शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
3
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
4
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
5
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
6
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
7
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
8
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
9
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
10
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
11
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
12
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
13
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
14
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
15
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
16
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
17
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
19
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
20
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय

गोंदिया जिल्ह्यात २० गावांना पुराचा वेढा; दोनशेवर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 14:43 IST

वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शनिवारी (दि.२९) याचा नदी काठालगतच्या २० गावांना फटका बसला. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने सुरू केले आहे.

ठळक मुद्देअनेक मार्ग अजूनही बंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने नदी नाले भरुन वाहत आहे. सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पुजारीटोला, कालीसरार, संजयसरोवर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. तर वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शनिवारी (दि.२९) याचा नदी काठालगतच्या २० गावांना फटका बसला. त्यामुळे या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने सुरू केले आहे.गोंदिया तालुक्यातील कोरणी, कासा, कंटगटोला, भद्याटोला, जिरुटोला, डांगोर्ली काटी या गावांमध्ये वैनगंगा आणि बाघ नदीचे पाणी साचल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी पहाटेपासूनच वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गावांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली. दरम्यान पाणी पातळीत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूच्या मदतीने येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले होते.गोंदिया तालुक्यातील कोरणी येथील ८ नागरिकांना तसेच तिरोडा तालुक्यातील ढिवरटोला येथील १०६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम युध्द पातळीवर सुरू करण्यात आले होते. कोरणी, डांगोर्ली, जिरूटोला, भद्याटोला या गावांमध्ये पुराचे पाणी साचल्याने अनेक घरे अर्धी बुडाली आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.संततधार पावसामुळे जिल्ह्यातील पांजरा-भोसा, कामठा-नवरगावकला, चांदोरी खुर्द-बघोली, आमगाव-किडंगीपार, आमगाव-कामठा हे मार्ग अद्यापही बंद आहेत. सिंचन प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आल्याने नदी नाले भरुन वाहत असल्याने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.नदी काठालगताच्या गावांना सर्तकतेचा इशारामध्यप्रदेशातील संजय सरोवर धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने शनिवारी (दि.२९) सकाळी या धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे बाघ आणि वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नदी काठालगतच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. तसेच हवामान विभागाने पुढील चौवीस तासात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे.इटियाडोह ओव्हर फ्लोच्या मार्गावरजिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. अजुर्नी मोरगाव तालुक्यातील नवेगाबांध जलाशय ओव्हर फ्लो झाला तर इटियाडोह धरण ओव्हर फ्लोच्या मार्गावर आहे. शनिवारी तिरोडा तालुक्यातील चोरखमारा जलाशय ओव्हर फ्लो झाला. तर जिल्ह्यातील सर्वच प्रमुख सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा ८० टक्यांवर आहे.

टॅग्स :floodपूर