शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

२१ कोटींचे पुनर्वसन पॅकेज मंजूर

By admin | Updated: June 23, 2017 01:17 IST

बिरसी विमानतळाच्या प्रकल्पग्रस्तांसाठी २१ कोटी रूपयांच्या पुनर्वसन पॅकेजला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे.

केंद्र शासनाची मंजुरी : बिरसी विमानतळाचे प्रकल्पग्रस्त होणार लाभान्वितलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बिरसी विमानतळाच्या प्रकल्पग्रस्तांसाठी २१ कोटी रूपयांच्या पुनर्वसन पॅकेजला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. आता लवकरच आठ-दहा दिवसांतच याबाबत अधिकृत आदेश जाहीर होणार असल्याचे आ. गोपालदास अग्रवाल यांच्याकडून कळविण्यात आले आहे.एप्रिल महिन्यामध्ये आ. गोपालदास अग्रवाल यांनी बिरसी विमानतळाच्या प्रकल्पग्रस्त नागरिकांची प्रलंबित नुकसानभरपाई व जवळपास २१ कोटी रूपये खर्चाच्या पुनर्वसन पॅकेजला लवकर मंजुरी मिळविण्यासाठी विधान भवनातील कार्यालय भारतीय विमन पत्तन प्राधिकरणाचे विभागीय कार्यकारी संचालक के.एल. शर्मा यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली होती. यात आ. अग्रवाल यांनी के.एल. शर्मा यांना बिरसी विमानतळाच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन पॅकेजला केंद्र सरकारने मंजुरीसाठी व्ययक्तिक स्वरूपात विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश दिले होते. त्यातच विमानतळामुळे बाधित कामठा-परसवाडा मार्ग अधिग्रहीत होण्याच्या स्थितीत पर्यायी मार्गाचे बांधकाम व पर्यायी मार्ग बांधकाम होईपर्यंत सध्याचा मार्ग खुला ठेवणे व दुरूस्ती करण्याचे निर्देश दिले होते.नुकतेच आ. अग्रवाल यांच्या निर्देशावर भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांद्वारे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन पॅकेजसाठी दिल्ली येथे प्रयत्न करण्यात आले. आ. अग्रवाल यांनीसुद्धा या संदर्भात केंद्रीय नागरी विमान मंत्री अशोक गजपती राजूकडून पुनर्वसन पॅकेजसाठी निर्देश देण्याची विनंती केली. त्यामुळे नागरी विमान मंत्रालय समितीने राज्य शासनाद्वारे प्रस्तावित २१ कोटी रूपयांच्या पुनर्वसन पॅकेजला मंजुरी दिली. आता लवकरच मंजुरीचे अधिकृत आदेश मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातच विमान पत्तन प्राधिकरणाचे विभागीय कार्यकारी संचालक के.एल. शर्मा यांच्या निर्देशावर कामठा-परसवाडा मार्गाच्या दुरूस्तीचे कार्यसुद्धा सुरू करण्यात आले आहे.काही दिवसांपूर्वी बिरसी विमानतळाच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन पॅकेजला मंजुरी मिळाल्याची अफवा प्रसारित झाली होती. परंतु तेव्हा पुनर्वसन पॅकेजला केंद्र शासनाची मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये निराशा पसरली होती. आता आ. अग्रवाल यांनी सर्व प्रकल्पग्रस्तांना धीर ठेवण्याची विनंती केली असून शासकीय स्तरावर शेवटपर्यंत लढून प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेज मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.