ग्रामपंचायतीत ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती झाली. १० ग्रामपंचायतीत ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती झाली नाही. महावितरणकडे एकही प्रस्ताव पाठविण्यात आला नाही. जिल्ह्यात एकूण ५४५ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ४८४ ग्रामपंचायती ३ हजार लोकसंख्येच्या आहेत. ४२५ ग्रामपंचायतीत ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती झाली. ५९ ग्रामपंचायतीत ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती झाली नाही. महावितरणकडे १८७ प्रस्ताव पाठविण्यात आले. तर २३८ ग्राम विद्युत व्यवस्थापकांचे प्रस्ताव पाठविले नाही, त्यामुळे त्यांचे मानधन मिळाले नसल्याची माहिती आहे.चार तालुक्यांचे एकही प्रस्ताव पाठविले नाहीग्राम विद्युत व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असली तरी त्यांचे वेतन काढण्याची जबाबदारी विद्युत वितरण कंपनीची आहे. मागील दीड वर्षापासून ही प्रक्रिया होत असूनही गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी तिरोडा, देवरी, गोरेगाव व अर्जुनी-मोरगाव या चार तालुक्यातील एकही ग्राम विद्युत व्यवस्थापकाचा प्रस्ताव विद्युत वितरण कंपनीकडे पाठविण्यात आला नाही. त्यामुळे त्यांच्या वेतनाचा प्रश्न आहे.