शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

२१ लाईनमन सांभाळतात १५० गावांचा कारभार

By admin | Updated: June 19, 2014 00:08 IST

कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही कर्मचाऱ्यांची पदभरती केली जात नसल्याने विद्युत वितरण ्रकंपनी व शासनाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे नागरीक मात्र त्रास भोगत आहेत. येथे २१ लाईन नमन

विद्युत विभागाचे दुर्लक्ष : पदभरतीची नागरिकांची मागणी सालेकसा : कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही कर्मचाऱ्यांची पदभरती केली जात नसल्याने विद्युत वितरण ्रकंपनी व शासनाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे नागरीक मात्र त्रास भोगत आहेत. येथे २१ लाईन नमन १५० गावांचा कारभार सांभाळत असल्याचे चित्र असून यामुळे नागरिकांना मिळावी तशी सुविधा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत १५ लाईनमनची पदे रिक्त आहेत. कित्येक वर्षापासून ही पदभरतीच झाली नाही. सालेकसा तालुक्यात सर्वाधिक सिंचनाची सोय आहे. तसेच पुजारीटोला व मानागढ धरणाचे पाणि असल्याने कनेक्शन घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी एखादे प्रकरण मंजूर झाल्यानंतर सदर प्रकरण कार्यालयातच धुळखात असते. वेळोवेळी तक्रार व निराकरण करण्यातच वेळ निघून जातो. या कार्यालयात कामे अधिक आणि पदे कमी असा कारभार झाला आहे. सालेकसा तालुक्यात १० फिडर आहेत. त्यामध्ये तिरखेडी, दर्रेकसा, सालेकसा, साकरीटोला, नवेगाव, सोनपुरी, हेटीटोला, सोनेखारी, कावराबांध आणि एक एक्सप्रेस फिडर वाटर बॉक्स कोटरा यागावी असून कर्मचारी नसल्यामुळे खोळंबा होतो. २१ लाईनमनकडे काही गावे आमगाव तर देवरी तालुक्यातील गावे सालेकसा उपविभागीय जोडले असून आमगाव तालुक्यातील जोडलेली गावे कवडी, अंजोरा, बोरकन्हार, चिमनटोला, पानगाव, कन्हारटोला, हलबीटोला, रामाटोला तर देवरी तालुक्यातील जोडलेली गावे हरदोली सोनेखारी, सोनारटोला, डोंगरगाव, सावली यांचा समावेश आहे. तालुक्यात ३ महत्वपूर्ण फिडर आहेत. यामध्ये सालेकसा, दर्रेकसा, साकरीटोला हे महत्वपूर्ण फिडर आहेत. असे असतानाही सालेकसा येथेच भारनियमन आहे. दर्रेकसा नक्षलग्रस्त आदिवासी गावांमध्ये आजही काही गावे अंधारात तर काही जंगलव्याप्त गावात विद्युत पुरवठा नाही. तर काही गावात कित्येक वर्षापासून विद्युत चोरीचा तडाखा सुरू आहे. यावर अंकुश लावणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना व सामान्य माणसाला विजेची गरज आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्यावर कायमस्वरूपी उपाय योजना करून तातडीने या कार्यालयातील रिक्त पदे भरण्यात यावी व तालुक्यातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आहे. विद्युत विभागात लाईनमेनचे पद महत्वाचे असते. येथे मात्र २१ लाईनमेनवर १५० गावांचा कारभार देण्यात आल्याने त्यांचीही कोठे जाऊ कोठे नाही अशात त्यांची पंचाईत होते. याकडे विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)