शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

बारावीचे २१ हजार ३८१ विद्यार्थी सज्ज

By admin | Updated: February 17, 2016 01:28 IST

उच्च माध्यमिक शालांत (बारावी) परीक्षा १८ फेब्रुवारीपासून २८ मार्चपर्यंत घेण्यात येत आहे. यावर्षी जिल्ह्यातील २१ हजार

गोंदिया : उच्च माध्यमिक शालांत (बारावी) परीक्षा १८ फेब्रुवारीपासून २८ मार्चपर्यंत घेण्यात येत आहे. यावर्षी जिल्ह्यातील २१ हजार ३८१ विद्यार्थी ६९ केंद्रांवरुन बारावीची परीक्षा देणार आहेत. यासोबत इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्च ते २८ मार्चदरम्यान होणार असून २४ हजार ४९० विद्यार्थी ९७ केंद्रावरून परीक्षा देणार आहेत. विभागीय शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार, प्रत्येक केंद्रावर केंद्र संचालक, अतिरिक्त केंद्र संचालक तथा प्रत्येक तालुक्यातील एक परिरक्षक असे आठ परीरक्षक केंद्र नेमण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार थांबविण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे. परीक्षा केंद्रापासून १०० मीटरच्या आत प्रतिबंधीत क्षेत्र व या क्षेत्रातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी यांचे लक्ष राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी)सहा भरारी पथके४परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी सहा भरारी पथके व दक्षता समिती नेमलेली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे एक पथक, दुसरे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, तिसरे शिक्षणाधिकारी प्राथमिक, डायट प्राचार्य यांचे चौथे पथक, शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण यांचे पाचवा पथक तर सहावे पथक महिलांचे राहणार आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाचा हलगर्जीपणा४बारावीची परीक्षा दोन दिवसांवर ठेवून ठेपली तरी कोणत्या तालुक्यात किती विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी केंद्र किती आहेत. पुनर्परीक्षार्थी किती, याची माहिती अद्याप गोंदिया शिक्षण विभागाला शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आलेली नाही. जिल्ह्यात किती उपद्रवी केंद्र किती आहेत याचीही माहिती पाठविलेली नाही. त्यामुळे कशा पध्दतीने बंदोबस्त मागावा असाही प्रश्न गटशिक्षणाधिकाऱ्यांना पडला आहे. दोन दिवसांवर परीक्षा आली असताना तालुकानिहाय परीक्षार्र्थींची संख्या शिक्षण विभागाकडे अजूनपर्यंत नाही यावरून या विभागाचा कारभार लक्षात येतो.