शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

२१५ परीक्षा केंद्रावरुन २० हजार विद्यार्थी देणार परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 05:00 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा महाविद्यालये बंद होती. तर मागील वर्षी परीक्षा रद्द करीत विद्यार्थ्यांना सरासरी गुण देत उत्तीर्ण करण्यात आले होते. तर दोन वर्षांपासून ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरु असल्याने विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय सुटलेली आहे. त्यासाठी १०० गुणांच्या पेपरसाठी यंदा साडेतीन तासाचा वेळ विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा शुक्रवारपासून (दि.४) सुरू होत आहेत. यासाठी जिल्ह्यात २१५ केंद्र स्थापन करण्यात आले असून या केंद्रावरुन एकूण २० हजार २७३ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. परीक्षा केंद्रावर सुरळीत परीक्षा पार पडावी यासाठी शिक्षण विभागाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा महाविद्यालये बंद होती. तर मागील वर्षी परीक्षा रद्द करीत विद्यार्थ्यांना सरासरी गुण देत उत्तीर्ण करण्यात आले होते. तर दोन वर्षांपासून ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरु असल्याने विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय सुटलेली आहे. त्यासाठी १०० गुणांच्या पेपरसाठी यंदा साडेतीन तासाचा वेळ विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी सर्वच परीक्षा केंद्रावर थर्मल स्कॅनिग व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व परीक्षा केंद्राना देण्यात आल्या आहे. बारावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात होत असून यासाठी २१५ परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या परीक्षा केंद्रावरुन एकूण २० हजार २७३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभाग देखील सज्ज झाला आहे. 

विद्यालयातच परीक्षा केंद्र - कोरोनाचा प्रादुर्भाव आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप लक्षात घेता परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदा शिक्षण विभागाने ज्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र त्याच विद्यालयात दिले आहे. त्यामुळेच जिल्ह्यात यंदा जवळपास १५० परीक्षा केंद्र वाढविण्यात आले आहे. एसटीचा दिलासा नाहीच- शुक्रवारपासून सुरु होणारी बारावीची परीक्षा लक्षात घेऊन गोंदिया आगाराने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या सुरु करण्याची मागणी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून केली जात होती. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही मागे झाला नसल्याने परीक्षेच्या कालावधीतही विद्यार्थ्यांना एसटीचा दिलासा मिळाला नाही. विद्यार्थ्यांनो तणावमुक्त वातावरणात द्या परीक्षा - मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे ऑनलाईन वर्ग सुरू होते. तर मागील वर्षी परीक्षा सुध्दा रद्द झाल्या होत्या. तर यंदा ऑफलाईन परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर थोडे दडपण देखील आहे. मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान कुठालाही तणाव न बाळगता परीक्षा द्यावी.

 

टॅग्स :examपरीक्षा