शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
2
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
3
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
4
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
5
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
6
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
7
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
8
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
9
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
10
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
11
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
12
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
13
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
14
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
15
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
16
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
17
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
19
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
20
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?

तीन वर्षात जिल्ह्यात २२५ आंतरजातीय विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 21:15 IST

समाजातील सामाजिक विषमता नष्ट व्हावी, जातीभेदाचे उच्चाटन व्हावे, यासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याचे काम सामाजिक न्याय विभागाकडून केले जात आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाने ५० हजार रूपयांचे अनुदान देण्याचे ठरविले आहे.

ठळक मुद्दे१ कोटी २५ लाख रुपयांचे वाटप : तंटामुक्तीने लावलेल्या विवाहांची नोंद नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : समाजातील सामाजिक विषमता नष्ट व्हावी, जातीभेदाचे उच्चाटन व्हावे, यासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याचे काम सामाजिक न्याय विभागाकडून केले जात आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाने ५० हजार रूपयांचे अनुदान देण्याचे ठरविले आहे. सन २०१४-१५ ते २०१६-१७ या तीन वर्षात जिल्ह्यात २२५ आंतरजातीय विवाह झाले आहेत.आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देण्यासाठी शासनाने ५० हजार रूपये आर्थिक मदत देण्याची योजना सुरू केली आहे. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहान दिले जात नव्हते. मात्र महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अमंलात आणली तेव्हापासून या आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र आहे. गावा-गावातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी आपापल्या गावातील प्रेमीयुगुलांचे शुभमंगल लावून दिले. यात आंतरजातीय विवाह करणारे जोडपी अनेक आहेत. परंतु सामाजिक न्याय विभागातर्फे दिल्या जाणाºया योजनेच्या लाभासंदर्भात त्यांना माहीती नसल्यामुळे ते यापासून वंचित राहत आहेत.आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या पैकी असावा तर दुसरा स्वर्ण हिंदू, जैन, लिंगायत किंवा शिख धर्मीय असवा. मागासवर्गीयांमध्ये आंतरप्रवर्गात विवाह झाला असेल तर या विवाहातील जोडप्यांना संयुक्त नावाने ५० हजार रूपयाचा धनादेश देण्यात येतो.सन २०१४-१५ ते २०१६-१७ या तीन वर्षात आंतरजातिय विवाह करणाऱ्या २२५ जोडप्यांना लाभ देण्यात आला. १ कोटी २५ लाख ३५ हजार रूपयांचा लाभ देऊन समाजात सामाजिक समता नांदण्यास मदत करण्यात आली.गावात जातीय सलोखा यशस्वीमहाराष्टÑ शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेमुळे ग्रामीण विकासाला चालना मिळाली. तंटामुक्त चळवळीने ग्रामीण भागात अनेक समाजोपयोगी कामे केली. इतकेच नव्हे तर गावातील भांडण तंटे मिटवून गावात जातीय सलोखा कायम राखण्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांना यश आले. आंतरजातीय विवाह होणे गावात अवघड असते. यातच आंतरजातीय विवाह झाले तर वर किंवा वधूच्या जीवाला कुटुंबियांकडून धोका असतो. परंतु महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देऊन जातीय सलोखा कायम राखला.त्या जोडप्यांना लाभ द्यामहात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अमंलात आली. तेव्हापासून प्रेमीयुगुलांना साथ मिळाली. आंतरजातीय विवाहाला मुला-मुलीकडील कुटुंबियांचा विरोध असला तरी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या मदतीने त्या जोडप्यांचे शुभमंगल लावून दिले जाते. परंतु त्या लग्नातील जोडप्यांना लाभ मिळावा यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या पुढाकार घेत नाही. किंवा लग्न करणाºया जोडप्यांना यासंदर्भात पुरेशी माहिती नसल्यामुळे ते अर्जच करू शकत नाही. परिणामी ते या लाभापासून वंचीत राहतात.