शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

२१ लाईनमन सांभाळतात १५० गावांचा कारभार

By admin | Updated: June 19, 2014 00:08 IST

कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही कर्मचाऱ्यांची पदभरती केली जात नसल्याने विद्युत वितरण ्रकंपनी व शासनाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे नागरीक मात्र त्रास भोगत आहेत. येथे २१ लाईन नमन

विद्युत विभागाचे दुर्लक्ष : पदभरतीची नागरिकांची मागणी सालेकसा : कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही कर्मचाऱ्यांची पदभरती केली जात नसल्याने विद्युत वितरण ्रकंपनी व शासनाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे नागरीक मात्र त्रास भोगत आहेत. येथे २१ लाईन नमन १५० गावांचा कारभार सांभाळत असल्याचे चित्र असून यामुळे नागरिकांना मिळावी तशी सुविधा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत १५ लाईनमनची पदे रिक्त आहेत. कित्येक वर्षापासून ही पदभरतीच झाली नाही. सालेकसा तालुक्यात सर्वाधिक सिंचनाची सोय आहे. तसेच पुजारीटोला व मानागढ धरणाचे पाणि असल्याने कनेक्शन घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी एखादे प्रकरण मंजूर झाल्यानंतर सदर प्रकरण कार्यालयातच धुळखात असते. वेळोवेळी तक्रार व निराकरण करण्यातच वेळ निघून जातो. या कार्यालयात कामे अधिक आणि पदे कमी असा कारभार झाला आहे. सालेकसा तालुक्यात १० फिडर आहेत. त्यामध्ये तिरखेडी, दर्रेकसा, सालेकसा, साकरीटोला, नवेगाव, सोनपुरी, हेटीटोला, सोनेखारी, कावराबांध आणि एक एक्सप्रेस फिडर वाटर बॉक्स कोटरा यागावी असून कर्मचारी नसल्यामुळे खोळंबा होतो. २१ लाईनमनकडे काही गावे आमगाव तर देवरी तालुक्यातील गावे सालेकसा उपविभागीय जोडले असून आमगाव तालुक्यातील जोडलेली गावे कवडी, अंजोरा, बोरकन्हार, चिमनटोला, पानगाव, कन्हारटोला, हलबीटोला, रामाटोला तर देवरी तालुक्यातील जोडलेली गावे हरदोली सोनेखारी, सोनारटोला, डोंगरगाव, सावली यांचा समावेश आहे. तालुक्यात ३ महत्वपूर्ण फिडर आहेत. यामध्ये सालेकसा, दर्रेकसा, साकरीटोला हे महत्वपूर्ण फिडर आहेत. असे असतानाही सालेकसा येथेच भारनियमन आहे. दर्रेकसा नक्षलग्रस्त आदिवासी गावांमध्ये आजही काही गावे अंधारात तर काही जंगलव्याप्त गावात विद्युत पुरवठा नाही. तर काही गावात कित्येक वर्षापासून विद्युत चोरीचा तडाखा सुरू आहे. यावर अंकुश लावणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना व सामान्य माणसाला विजेची गरज आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्यावर कायमस्वरूपी उपाय योजना करून तातडीने या कार्यालयातील रिक्त पदे भरण्यात यावी व तालुक्यातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आहे. विद्युत विभागात लाईनमेनचे पद महत्वाचे असते. येथे मात्र २१ लाईनमेनवर १५० गावांचा कारभार देण्यात आल्याने त्यांचीही कोठे जाऊ कोठे नाही अशात त्यांची पंचाईत होते. याकडे विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)