शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

२३ मालगुजारी तलावांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:17 IST

जिल्ह्यातील पाण्याची टंचाई अधिकच गंभीर होत चालली असून रखरखत्या उन्हामुळे त्यात अधिकच भर पडत आहे. सध्या स्थिती जिल्ह्यातील ३८ पैकी २३ जुने मालगुजारी तलावांनी पूर्णपणे तळ गाठला आहे. तर उर्वरित तलावातही अत्यल्प पाणीसाठा आहे. परिणामी पाणी टंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ३८ मालगुजारी तलाव : अन्य तलावात अत्यल्प पाणीसाठा, पाणी टंचाईत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : जिल्ह्यातील पाण्याची टंचाई अधिकच गंभीर होत चालली असून रखरखत्या उन्हामुळे त्यात अधिकच भर पडत आहे. सध्या स्थिती जिल्ह्यातील ३८ पैकी २३ जुने मालगुजारी तलावांनी पूर्णपणे तळ गाठला आहे. तर उर्वरित तलावातही अत्यल्प पाणीसाठा आहे. परिणामी पाणी टंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.जिल्ह्याला बारामाही पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून जुने मालगुजारी तलाव तयार करण्यात आले होते. एकेकाळी जुन्या मालगुजारी तलावांच्या भरवशावर शेती, मनुष्य व पशुंची तहान भागविली जात होती. त्यानंतरही तलाव पाण्याने लबालब राहत होते. त्यावेळचे पाण्याचे व्यवस्थापन आजच्या पिढीलाही पाणी पाजत आहे. मात्र आजची पिढी पुढच्या पिढीसाठी काहीच करू शकली नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात असलेल्या ३८ मालगुजारी तलावांची स्थिती गंभीर आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे आजघडीला जिल्ह्यातील ३८ पैकी २३ तलाव आटले आहेत. विशेष म्हणजे, उर्वरीत तलावांची स्थिती फारशी चांगली नाही. कारण उरलेल्या तलावांतही नाममात्र पाणीसाठा आहे. त्यामुळे दमदार पाऊस पडत नाही तोवर या तलावांचाही जीव जाणार यात शंका नाही. मालगुजारी तलावांमुळे संबंधीत गावातील मनुष्य व पशुंची पाण्याची समस्या सुटते. शिवाय कित्येक गावांतील शेतीही या तलावांच्या भरोश्यावर फुलते. आता या तलावांनी तळ गाठला असल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या किती बिकट असेल याची कल्पना येते.तलावांना जीवदान देण्याची गरजमालगुजारी तलावांची हीच स्थिती राहिल्यास आजचे चित्र बघता येणारा काळ जिल्ह्यावासीयांना किती कठीण जाणार याची कल्पना करता येते. अशात य मालगुजारी तलावांची सफाई तसेच गाळ काढून त्यांची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. पाणी टंचाईवर बऱ्याच प्रमाणात मात करणे शक्य होईल.हे तलाव झाले कोरडेपाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सध्यास्थितीत ३८ जुने मालगुजारी तलाव आहेत. भानपूर, बोपाबोडी, भिवखिडकी, चान्ना-बाक्टी, चिरचाळबांध, चिरचाडी, फुलचूर, गोठणगाव, गिरोला, गंगेझरी, कोहलगाव, कोसबीबकी, ककोडी, खमारी, कोसमतोंडी, कोकणा, खोडशिवनी, खाडीपार, मालीजुंगा, नांदलपार, पळसगाव-डव्वा, तेढा व ताडगाव या मालगुजारी तलावांत पाण्याचा ठणठणाट आहे. शिवाय येणाºया काही दिवसांत यात आणखी काही तलावांचा भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.फक्त तीनच तलावांत २० टक्के पाणीसाठाजिल्ह्यातील धाबेटेकडी, माहुरकुडा व सौंदड या तीन तलावांत आज २० टक्केच्यावर पाणीसाठा आहे. तर कवठा व माहुली या दोन तलावांत १५ टक्केच्यावर पाणीसाठा आहे. त्यानंतर मुंडीपार (१४.६८ टक्के) तलाव सोडून उर्वरीत तलावांत मात्र १० टक्केच्या आतच पाणीसाठा आहे.