शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

दीड एकरमध्ये २१०० झाडे

By admin | Updated: October 13, 2016 01:54 IST

शेती हा पोटापाण्याचा धंदा नसून तो एक राष्ट्रीय व्यवसाय आहे. शेतीची उत्पादकता वाढली तर देशाचे आर्थिक सामर्थ्य वाढेल,

पाच लाखांचे उत्पादन : विहीरगावच्या शेतकऱ्याने फुलविली केळीची बागबोंडगावदेवी : शेती हा पोटापाण्याचा धंदा नसून तो एक राष्ट्रीय व्यवसाय आहे. शेतीची उत्पादकता वाढली तर देशाचे आर्थिक सामर्थ्य वाढेल, असा महत्वाचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कृषी धोरणाबाबत मांडले. शेती हा एक उद्योग आहे असे मनामध्ये बिंबवून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका छोट्याशा विहीरगाव या खेड्यातील विश्वनाथ वालदे या अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने आपल्या पत्नीच्या साथीने तंत्रशुद्ध पद्धतीचा वापर करून नगदी पिकांची लागवड करण्याचा नाविण्य उपक्रम राबवित आहे. दीड एकर शेतीमध्ये केळींची लागवड केली आहे. मनमोहक फुललेली केळीची बाग मोठ्या दिमाखाने उभी असल्याचे दिसून येत आहे. विहीरगाव (बर्ड्या) येथील विश्वनाथ वालदे यांच्याकडे सामूहिक जवळपास साडेचार एकर शेतजमीन आहे. दहावीपर्यंत शिक्षित असलेले विश्वनाथ वालदे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वेळोवेळी सानिध्यात राहून त्यांच्या मार्गदर्शनातूनच तंत्रशुद्ध पद्धतीने नवनवीन पिके घेण्याचा विक्रम करतात. एकूण जमिनीपैकी दीड एकरामध्ये केळीची लागवड १५ आॅक्टोबर २०१५ रोजी केली होती. जीनायन टीशू कल्चर जैन या जातीचे २०५० केळीच्या झाटांची लागवड केली होती. दोन सऱ्यातील अंतर साडे पाच फूट अंतराने रोपे लावण्यात आलेली आहेत. या झाडांपैकी २१०० झाडे आज घडीला केळांच्या घडांनी बहरलेली दिसून येत आहे. केळीच्या बागेची मशागत विश्वनाथ, त्यांची पत्नी कलीता, मुलगा दुष्यांत स्वत: वेळी-अवेळी करतात. तब्बल एक वर्षाने बागेतील केळींचे उत्पादन निघणे सुरू झाले. झाडाला लागलेला एक घड सरासरी २२ किलोचा असल्याचे विश्वनाथ वालदे यांनी सांगितले. लागलेल्या केळी विक्रीस योग्य असल्याने त्यांनी छत्तीसगडमधील भिलाई येथील एका व्यापाऱ्याशी सौदा पक्का झाल्याचे सांगितले. प्रतिकिलो १२ रुपयेप्रमाणे शेतामधून उचलण्याचा भाव ठरला. बागेतील २१०० झाडांवरील केळांच्या विक्रीमधून ५ लाख ५४ हजार ४०० रुपये अपेक्षित आहेत. केळींचे उत्पादन घेण्यासाठी वर्षभर १ लाख ३६ हजार ५०० रुपयाचा खर्च झाल्याचे त्या युवा शेतकऱ्याने सांगितले. केळीची बाग फुलविण्यासाठी एकूण खर्च वजा जाता शुद्ध नफा ४ लाखाच्यावर मिळेल, असा आशावाद त्यांनी लोकमतजवळ व्यक्त केला. तीन वर्ष केळीच्या बागेतून उत्पन्न मिळणार आहे. शेतीकडे व्यवसाय या दृष्टीकोणातून पाहिल्यास निश्चितपणे शेती फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)- ठिंबक सिंचनाचा उपयोगविश्वनाथ वालदे या युवा शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या यशस्वी मार्गदर्शनाने ठिंबक सिंचनाची सोय शेतीमध्ये केली आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिंबक सिंचनाच्या माध्यमातून शेतीमध्ये ओलीताची सोय केली जाते. अल्प प्रमाणात शेती असूनसुद्धा त्यांनी विविध पिके घेण्यासाठी त्यांची संघर्षमय तळमळ वाखाण्यासारखी आहे. दोघेही पती-पत्नी व साथीला मुलगा शेती हाच आपला व्यवसाय समजून घाम गाळतात. दिवस-रात्र मेहनत घेतात. शेतात डौलाने पीक उभे राहते. परंतु वन्यप्राण्यांचा होणारा उपद्रव हाच आर्थिक नुकसानीस कारणीभूत होत असल्याचे त्यांनी सांगितले.शेडनेटद्वारे पिकांचे उत्पादनगेल्या काही वर्षापूर्वी १० आर जागेत विश्वनाथ वालदे यांनी कृषी विभागाच्या सहाय्याने शेडनेट उभे केले. यातून कारले, शिमला मिरची, वांगे आदी विविध पिके घेणे सुरू आहे. शेडनेटच्या माध्यमातून पिकांची वाढ होवून भरघोष उत्पादन होत असल्याचे त्यांनी सांगितले. विविध उत्पादन घेण्याचा माणसविश्वनाथ वालदे यांच्याकडे असलेल्या साडेचार एकर शेतीमध्ये विविध पिके घेण्याचा त्यांचा माणस आहे. मागील वेळी त्यांनी टरबूजसुद्धा लावले होते. आजघडीला केळीच्या बागेसह, अर्धा एकरात टमाटर, भाताची लागवड केली आहे. चवळीच्या शेंगा, मेथी, पालक यासारखे पिकांचे उत्पादन घेतले. पॅक हाऊसची गरजकृषी विभागाच्या सल्ल्याने वेळोवेळी नवनवीन पिकांचे उत्पादन घेणारे विश्वनाथ वालदे यांनी पॅक हाऊस अति गरजेचे असल्याचे सांगितले. अनेकदा पिके तोडून ठेवल्यावर व्यापारी काही कारणास्तव मालाची उचल करीत नाही. अशावेळी तोडलेला माल ठेवण्यासाठी पॅक हाऊस आवश्यक असल्याने विश्वनाथ व पत्नी कलीता या युवा शेतकऱ्यांनी ते जोडण्याचे मत व्यक्त केले आहे.