शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

जिल्ह्यात २१.४२ टक्के वीज चोरी

By admin | Updated: November 13, 2014 23:04 IST

वीज चोरीची प्रकरणे जिल्ह्यात वाढत आहेत. यावर आळा घालण्यासाठी भरारी पथकाकडून वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणली जात आहेत. मात्र तरीही वीज चोरीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

देवानंद शहारे - गोंदियावीज चोरीची प्रकरणे जिल्ह्यात वाढत आहेत. यावर आळा घालण्यासाठी भरारी पथकाकडून वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणली जात आहेत. मात्र तरीही वीज चोरीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. सध्याच्या परिस्थितीत २१.४२ टक्के वीज गळती होत आहे.जिल्ह्यात ११ केव्हीच्या एकूण ८६ विद्युत वाहिन्या आहेत. यापैकी १९ वाहिन्यांवरून ४२ टक्क्यांपेक्षा अधिक वीज हानी होत असून सरासरी २१.४२ टक्के वार्षिक वीज चोरी होत आहे. त्यामुळे या वाहिन्यांवरील वीज ग्राहकांना भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे.जिल्ह्यात एकूण दोन लाख ३७ हजार वीज ग्राहक आहेत. यापैकी २० हजार ४८५ विद्युत कृषी पंपधारक आहेत. डीएससी गृप ए, बी, सी व डी मधील वीज हानी ४२ टक्क्यांपेक्षा खाली असल्याने त्या वाहिन्या लोडशेडींग फ्री आहेत. तर ई, एफ व जी मधील १९ वाहिन्यांवरून ५० ते ७० टक्क्यांपेक्षा अधिक वीज हानी होत असल्याने तुट भरून काढण्यासाठी त्या वाहिन्यांवरून सर्वाधिक भारनियमन केले जाते. विद्युत कृषी पंपधारकांना व घरगुती वीज मीटर धारकांना अनुदानाने विद्युत पुरवठा केला जातो. ग्राहकांना ५.३० रूपये प्रतियुनिट वीज पुरवठा केला जातो. परंतु वीज चोरीची सरासरी लक्षात घेतल्यास विद्युत विभागाला केवळ २.५० रूपये प्रतियुनिट मिळतात. वीज चोरीच्या प्रकारामुळे विद्युत वितरण विभागाला जवळपास अर्धेअधिक नुकसान होत आहे.