शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २१ हजार कुटुंबे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 21:22 IST

एकीकडे शासन उज्वला योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबाना वीज जोडणी उपलब्ध करुन देण्याचा दावा करीत आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील २१ हजार कुटुंब अद्यापही विजेच्या प्रकाशापासून वंचित असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देउदासीन कोण जनता की शासन : त्यांच्या घरात प्रकाश पोहचला नाही

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एकीकडे शासन उज्वला योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबाना वीज जोडणी उपलब्ध करुन देण्याचा दावा करीत आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील २१ हजार कुटुंब अद्यापही विजेच्या प्रकाशापासून वंचित असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे हे २१ हजार कुटुंब अजूनही अंधारात उज्वला योजनेचा प्रकाश शोधत असल्याचे चित्र आहे.एकही गरीब कुटुंब वीज जोडणीपासून वंचित राहू नये, यासाठी मागील पाच सहा वर्षांपासून शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नरत आहे. यासाठी राजीव गांधी विद्युतीकरण योजना अमंलात आणून योजनेत काही निवडक जिल्ह्याची निवड केली होती. यामध्ये गोंदिया जिल्ह्याचा समावेश होता. जिल्ह्यातील दारिद्रय रेषेखालील यादीतील एक लाख कुटुंबाना नाममात्र १०० रूपयात वीज कनेक्शन देण्यात आले. या योजनेमुळे जिल्ह्यातील वीज चोरीच्या घटनांवर. परंतु अनेक ठिकाणी अद्यापही वीज चोरीला आळा बसला नसल्याची माहिती आहे. गोंदिया जिल्ह्यात सध्यास्थितीत २१ हजार ३०० कुटुंबाकडे वीज कनेक्शन नसून ते अद्यापही दिव्याच्या प्रकाशाखाली दिवस काढत आहे. यापैकी अनेकांनी वीज कनेक्शनची मागणी केली मात्र त्यांना अद्यापही वीज जोडणी देण्यात आली नाही. वीज कनेक्शन अभावी गोंदिया तालुक्यातील १५० गावातील ५ हजार १४२ कुटुंब, तिरोडा तालुक्यातील ११४ गावातील ३ हजार २४७ कुटुंब, आमगाव तालुक्यातील ५९ गावातील १ हजार ९८३ कुटुंब, सालेकसा तालुक्यातील ८५ गावातील ३ हजार २९३ कुटुंब अंधारात राहात आहेत. देवरी तालुक्यातील १३४ गावातील ९२९ कुटुंब, गोरेगाव तालुक्यातील ९३ गावातील ३ हजार २७० कुटुंब, सडक-अर्जुनी तालुक्यातील १०८ गावातील १ हजार ६५३ कुटुंब अंधारात वास्तव्य करित आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १३८ गावातील १ हजार ७८३ कुटुंब अंधारात राहात आहेत. जिल्ह्यातील ८८१ गावांतील २१ हजार ३०० कुटुंबाकडे वीज कनेक्शन नसल्याची माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे.ग्राम स्वराज आणणार प्रकाशजी कुटुंब अद्यापही वीज जोडणीपासून वंचित आहेत. त्यांना ग्राम स्वराज्य अभियानातंर्गत जोडणी उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती आहे. परंतु पहिल्या टप्यात ग्राम स्वराज अभियानात जिल्ह्यातील फक्त तीन गावांची निवड करण्यात आली आहे. त्यात आमगाव तालुक्यातील कुंभारटोली, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंडी व तिरोडा तालुक्यातील घोगरा यांचा समावेश आहे. या तीन गावांतील विद्युत कनेक्शनचा तिढा प्राधान्याने सोडविण्यात येणार आहे. मात्र इतर गावातील कुटुंबाना वीज जोडणीसाठी अजून काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.अनेक वस्त्यांमध्ये वीज चोरीशासनाकडून शंभर रूपयात वीज कनेक्शन देण्यात आले. जिल्ह्यातील एक लाख कुटुंबाना राजीव गांधी विद्युतीकरण योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र यानंतरही २१ हजारापेक्षा अधिक कुटुंब वीज जोडणीपासून वंचित आहेत. अनेक लोक विद्युत वाहिन्यांवर आकडे टाकून वीज चोरी करतात. जे कनेक्शन मागतात त्यांना कनेक्शन देण्यासाठी विद्युत वितरण कंपनी टाळटाळ करते.