शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

२३२ बालमजूरांसाठी ७ विशेष प्रशिक्षण केंद्र्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2017 01:22 IST

बालपण मनुष्याच्या जीवनात आनंदाचे क्षण देणार्े असते. कसलीही चिंता, कसलीही जबाबदारी राहत नाही.

शिष्यवृत्ती वाढवा : ११ वर्षात १६२१ बालमजूर मुख्य प्रवाहात नरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालपण मनुष्याच्या जीवनात आनंदाचे क्षण देणार्े असते. कसलीही चिंता, कसलीही जबाबदारी राहत नाही. आपल्याच धुंदीत राहणाऱ्या बालकांवर एकाएक पोटासाठी धोक्याच्या ठिकाणीही काम करून पोटाची खळगी भरण्याची पाळी येत असेल तर यापेक्षा दुर्देव नाही. गोंदिया जिल्ह्यात बालमजूरी करणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समितीने मागील ११ वर्ष केलेल्या प्रयत्नांमुळे १६२१ बालकांना मुख्या प्रवाहात आणण्यात आले. तर २३२ बाल मजूृरांसाठी ७ नविन विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहेत. जिल्ह्यात कचरा गोळा करणारे, लोखंड जमा करून विक्री करणारे, हॉटेल व इतर व्यवसायात काम करणारे, भीक मागणारे बालक आहेत. आई-वडीलांच्या दुर्लक्षामुळे मांग गारुडी, नाथजोगी, मुस्लीम फकीर यांची मुले बालमजूरीकडे वळतात. या बालमजूरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात १२ प्रशिक्षण केंद्र आहेत. यात ३८७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गोंदिया तालुक्याच्या गौतमनगर, संजय नगर, कुडवा, गोंडीटोला व अदासी, सालेकसा तालुक्यातील बाबाटोली, मुरकुडोहदंडारी व तिरोडा तालुक्याच्या काचेवानी, नवरगाव, मुंडीकोटा व घोघरा येथे प्रशिक्षण केंद्र सुरू आहेत.गोंदिया जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणात २३२ बालमजूर असल्याचे लक्षात आले. त्यांच्यासाठी ७ नविन विशेष प्रशिक्षण केंद्र उघडले जाणार आहे. सर्वेक्षणात आढळलेल्या १४ ते १८ वर्षातील बाल मजूरांना व्यावसायिक प्रशिक्षण, जिल्हा कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. उज्वल लोयासहायक कामगार आयुक्त गोंदिया२२०० बालकामगारांना पकडले बाल कामगार कार्यालयाद्वारे सन २००६ पासून आतापर्यंत २२०० बाल कामगारांना पकडण्यात आले. यात १६२१ बाल कामगार प्रकल्प समितीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यात आले. त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी नियमीत शाळेत पाठविले जात आहे. यातील बहुतांश बालके आपल्या पायावर उभे झाले आहेत. काही मुले उच्च शिक्षण घेत आहेत.फक्त १५० रूपये शिष्यवृत्तीबाल मजूर दररोज १५० ते २०० रूपये कमवितात. सरकारद्वारे त्यांना प्रत्येक महिन्याला १५० रूपये शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यांच्या शिष्यवृत्तीत शासनाने वाढ करण्याची मागणी होत आहे. बालमजूरीसाठी आईवडीलही तेवढेच जबाबदार आहेत. आई वडीलांच्या व्यसनामुळे बालमजूरी फोफावत आहे.