शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

२३ मालगुजारी तलावांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:17 IST

जिल्ह्यातील पाण्याची टंचाई अधिकच गंभीर होत चालली असून रखरखत्या उन्हामुळे त्यात अधिकच भर पडत आहे. सध्या स्थिती जिल्ह्यातील ३८ पैकी २३ जुने मालगुजारी तलावांनी पूर्णपणे तळ गाठला आहे. तर उर्वरित तलावातही अत्यल्प पाणीसाठा आहे. परिणामी पाणी टंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ३८ मालगुजारी तलाव : अन्य तलावात अत्यल्प पाणीसाठा, पाणी टंचाईत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : जिल्ह्यातील पाण्याची टंचाई अधिकच गंभीर होत चालली असून रखरखत्या उन्हामुळे त्यात अधिकच भर पडत आहे. सध्या स्थिती जिल्ह्यातील ३८ पैकी २३ जुने मालगुजारी तलावांनी पूर्णपणे तळ गाठला आहे. तर उर्वरित तलावातही अत्यल्प पाणीसाठा आहे. परिणामी पाणी टंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.जिल्ह्याला बारामाही पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून जुने मालगुजारी तलाव तयार करण्यात आले होते. एकेकाळी जुन्या मालगुजारी तलावांच्या भरवशावर शेती, मनुष्य व पशुंची तहान भागविली जात होती. त्यानंतरही तलाव पाण्याने लबालब राहत होते. त्यावेळचे पाण्याचे व्यवस्थापन आजच्या पिढीलाही पाणी पाजत आहे. मात्र आजची पिढी पुढच्या पिढीसाठी काहीच करू शकली नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात असलेल्या ३८ मालगुजारी तलावांची स्थिती गंभीर आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे आजघडीला जिल्ह्यातील ३८ पैकी २३ तलाव आटले आहेत. विशेष म्हणजे, उर्वरीत तलावांची स्थिती फारशी चांगली नाही. कारण उरलेल्या तलावांतही नाममात्र पाणीसाठा आहे. त्यामुळे दमदार पाऊस पडत नाही तोवर या तलावांचाही जीव जाणार यात शंका नाही. मालगुजारी तलावांमुळे संबंधीत गावातील मनुष्य व पशुंची पाण्याची समस्या सुटते. शिवाय कित्येक गावांतील शेतीही या तलावांच्या भरोश्यावर फुलते. आता या तलावांनी तळ गाठला असल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या किती बिकट असेल याची कल्पना येते.तलावांना जीवदान देण्याची गरजमालगुजारी तलावांची हीच स्थिती राहिल्यास आजचे चित्र बघता येणारा काळ जिल्ह्यावासीयांना किती कठीण जाणार याची कल्पना करता येते. अशात य मालगुजारी तलावांची सफाई तसेच गाळ काढून त्यांची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. पाणी टंचाईवर बऱ्याच प्रमाणात मात करणे शक्य होईल.हे तलाव झाले कोरडेपाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सध्यास्थितीत ३८ जुने मालगुजारी तलाव आहेत. भानपूर, बोपाबोडी, भिवखिडकी, चान्ना-बाक्टी, चिरचाळबांध, चिरचाडी, फुलचूर, गोठणगाव, गिरोला, गंगेझरी, कोहलगाव, कोसबीबकी, ककोडी, खमारी, कोसमतोंडी, कोकणा, खोडशिवनी, खाडीपार, मालीजुंगा, नांदलपार, पळसगाव-डव्वा, तेढा व ताडगाव या मालगुजारी तलावांत पाण्याचा ठणठणाट आहे. शिवाय येणाºया काही दिवसांत यात आणखी काही तलावांचा भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.फक्त तीनच तलावांत २० टक्के पाणीसाठाजिल्ह्यातील धाबेटेकडी, माहुरकुडा व सौंदड या तीन तलावांत आज २० टक्केच्यावर पाणीसाठा आहे. तर कवठा व माहुली या दोन तलावांत १५ टक्केच्यावर पाणीसाठा आहे. त्यानंतर मुंडीपार (१४.६८ टक्के) तलाव सोडून उर्वरीत तलावांत मात्र १० टक्केच्या आतच पाणीसाठा आहे.