शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

२१५ परीक्षा केंद्रावरुन २० हजार विद्यार्थी देणार परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 05:00 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा महाविद्यालये बंद होती. तर मागील वर्षी परीक्षा रद्द करीत विद्यार्थ्यांना सरासरी गुण देत उत्तीर्ण करण्यात आले होते. तर दोन वर्षांपासून ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरु असल्याने विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय सुटलेली आहे. त्यासाठी १०० गुणांच्या पेपरसाठी यंदा साडेतीन तासाचा वेळ विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा शुक्रवारपासून (दि.४) सुरू होत आहेत. यासाठी जिल्ह्यात २१५ केंद्र स्थापन करण्यात आले असून या केंद्रावरुन एकूण २० हजार २७३ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. परीक्षा केंद्रावर सुरळीत परीक्षा पार पडावी यासाठी शिक्षण विभागाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा महाविद्यालये बंद होती. तर मागील वर्षी परीक्षा रद्द करीत विद्यार्थ्यांना सरासरी गुण देत उत्तीर्ण करण्यात आले होते. तर दोन वर्षांपासून ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरु असल्याने विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय सुटलेली आहे. त्यासाठी १०० गुणांच्या पेपरसाठी यंदा साडेतीन तासाचा वेळ विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी सर्वच परीक्षा केंद्रावर थर्मल स्कॅनिग व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व परीक्षा केंद्राना देण्यात आल्या आहे. बारावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात होत असून यासाठी २१५ परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या परीक्षा केंद्रावरुन एकूण २० हजार २७३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभाग देखील सज्ज झाला आहे. 

विद्यालयातच परीक्षा केंद्र - कोरोनाचा प्रादुर्भाव आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप लक्षात घेता परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदा शिक्षण विभागाने ज्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र त्याच विद्यालयात दिले आहे. त्यामुळेच जिल्ह्यात यंदा जवळपास १५० परीक्षा केंद्र वाढविण्यात आले आहे. एसटीचा दिलासा नाहीच- शुक्रवारपासून सुरु होणारी बारावीची परीक्षा लक्षात घेऊन गोंदिया आगाराने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या सुरु करण्याची मागणी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून केली जात होती. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही मागे झाला नसल्याने परीक्षेच्या कालावधीतही विद्यार्थ्यांना एसटीचा दिलासा मिळाला नाही. विद्यार्थ्यांनो तणावमुक्त वातावरणात द्या परीक्षा - मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे ऑनलाईन वर्ग सुरू होते. तर मागील वर्षी परीक्षा सुध्दा रद्द झाल्या होत्या. तर यंदा ऑफलाईन परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर थोडे दडपण देखील आहे. मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान कुठालाही तणाव न बाळगता परीक्षा द्यावी.

 

टॅग्स :examपरीक्षा