शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

२१ कोटींचे पुनर्वसन पॅकेज मंजूर

By admin | Updated: June 23, 2017 01:17 IST

बिरसी विमानतळाच्या प्रकल्पग्रस्तांसाठी २१ कोटी रूपयांच्या पुनर्वसन पॅकेजला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे.

केंद्र शासनाची मंजुरी : बिरसी विमानतळाचे प्रकल्पग्रस्त होणार लाभान्वितलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बिरसी विमानतळाच्या प्रकल्पग्रस्तांसाठी २१ कोटी रूपयांच्या पुनर्वसन पॅकेजला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. आता लवकरच आठ-दहा दिवसांतच याबाबत अधिकृत आदेश जाहीर होणार असल्याचे आ. गोपालदास अग्रवाल यांच्याकडून कळविण्यात आले आहे.एप्रिल महिन्यामध्ये आ. गोपालदास अग्रवाल यांनी बिरसी विमानतळाच्या प्रकल्पग्रस्त नागरिकांची प्रलंबित नुकसानभरपाई व जवळपास २१ कोटी रूपये खर्चाच्या पुनर्वसन पॅकेजला लवकर मंजुरी मिळविण्यासाठी विधान भवनातील कार्यालय भारतीय विमन पत्तन प्राधिकरणाचे विभागीय कार्यकारी संचालक के.एल. शर्मा यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली होती. यात आ. अग्रवाल यांनी के.एल. शर्मा यांना बिरसी विमानतळाच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन पॅकेजला केंद्र सरकारने मंजुरीसाठी व्ययक्तिक स्वरूपात विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश दिले होते. त्यातच विमानतळामुळे बाधित कामठा-परसवाडा मार्ग अधिग्रहीत होण्याच्या स्थितीत पर्यायी मार्गाचे बांधकाम व पर्यायी मार्ग बांधकाम होईपर्यंत सध्याचा मार्ग खुला ठेवणे व दुरूस्ती करण्याचे निर्देश दिले होते.नुकतेच आ. अग्रवाल यांच्या निर्देशावर भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांद्वारे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन पॅकेजसाठी दिल्ली येथे प्रयत्न करण्यात आले. आ. अग्रवाल यांनीसुद्धा या संदर्भात केंद्रीय नागरी विमान मंत्री अशोक गजपती राजूकडून पुनर्वसन पॅकेजसाठी निर्देश देण्याची विनंती केली. त्यामुळे नागरी विमान मंत्रालय समितीने राज्य शासनाद्वारे प्रस्तावित २१ कोटी रूपयांच्या पुनर्वसन पॅकेजला मंजुरी दिली. आता लवकरच मंजुरीचे अधिकृत आदेश मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातच विमान पत्तन प्राधिकरणाचे विभागीय कार्यकारी संचालक के.एल. शर्मा यांच्या निर्देशावर कामठा-परसवाडा मार्गाच्या दुरूस्तीचे कार्यसुद्धा सुरू करण्यात आले आहे.काही दिवसांपूर्वी बिरसी विमानतळाच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन पॅकेजला मंजुरी मिळाल्याची अफवा प्रसारित झाली होती. परंतु तेव्हा पुनर्वसन पॅकेजला केंद्र शासनाची मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये निराशा पसरली होती. आता आ. अग्रवाल यांनी सर्व प्रकल्पग्रस्तांना धीर ठेवण्याची विनंती केली असून शासकीय स्तरावर शेवटपर्यंत लढून प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेज मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.