शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

२२९ गावे ‘निर्मल गाव’ योजनेपासून दूर

By admin | Updated: October 18, 2014 01:38 IST

गावातीलच नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी गावातील घाण, केरकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंमलात आणले.

नरेश रहिले गोंदियागावातीलच नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी गावातील घाण, केरकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंमलात आणले. गावखेड्यात गावातील रस्त्यावर मानवी विष्ठेची दुर्गंधी नेहमीच पहायला दिसत असल्यामुळे शासनाने निर्मल ग्रामची संकल्पना अंमलात आणली. या निर्मल ग्राम मोहीमेत सहा वर्षात जिल्ह्यातील ३३७ गावे निर्मल ग्राम झाली आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेत अवघ्या चार वर्षात जिल्हा तंटामुक्त झाला. मात्र निर्मल ग्राम योजनेला आठ वर्षाचा काळ झाला असताना अद्याप २२९ गावे अजूनही निर्मल ग्राम योजनेपासून अलिप्त आहेत. गोंदिया तालुक्यात एकूण १०८ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ३ गावे, सन २००६-०७ या वर्षात २४ गावे, सन २००७-०८ या वर्षात ५ गावे, सन २००८-०९ या वर्षात ४ गावे, सन २००९-१० या वर्षात ५ गावे, सन २०१०-११ या वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही. आमगाव तालुक्यात एकूण ६४ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ६ गावे, सन २००६-०७ या वर्षात २२ गावे, सन २००७-०८ या वर्षात १० गावे, सन २००८-०९ या वर्षात ४ गावे, सन २००९-१० या वर्षात ८ गावे, सन २०१०-११ या वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही. तिरोडा तालुक्यात एकूण ९५ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ६ गावे, सन २००६-०७ या वर्षात २६ गावे, सन २००७-०८ या वर्षात १५ गावे, सन २००८-०९ या वर्षात ४ गावे, सन २००९-१० या वर्षात ४ गावे, सन २०१०-११ या वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही. सालेकसा तालुक्यात एकूण ४३ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात एकही गाव नाही, सन २००६-०७ या वर्षात १३ गावे, सन २००७-०८ या वर्षात ९ गावे, सन २००८-०९ या वर्षात निरंक, सन २००९-१० या वर्षात १ गावे, सन २०१०-११ या वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही. देवरी तालुक्यात एकूण ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ६ गावे, सन २००६-०७ या वर्षात १७ गावे, सन २००७-०८ या वर्षात १२ गावे, सन २००८-०९ या वर्षात ३ गावे, सन २००९-१० या वर्षात ३ गावे, सन २०१०-११ या वर्षात २ गाव निर्मल झाली. सडक/अर्जुनी तालुक्यात एकूण ६३ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ३ गावे, सन २००६-०७ या वर्षात २६ गावे, सन २००७-०८ या वर्षात १२ गावे, सन २००८-०९ , सन २००९-१०, सन २०१०-११ या तीन वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही.अर्जुनी/मोरगाव तालुक्यात एकूण ७१ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ३ गावे, सन २००६-०७ या वर्षात २१ गावे, सन २००७-०८ या वर्षात ९ गावे, सन २००८-०९ या वर्षात २ गावे, सन २००९-१० या वर्षात ५ गावे, सन २०१०-११ या वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही. गोरेगाव तालुक्यात एकूण ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ४ गावे, सन २००६-०७ या वर्षात २२ गावे, सन २००७-०८ या वर्षात ८ गावे, सन २००८-०९, सन २००९-१० व सन २०१०-११ या तीन्ही वर्षात एकही गाव निर्मल नाही. जिल्ह्यातील ५५६ पैकी पहिल्या वर्षी ३१ गावे, दुसऱ्या वर्षी १७१, गावे तिसऱ्या वर्षी ८० गावे, चौथ्या वर्षी १७ गावे, पाचव्या वर्षी २६ गावे तर सहाव्या वर्षी २ गावे निर्मल ग्राम ठरली. जिल्ह्यातील २२९ गावे निर्मल ग्राम पुरस्कारापासून अलिप्त आहे. सन २०११-१२ या वर्षात निर्मल ग्राम स्पर्धेत असलेल्या गावांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने राज्य शासनाकडे पाठविला. राज्य शासनाने निरीक्षणही केले. मात्र केंद्र शासनाने या प्रस्तावावर विचारच केला नाही. त्यामुळे सन २०११-१२ या वर्षातील पुरस्कारच घोषित केलेले नाहीत.