शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

सहा जिल्ह्यातील १३ हजार सिंचन विहिरींचे २३० कोटी अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:21 IST

नरेश रहिले गोंदिया : नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये १३ हजार सिंचन विहिरी देण्याचा कार्यक्रम भाजप सरकारने सुरू केला, परंतु ...

नरेश रहिले

गोंदिया : नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये १३ हजार सिंचन विहिरी देण्याचा कार्यक्रम भाजप सरकारने सुरू केला, परंतु या सिंचन विहिरींसाठी लागणारी २३० कोटी रुपये सहा जिल्ह्यांना दिलीच नसल्याने शेतकऱ्याचे सिंचन रखडले आहे. या योजनेत सहा जिल्ह्यातील २ हजार ३७३ विहिरींचे काम सुरू करण्यात आले होते. यापैकी ५३२ विहिरींचे काम पूर्ण करण्यात आले, तर १ हजार ८४१ विहिरींचे काम निधीअभावी रखडलेच आहेत.

गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या सहा जिल्ह्यांत १३ हजार सिंचन विहिरी बांधायच्या होत्या. पहिल्या टप्प्यात १० हजार सिंचन विहिरी बांधायच्या होत्या. त्यासाठी २,३७३ विहिरींच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती, परंतु या विहिरींच्या बांधकामासाठी लागणारा २२९ कोटी ६४ लाख ५ हजार रुपयांचा निधी शासनाने न दिल्यामुळे मागील दोन वर्षांपासून सिंचन विहिरी रखडल्या आहेत. सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी ५३२ विहिरींचे काम पूर्ण केले आहेत. आतापर्यंत या योजनेसाठी शक्त २३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, तो खर्चही झाला आहे. या योजनेत लाभार्थ्यांनी स्वखर्चाने अगोदर विहिरींचे काम केले. त्या कामाच्या मूल्यांकनानुसार गटविकास अधिकाऱ्यांमार्फत त्यांच्या देयके दिली जातात. सद्यस्थितीत १,९०१ लाभार्थ्यांचे २० कोटी ७७ लाख रुपये शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी विहिरीच्या कामाकरिता उसनवारीने पैसे घेऊन विहिरींचे बांधकाम केले, परंतु त्यांना विहिरींच्या लाभाचे पैसे न मिळाल्याने त्यांची चिंता वाढली आहे.

................................

बॉक्स

१,४५४ विहिरी पूर्ण करणे अत्यावश्यक

ज्या विहिरीची कामे सुरू झाली, त्या विहिरी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. अपूर्ण असलेल्या कामावर झालेला खर्च वाया जाऊ नये, अशा १,४५४ विहिरींसाठी १८ कोटी १९ लाख रुपयांची गरज आहे. पुढील हंगामात सुरू करायच्या नवीन विहिरींची संख्या ७,६२७ आहे. त्या विहिरींसाठी १९० कोटी ६८ लाख रुपयांची गरज आहे. नवीन विहिरीकरिता निधी उपलब्ध झाल्याशिवाय कामे सुरू करू नये, असे सर्व जिल्ह्यांना निर्देश देण्यात आले आहेत.