शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

तीन वर्षात जिल्ह्यात २२५ आंतरजातीय विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 21:15 IST

समाजातील सामाजिक विषमता नष्ट व्हावी, जातीभेदाचे उच्चाटन व्हावे, यासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याचे काम सामाजिक न्याय विभागाकडून केले जात आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाने ५० हजार रूपयांचे अनुदान देण्याचे ठरविले आहे.

ठळक मुद्दे१ कोटी २५ लाख रुपयांचे वाटप : तंटामुक्तीने लावलेल्या विवाहांची नोंद नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : समाजातील सामाजिक विषमता नष्ट व्हावी, जातीभेदाचे उच्चाटन व्हावे, यासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याचे काम सामाजिक न्याय विभागाकडून केले जात आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाने ५० हजार रूपयांचे अनुदान देण्याचे ठरविले आहे. सन २०१४-१५ ते २०१६-१७ या तीन वर्षात जिल्ह्यात २२५ आंतरजातीय विवाह झाले आहेत.आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देण्यासाठी शासनाने ५० हजार रूपये आर्थिक मदत देण्याची योजना सुरू केली आहे. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहान दिले जात नव्हते. मात्र महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अमंलात आणली तेव्हापासून या आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र आहे. गावा-गावातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी आपापल्या गावातील प्रेमीयुगुलांचे शुभमंगल लावून दिले. यात आंतरजातीय विवाह करणारे जोडपी अनेक आहेत. परंतु सामाजिक न्याय विभागातर्फे दिल्या जाणाºया योजनेच्या लाभासंदर्भात त्यांना माहीती नसल्यामुळे ते यापासून वंचित राहत आहेत.आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या पैकी असावा तर दुसरा स्वर्ण हिंदू, जैन, लिंगायत किंवा शिख धर्मीय असवा. मागासवर्गीयांमध्ये आंतरप्रवर्गात विवाह झाला असेल तर या विवाहातील जोडप्यांना संयुक्त नावाने ५० हजार रूपयाचा धनादेश देण्यात येतो.सन २०१४-१५ ते २०१६-१७ या तीन वर्षात आंतरजातिय विवाह करणाऱ्या २२५ जोडप्यांना लाभ देण्यात आला. १ कोटी २५ लाख ३५ हजार रूपयांचा लाभ देऊन समाजात सामाजिक समता नांदण्यास मदत करण्यात आली.गावात जातीय सलोखा यशस्वीमहाराष्टÑ शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेमुळे ग्रामीण विकासाला चालना मिळाली. तंटामुक्त चळवळीने ग्रामीण भागात अनेक समाजोपयोगी कामे केली. इतकेच नव्हे तर गावातील भांडण तंटे मिटवून गावात जातीय सलोखा कायम राखण्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांना यश आले. आंतरजातीय विवाह होणे गावात अवघड असते. यातच आंतरजातीय विवाह झाले तर वर किंवा वधूच्या जीवाला कुटुंबियांकडून धोका असतो. परंतु महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देऊन जातीय सलोखा कायम राखला.त्या जोडप्यांना लाभ द्यामहात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अमंलात आली. तेव्हापासून प्रेमीयुगुलांना साथ मिळाली. आंतरजातीय विवाहाला मुला-मुलीकडील कुटुंबियांचा विरोध असला तरी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या मदतीने त्या जोडप्यांचे शुभमंगल लावून दिले जाते. परंतु त्या लग्नातील जोडप्यांना लाभ मिळावा यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या पुढाकार घेत नाही. किंवा लग्न करणाºया जोडप्यांना यासंदर्भात पुरेशी माहिती नसल्यामुळे ते अर्जच करू शकत नाही. परिणामी ते या लाभापासून वंचीत राहतात.